शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

३० रुपयाचे फलक ग्रामस्थांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 22:28 IST

गावकऱ्यांकडून मागणी किंवा शासनाचा कोणाताही आदेश नसताना स्वच्छ भारत अभियानच्या नावावर ग्रामस्थांना तीस रुपये किंमतीचे फलक थोपविण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियानाच्या नावावर गावकऱ्यांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आ.) : गावकऱ्यांकडून मागणी किंवा शासनाचा कोणाताही आदेश नसताना स्वच्छ भारत अभियानच्या नावावर ग्रामस्थांना तीस रुपये किंमतीचे फलक थोपविण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.विरुळ गावासह परिसरातील काही गावात खासगी इसमांकडून नागरिकांना घराच्या दारावर लावण्याकरिता स्वच्छ भारत अभियानचे फलक दिल्या जात आहे. सदर इसम स्वत:च हे फलक लावून देत प्रत्येकाकडून तीस रुपये घेत असल्याचे सांगितल्या जाते. याबाबत ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीकडून कोणताही आदेश नसताना ग्रामस्थांकडून फलकाच्या नावावर तीस रुपये वसूल करणारे कोण? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मागील आठवड्यात काही खाजगी इसम गावात आले. त्यांनी गावातील प्रत्येकांच्या घरावर स्वच्छ भारत अभियानाचे फलक दारावर लावले. काहींनी याकडे दुर्लक्ष करीत फलक लावून घेतले व त्याचे पैसेही दिले. पण, ग्रामपंचायतलाही याबाबत कुठलाच आदेश नसल्याचे लक्षात आल्यावर नागरिक सतर्क झाले. ग्रामपंचायतला माहिती नसतानाही सदर इसम कसे काय गावात येऊन प्रत्येकाच्या घरावर फलक लावू शकतो?असाही प्रश्न उपस्थित होत आहे. वास्तविक पाहता गावात कुठेही स्वच्छता दीसत नाही. गावातील नाल्या तुंबल्या आहे. शेणखत रस्त्यावर पडून असल्याने गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. हगणदारीमक्तीचा बोजवारा उडाला आहे. यातुनच मागील वर्र्षी साथरोग पसरुन एका चिमुकल्याला जीव गमवावा लागला. गावात अशी स्वच्छतेचा असा बोजवारा उडाला असताना गावातील प्रत्येक घरावर स्वच्छ भारत अभियानचे फलक लावण्याचा सपाटा सुरु आहे. प्रत्येकाकडून तीस रुपये घेऊन हजारो रुपये उकळले जात आहे. त्यामुळे यामार्ग कर्ता करविता कोण? याचा शोध घेणे गरजेचे आहे. हाही आदेश कदाचित जिल्हा परिषदेतून तर धडकला नाही ना? अशी शंका व्यक्त होत आहे. यासंदर्भात ग्रामविकास अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करु न माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान