शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

३१ हजार रुग्णांना मिळाला जीवनदायीचा लाभ

By admin | Updated: July 17, 2017 02:02 IST

गोरगरीब रुग्णांवरील शस्त्रक्रियांकरिता शासनाकडून राजीव गांधी जीवनदायी योजना राबविली जात आहे.

चार रुग्णालयांचा समावेश : ७१ कोटी ८६ लाखांची रक्कम प्राप्तप्रशांत हेलोंडे । लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गोरगरीब रुग्णांवरील शस्त्रक्रियांकरिता शासनाकडून राजीव गांधी जीवनदायी योजना राबविली जात आहे. या योजनेचा गरजू रुग्णांना लाभ मिळत आहे. जिल्ह्यातील चार रुग्णालये या योजनेचा लाभ देण्यास पात्र ठरविण्यात आली आहेत. या चार रुग्णालयांमध्ये नोव्हेंबर २०१३ ते जुलै २०१७ पर्यंत तब्बल ३१ हजार रुग्णांना या योजनेचा लाभ प्राप्त झाला आहे. या पोटी शासनामार्फत चारही रुग्णालयांना ७१ कोटी ८६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये रुग्णालयांत भरती रुग्णांना दीड लाख रुपयांपर्यंतच्या शस्त्रक्रियेसाठी शासनाकडून मदत केली जाते. यासाठी जिल्ह्यातील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे), कस्तूरबा रुग्णालय सेवाग्राम, जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा आणि रिपल राणे हॉस्पीटल आर्वी यांचा समावेश आहे. या चार रुग्णालयांद्वारे गरजू रुग्णांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. सावंगी रुग्णालयामध्ये आजपर्यंत १८ हजार ९९१ रुग्णांवर या योजनेतून शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या पोटी रुग्णालयाला शासनाकडून ५६ कोटी २७ लाख ८४ हजार ५५६ रुपये प्राप्त झाले आहेत. सेवाग्राम रुग्णालयाद्वारे १० हजार ८०६ रुग्णांवर या योजनेत उपचार करण्यात आलेत. या मोबदल्यात रुग्णालयाला शासनाने १४ कोटी ५६ लाख १० हजार २९४ रुपये अदा केले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातही ७३८ रुग्णांवर या योजनेतून औषधोपचार करण्यात आले. या पोटी सामान्य रुग्णालयाला ६४ लाख १० हजार ७५० रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. शिवाय रिपल राणे हॉस्पीटल आर्वीने ३४८ रुग्णांवर जीवनदायी योजनेंतर्गत उपचार केलेत. या मोबदल्यात शासनाकडून रुग्णालयाला ३७ लाख ७५ हजार ३५० रुपये अदा केले आहेत. जिल्ह्यातील चारही रुग्णालयांमध्ये राजीव गांधी जीवनदायी योजनेचा गोरगरीब, गरजू रुग्णांना लाभ मिळत आहे. परिणामी, सेवाग्राम आणि सावंगी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये विविध प्रकारच्या आजारांवर होणाऱ्या शस्त्रक्रियेकरिता दीड लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. या अनुदानात बसणाऱ्या शस्त्रक्रिया जीवनदायी योजनेतून केल्या जातात. सध्या सर्वाधिक शस्त्रक्रिया आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) येथे होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. इतर रुग्णालयात मात्र लाभ घेणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेत कमीच असल्याचे दिसून आले आहे. मुत्रपिंडाचे सर्वाधिक रुग्णजिल्हा सामान्य रुग्णालयात एप्रिल ते जुलै या कालावधीत मुत्रपिंडाच्या आजाराबाबतचे सर्वाधिक रुग्णांना जीवनदायी योजनेचा लाभ देण्यात आला. मुत्रपिंडाबाबतच्या ३८ रुग्णांपैकी २६ रुग्णांना जीवनदायीचा लाभ मिळाला आहे. यापोटी रुग्णालयाला १ लाख ७५ हजार ८७५ रुपये अदा करण्यात आले आहे. कान, नाक, घशाच्या आजारातील २९ पैकी रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या असून १ लाख १ हजार ५०० रुपये, जळालेल्या ५ प्रकरणांत १ लाख ७१ हजार ५०० रुपये, सामान्य शस्त्रक्रियेत एका रुग्णापोटी १४ हजार, प्रसूतिमधील तीन रुग्णांपोटी ३१ हजार ५०० रुपये, मूळव्याधीच्या ४ रुग्णांपोटी ७० हजार रुपये, अपघातग्रस्त तथा अन्य आजारांतील ९ रुग्णांपोटी ८७ हजार ५०० रुपये असे एकूण ७७ रुग्णांपोटी ६ लाख ५१ हजार ८७५ रुपये प्राप्त झालेत.