शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

३३ ग्रामपंचायती झाल्या १०० टक्के हागणदारीमुक्त

By admin | Updated: September 13, 2016 01:24 IST

गावांतील आरोग्य कायम टिकून राहावे आणि महिलांच्या सुरक्षित धोरणाचा भाग म्हणून राज्य

आष्टी (शहीद) : गावांतील आरोग्य कायम टिकून राहावे आणि महिलांच्या सुरक्षित धोरणाचा भाग म्हणून राज्य शासनाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम सुरू केले. यासाठी १२ हजार रुपये प्रती लाभार्थी अनुदान दिले. जिल्हास्तरीय पथकाद्वारे याची पाहणी करण्यात आली. यात तालुक्यात आजपर्यंत ३३ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्याचे आढळून आले. जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिक मेश्राम, पं.स. गटविकास अधिकारी अनिल गावंडे, विस्तार अधिकारी पंचायत कैलास वानखडे, विस्तार अधिकारी सांख्यिकी पी.एस. चव्हाण, जिल्हा प्रकल्प समन्वयक सचिन खाडे, पं.स. सभापती अर्चना राहाटे, पं.स. सदस्य विजय वांगे, दुर्गानंद डोळस, माधूरी बुले, सरपंच सुनीता जोरे तळेगाव, वनीता केवटे थार, वनीता लवणकर साहुर, तारा खुवशे माणिकवाडा, धुर्वे किन्हाळा, ग्रामविकास अधिकारी शिवदास रेवस्कर, विनोद राठोड, रमेश सावरकर, चेतन मुंढे, प्रियंका राऊत आदी उपस्थित होते. यावेळी गावांत गृहभेटी देत शाळांमध्ये मुलांना शौचालयावर मार्गदर्शन करण्यात आले. उघड्यावर शौचास बसणे, घाण करणे कायद्याने गुन्हा आहे. याबाबत कुणी तक्रार केल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ (कखग), ११७ अंतर्गत अपराध सिद्धीनंतर १२०० रुपये दंड व कारावासाची शिक्षा होणार असल्याची माहिती तपासणी पथकाचे प्रमुख मेश्राम यांनी दिली. आष्टी तालुक्यातील ४१ पैकी ३१ ग्रामपंचायती १०० टक्के पूर्ण झाल्या. २ ग्रामपंचायती आॅफलाईन असून ३३ गावे हागणदारीमुक्त आहे. उर्वरित ८ गावे महिनाभरात उद्दिष्ट पूर्ण करणार आहे. गृहभेटीमध्ये शासनाने प्रकाशित केलेल्या तीनही स्टीकरची अंमलबजावणी करण्यात आली. यात शौचालय बांधकाम पूर्ण झाले, अशा लाभार्थ्यांच्या घरावर ‘लय भारी’चे हिरवे स्टिकर, शौचालय बांधकाम केले; पण वापर केला नाही, अशांना ‘जरा जपून’चे पिवळे तर ज्यांनी शौचालय बांधकामाला सुरूवातच केली नाही, अशांच्या घरावर ‘खतरा/धोका’ नावाचे लाल स्टिकर लावण्यात आले. घरोघरी स्टिकर लावल्याने गावात चर्चेचा विषय रंगला होता.(तालुका प्रतिनिधी) अनुदानानंतर जागृतीची गरज ४शासनाने शौचालय बांधकामासाठी प्रती लाभार्थी बारा हजार रुपयांचे अनुदान दिले. असे असताना बांधकामासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागत असून गृहभेटी देत जनजागृतीद्वारे लोकांना प्रोत्साहीत करावे लागत आहे. ४आष्टी तालुक्यातील ३३ ग्रामपंचायती १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्याबद्दल गटविकास अधिकारी अनिल गावंडे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी पंचायत समिती कर्मचारी, ग्रामसेवक उपस्थित होते.