शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

३३ ग्रामपंचायती झाल्या १०० टक्के हागणदारीमुक्त

By admin | Updated: September 13, 2016 01:24 IST

गावांतील आरोग्य कायम टिकून राहावे आणि महिलांच्या सुरक्षित धोरणाचा भाग म्हणून राज्य

आष्टी (शहीद) : गावांतील आरोग्य कायम टिकून राहावे आणि महिलांच्या सुरक्षित धोरणाचा भाग म्हणून राज्य शासनाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम सुरू केले. यासाठी १२ हजार रुपये प्रती लाभार्थी अनुदान दिले. जिल्हास्तरीय पथकाद्वारे याची पाहणी करण्यात आली. यात तालुक्यात आजपर्यंत ३३ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्याचे आढळून आले. जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिक मेश्राम, पं.स. गटविकास अधिकारी अनिल गावंडे, विस्तार अधिकारी पंचायत कैलास वानखडे, विस्तार अधिकारी सांख्यिकी पी.एस. चव्हाण, जिल्हा प्रकल्प समन्वयक सचिन खाडे, पं.स. सभापती अर्चना राहाटे, पं.स. सदस्य विजय वांगे, दुर्गानंद डोळस, माधूरी बुले, सरपंच सुनीता जोरे तळेगाव, वनीता केवटे थार, वनीता लवणकर साहुर, तारा खुवशे माणिकवाडा, धुर्वे किन्हाळा, ग्रामविकास अधिकारी शिवदास रेवस्कर, विनोद राठोड, रमेश सावरकर, चेतन मुंढे, प्रियंका राऊत आदी उपस्थित होते. यावेळी गावांत गृहभेटी देत शाळांमध्ये मुलांना शौचालयावर मार्गदर्शन करण्यात आले. उघड्यावर शौचास बसणे, घाण करणे कायद्याने गुन्हा आहे. याबाबत कुणी तक्रार केल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ (कखग), ११७ अंतर्गत अपराध सिद्धीनंतर १२०० रुपये दंड व कारावासाची शिक्षा होणार असल्याची माहिती तपासणी पथकाचे प्रमुख मेश्राम यांनी दिली. आष्टी तालुक्यातील ४१ पैकी ३१ ग्रामपंचायती १०० टक्के पूर्ण झाल्या. २ ग्रामपंचायती आॅफलाईन असून ३३ गावे हागणदारीमुक्त आहे. उर्वरित ८ गावे महिनाभरात उद्दिष्ट पूर्ण करणार आहे. गृहभेटीमध्ये शासनाने प्रकाशित केलेल्या तीनही स्टीकरची अंमलबजावणी करण्यात आली. यात शौचालय बांधकाम पूर्ण झाले, अशा लाभार्थ्यांच्या घरावर ‘लय भारी’चे हिरवे स्टिकर, शौचालय बांधकाम केले; पण वापर केला नाही, अशांना ‘जरा जपून’चे पिवळे तर ज्यांनी शौचालय बांधकामाला सुरूवातच केली नाही, अशांच्या घरावर ‘खतरा/धोका’ नावाचे लाल स्टिकर लावण्यात आले. घरोघरी स्टिकर लावल्याने गावात चर्चेचा विषय रंगला होता.(तालुका प्रतिनिधी) अनुदानानंतर जागृतीची गरज ४शासनाने शौचालय बांधकामासाठी प्रती लाभार्थी बारा हजार रुपयांचे अनुदान दिले. असे असताना बांधकामासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागत असून गृहभेटी देत जनजागृतीद्वारे लोकांना प्रोत्साहीत करावे लागत आहे. ४आष्टी तालुक्यातील ३३ ग्रामपंचायती १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्याबद्दल गटविकास अधिकारी अनिल गावंडे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी पंचायत समिती कर्मचारी, ग्रामसेवक उपस्थित होते.