शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

३२,३५२ शेतकऱ्यांना मिळणार लाभ

By admin | Updated: February 7, 2015 23:27 IST

जिल्ह्यात पहिल्यांदाच कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकरिता हवामान पीक विमा योजना राबविण्यात आली. ३२ हजार ३५२ शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेचा लाभ घेतला.

हवामान पीक विमा : लवकरच रक्कम बॅक खात्यात होणार जमा वर्धा : जिल्ह्यात पहिल्यांदाच कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकरिता हवामान पीक विमा योजना राबविण्यात आली. ३२ हजार ३५२ शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेचा लाभ घेतला. या सर्वच शेतकऱ्यांना खरीप हंगामात झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाकडून मंजूर झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. योजनेत सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना १६ कोटी १४ लाख ९० हजार रुपये मिळणार असून ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे.नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमीच नुकसानीचा सामना करावा लागला आहे. कधी पावसाची दडी तर कधी अती पाऊस यामुळे शेतातील उभे पीक खराब झाल्याची उदाहरणे आहेत. शासनाच्यावतीने कधी मदत मिळते तर कधी नुकसानीचा भार शेकऱ्यांनाच सहन करावा लागतो. या दृष्टचक्रातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी याकरिता कृषी विभागाच्यावतीने हवामान पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाल्याचे समोर येत आहे.यंदाच्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन उत्पादकांकरिता हवामान पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय झाला. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. या योजनेत सहभागी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचा नुकताच सर्व्हे झाला असून यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. ही योजना अंमलात येताच जिल्ह्यातील २१ हजार ४३७ कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाचा विमा उतरविला. या सर्वच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला असून त्यांना १३ कोटी ४१ लाख २२ हजार रुपयांचा लाभ झाला आहे. तर १० हजार ९१५ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाचा पिका उतरविला. या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानिपोटी त्यांना २ कोटी ७२ लाख ६८ हजार रुपयांची भरपाई संबंधीत कंपनीकडून देण्यात येणार आहे. दोन्ही प्रकारातील किती रक्कम देण्यात येणार याची माहिती मिळाली असून ती नेमकी केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल याची माहिती मात्र देण्यात आली नाही. रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.(प्रतिनिधी)