शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
3
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
4
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
5
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
6
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
7
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
9
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
10
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
11
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
12
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
13
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
14
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
15
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
16
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
17
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
18
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
19
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
20
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ

ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचकडून ३,६६९ प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:34 IST

धकाधकीच्या या जीवनात पैसा व वेळेची बचत कशी होईल याचाच प्रयत्न प्रत्येक नागरिकांकडून होेतो.

ठळक मुद्देतीन महिन्यात होतो तक्रारींचा निपटारा : ९० टक्के तक्रारकर्त्यांचे समाधान

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धकाधकीच्या या जीवनात पैसा व वेळेची बचत कशी होईल याचाच प्रयत्न प्रत्येक नागरिकांकडून होेतो. नागरिकांच्या चांगुलपणाचा फायदा घेत फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यातील अनेक तक्रारी ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाकडे पोहोचत असून जुलै अखेरपर्यंत ३ हजार ८३८ तक्रारी पैकी ३ हजार ६६९ तक्रारी निकाली निघाल्या आहेत.प्राप्त माहितीनुसार, २० लाखापर्यंतचे प्रकरण तक्रार निवारण न्याय मंचाच्या कार्यकक्षेत येतात. तर २० लाखांच्यावर आणि एक कोटी पर्यंतचे खटले राज्य आयोग तसेच एक कोटीच्या वरचे खटले राष्ट्रीय आयोगाच्या कार्यकक्षेत येतात. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाला न्यायालयाचा दर्जा असून दोन्ही बाजुंचा युक्तीवाद लक्षात घेवून येथे प्रकरण निकाली काढले जाते. बँक, रेल्वे, विमा, टेलीकॉम, पोस्ट, बिल्डर्स व सोसायट्या, विद्युत वितरण, घरगुती साहित्य खरेदी, शिक्षण तसेच इतर स्वरुपाचे खटले ग्राहकांचे हित जोपासणे या उद्देशाला केंद्र स्थानिक ठेवून चालविले जातात. येथे दाखल झालेल्या खटल्याचा तिन महिन्यातच न्यायनिवाडा करुन प्रकरण निकाली काढली जात आहेत.मंचाच्या स्थापनेपासून २०१७ च्या जुलै अखेरपर्यंत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात ३ हजार ८३८ खटले दाखल करण्यात आले. त्यापैकी ३ हजार ६६९ खटले निकाली काढण्यात आले आहेत. तर १६९ खटले प्रलंबित आहेत. मंचाकडे प्राप्त झालेले प्रकरण तीन महिन्यात निकाली निघत असल्याने सदर मंच ग्राहक हित जोपासण्यासाठी फायदाचा ठरत आहे.