शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

समाधान शिबिरात ३७९३ प्रकरणे

By admin | Updated: November 8, 2015 02:06 IST

तहसील कार्यालयातर्फे जुन्या तहसीलच्या प्रांगणात शनिवारी समाधान शिबिर घेण्यात आले.

पंकज भोयर : नागरिकांची प्रकरणे तातडीने निकाली काढासेलू : तहसील कार्यालयातर्फे जुन्या तहसीलच्या प्रांगणात शनिवारी समाधान शिबिर घेण्यात आले. यात विविध मुद्यांची ३ हजार ७९३ प्रकरणे दाखल झाली. बहुतांश प्रकरणे निकाली काढली गेली. यावेळी खा. रामदास तडस, आ.डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय अधिकारी स्मीता पाटील, तहसीलदार डॉ. रवींद्र होळी, जि.प. सदस्य राणा रणनवरे, पं.स. सभापती मंजूषा दुधवडे, उपसभापती मंजूषा पारसे, पं.स. सदस्य अशोक कलोडे, न.प. सदस्य चुडामन हांडे, जलतज्ञ मनोहर सोमनाथे, भाजपचे बाबा तडस, कृउबास उपसभापती रामकृष्ण उमाटे उपस्थित होते. समाधान शिबिरात नवीन राशन कार्डचे २७३, दुय्यम राशन कार्डचे १४४६, राशन कार्डवरून नाव कमी करणे ९७, नवीन नाव चढविणे १३३ असे १९४९ प्रकरणे सादर करण्यात आली. आपसी वाटणी पत्राची ९०, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र २३०, जातीचे प्रमाणपत्र १८८, नॉन क्रिमिलीयर १०३, अधिवास ३५, उत्पन्न १८७ असे एकूण ५१३ तसेच संजय गांधी योजनेचे २०७, इंदिरा गांधी योजनेचे १२३, श्रावण बाळ योजनेचे ३०३, राष्ट्रीय कुटूंब योजनेचे आठ असे ६४१, वर्ग २ ची शेत जमीन वर्ग १ मध्ये रुपांतरीत करणे ३७० प्रकरणे शिबिरात ठेवण्यात आली. एकूण ३ हजार ७९३ प्रकरणे ठेवण्यात आली. यातील अनेक प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात आली.यावेळी आ.डॉ. पंकज भोयर यांनी, दफ्तर दिरंगाईमुळे नागरिकांचे प्रश्न प्रलंबित असतात; पण यापुढे असे चालणार नाही. गोरगरिब व सामान्यांनी किती दिवस सरकारी कार्यालयाचे उबंरठे झिजवायचे. आता महाराज्यस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची प्रकरणे तातडीने निकाली काढा, अशा सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात अनेक समस्या आहे. त्या सोडविण्याचा आपला प्रयत्न आहे. तहसील कार्यालयाशी नागरिकांची अनेक प्रकरणे असतात; पण ती वेळीच सोडविली जात नाही. यामुळे सरकारने महाराजस्व अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत नागरिकांचे विविध प्रश्न निकाली काढण्यात येणार आहे. आजच्या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रासह प्रकरणे सादर करावी, जेणेकरून त्यात त्रुटी निघणार नाही. ज्यांची प्रकरणे पुर्ण आहे, त्यांचे प्रकरण त्वरित निकाली काढण्यात येईल. जर कुणाचे प्रकरण निकाली निघाले नाही तर त्यांनी तक्रार करावी. मी संबंधितांना योग्य त्या सूचना देईल. आमदार म्हणून तुमच्या समस्या सोडविणे ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले. खासदार तडस म्हणाले की, सरकारने एक चांगले अभियान सुरू केले आहे. ग्रामीण भागात अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे. कापसापासूनही फारसी अपेक्षा राहिलेली नाही. आजपर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारने शेतकऱ्यांसाठी धोरण आखले नाही. परिणामी, शेतकरी देशोधडीला लागला. सिंचनाची सोय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील लोअर वर्धा प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेला नाही. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक शेतकऱ्याला सिंचनाची सोय मिळावी, यासाठी भाजप सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी सलील यांनी शिबिर आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविले जात आहे, असे त्यांनी सांगितले. शिबिरात जी प्रकरणे निकाली निघाली नाही, ती नंतर त्वरित निकाली काढली जातील, असे सलील यांनी सांगितले. शिबिरासाठी ग्रामीण भागातून आबालवृद्ध आले होते. संचालन करीत उपस्थितांचे आभार तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी मानले.(कार्यालय प्रतिनिधी)