शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

३२,३५२ शेतकऱ्यांना मिळणार लाभ

By admin | Updated: February 7, 2015 23:27 IST

जिल्ह्यात पहिल्यांदाच कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकरिता हवामान पीक विमा योजना राबविण्यात आली. ३२ हजार ३५२ शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेचा लाभ घेतला.

हवामान पीक विमा : लवकरच रक्कम बॅक खात्यात होणार जमा वर्धा : जिल्ह्यात पहिल्यांदाच कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकरिता हवामान पीक विमा योजना राबविण्यात आली. ३२ हजार ३५२ शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेचा लाभ घेतला. या सर्वच शेतकऱ्यांना खरीप हंगामात झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाकडून मंजूर झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. योजनेत सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना १६ कोटी १४ लाख ९० हजार रुपये मिळणार असून ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे.नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमीच नुकसानीचा सामना करावा लागला आहे. कधी पावसाची दडी तर कधी अती पाऊस यामुळे शेतातील उभे पीक खराब झाल्याची उदाहरणे आहेत. शासनाच्यावतीने कधी मदत मिळते तर कधी नुकसानीचा भार शेकऱ्यांनाच सहन करावा लागतो. या दृष्टचक्रातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी याकरिता कृषी विभागाच्यावतीने हवामान पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाल्याचे समोर येत आहे.यंदाच्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन उत्पादकांकरिता हवामान पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय झाला. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. या योजनेत सहभागी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचा नुकताच सर्व्हे झाला असून यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. ही योजना अंमलात येताच जिल्ह्यातील २१ हजार ४३७ कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाचा विमा उतरविला. या सर्वच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला असून त्यांना १३ कोटी ४१ लाख २२ हजार रुपयांचा लाभ झाला आहे. तर १० हजार ९१५ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाचा पिका उतरविला. या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानिपोटी त्यांना २ कोटी ७२ लाख ६८ हजार रुपयांची भरपाई संबंधीत कंपनीकडून देण्यात येणार आहे. दोन्ही प्रकारातील किती रक्कम देण्यात येणार याची माहिती मिळाली असून ती नेमकी केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल याची माहिती मात्र देण्यात आली नाही. रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.(प्रतिनिधी)