शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

३३ ग्रामपंचायती झाल्या १०० टक्के हागणदारीमुक्त

By admin | Updated: September 13, 2016 01:24 IST

गावांतील आरोग्य कायम टिकून राहावे आणि महिलांच्या सुरक्षित धोरणाचा भाग म्हणून राज्य

आष्टी (शहीद) : गावांतील आरोग्य कायम टिकून राहावे आणि महिलांच्या सुरक्षित धोरणाचा भाग म्हणून राज्य शासनाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम सुरू केले. यासाठी १२ हजार रुपये प्रती लाभार्थी अनुदान दिले. जिल्हास्तरीय पथकाद्वारे याची पाहणी करण्यात आली. यात तालुक्यात आजपर्यंत ३३ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्याचे आढळून आले. जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिक मेश्राम, पं.स. गटविकास अधिकारी अनिल गावंडे, विस्तार अधिकारी पंचायत कैलास वानखडे, विस्तार अधिकारी सांख्यिकी पी.एस. चव्हाण, जिल्हा प्रकल्प समन्वयक सचिन खाडे, पं.स. सभापती अर्चना राहाटे, पं.स. सदस्य विजय वांगे, दुर्गानंद डोळस, माधूरी बुले, सरपंच सुनीता जोरे तळेगाव, वनीता केवटे थार, वनीता लवणकर साहुर, तारा खुवशे माणिकवाडा, धुर्वे किन्हाळा, ग्रामविकास अधिकारी शिवदास रेवस्कर, विनोद राठोड, रमेश सावरकर, चेतन मुंढे, प्रियंका राऊत आदी उपस्थित होते. यावेळी गावांत गृहभेटी देत शाळांमध्ये मुलांना शौचालयावर मार्गदर्शन करण्यात आले. उघड्यावर शौचास बसणे, घाण करणे कायद्याने गुन्हा आहे. याबाबत कुणी तक्रार केल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ (कखग), ११७ अंतर्गत अपराध सिद्धीनंतर १२०० रुपये दंड व कारावासाची शिक्षा होणार असल्याची माहिती तपासणी पथकाचे प्रमुख मेश्राम यांनी दिली. आष्टी तालुक्यातील ४१ पैकी ३१ ग्रामपंचायती १०० टक्के पूर्ण झाल्या. २ ग्रामपंचायती आॅफलाईन असून ३३ गावे हागणदारीमुक्त आहे. उर्वरित ८ गावे महिनाभरात उद्दिष्ट पूर्ण करणार आहे. गृहभेटीमध्ये शासनाने प्रकाशित केलेल्या तीनही स्टीकरची अंमलबजावणी करण्यात आली. यात शौचालय बांधकाम पूर्ण झाले, अशा लाभार्थ्यांच्या घरावर ‘लय भारी’चे हिरवे स्टिकर, शौचालय बांधकाम केले; पण वापर केला नाही, अशांना ‘जरा जपून’चे पिवळे तर ज्यांनी शौचालय बांधकामाला सुरूवातच केली नाही, अशांच्या घरावर ‘खतरा/धोका’ नावाचे लाल स्टिकर लावण्यात आले. घरोघरी स्टिकर लावल्याने गावात चर्चेचा विषय रंगला होता.(तालुका प्रतिनिधी) अनुदानानंतर जागृतीची गरज ४शासनाने शौचालय बांधकामासाठी प्रती लाभार्थी बारा हजार रुपयांचे अनुदान दिले. असे असताना बांधकामासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागत असून गृहभेटी देत जनजागृतीद्वारे लोकांना प्रोत्साहीत करावे लागत आहे. ४आष्टी तालुक्यातील ३३ ग्रामपंचायती १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्याबद्दल गटविकास अधिकारी अनिल गावंडे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी पंचायत समिती कर्मचारी, ग्रामसेवक उपस्थित होते.