शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

३० रुपयाचे फलक ग्रामस्थांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 22:28 IST

गावकऱ्यांकडून मागणी किंवा शासनाचा कोणाताही आदेश नसताना स्वच्छ भारत अभियानच्या नावावर ग्रामस्थांना तीस रुपये किंमतीचे फलक थोपविण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियानाच्या नावावर गावकऱ्यांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आ.) : गावकऱ्यांकडून मागणी किंवा शासनाचा कोणाताही आदेश नसताना स्वच्छ भारत अभियानच्या नावावर ग्रामस्थांना तीस रुपये किंमतीचे फलक थोपविण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.विरुळ गावासह परिसरातील काही गावात खासगी इसमांकडून नागरिकांना घराच्या दारावर लावण्याकरिता स्वच्छ भारत अभियानचे फलक दिल्या जात आहे. सदर इसम स्वत:च हे फलक लावून देत प्रत्येकाकडून तीस रुपये घेत असल्याचे सांगितल्या जाते. याबाबत ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीकडून कोणताही आदेश नसताना ग्रामस्थांकडून फलकाच्या नावावर तीस रुपये वसूल करणारे कोण? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मागील आठवड्यात काही खाजगी इसम गावात आले. त्यांनी गावातील प्रत्येकांच्या घरावर स्वच्छ भारत अभियानाचे फलक दारावर लावले. काहींनी याकडे दुर्लक्ष करीत फलक लावून घेतले व त्याचे पैसेही दिले. पण, ग्रामपंचायतलाही याबाबत कुठलाच आदेश नसल्याचे लक्षात आल्यावर नागरिक सतर्क झाले. ग्रामपंचायतला माहिती नसतानाही सदर इसम कसे काय गावात येऊन प्रत्येकाच्या घरावर फलक लावू शकतो?असाही प्रश्न उपस्थित होत आहे. वास्तविक पाहता गावात कुठेही स्वच्छता दीसत नाही. गावातील नाल्या तुंबल्या आहे. शेणखत रस्त्यावर पडून असल्याने गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. हगणदारीमक्तीचा बोजवारा उडाला आहे. यातुनच मागील वर्र्षी साथरोग पसरुन एका चिमुकल्याला जीव गमवावा लागला. गावात अशी स्वच्छतेचा असा बोजवारा उडाला असताना गावातील प्रत्येक घरावर स्वच्छ भारत अभियानचे फलक लावण्याचा सपाटा सुरु आहे. प्रत्येकाकडून तीस रुपये घेऊन हजारो रुपये उकळले जात आहे. त्यामुळे यामार्ग कर्ता करविता कोण? याचा शोध घेणे गरजेचे आहे. हाही आदेश कदाचित जिल्हा परिषदेतून तर धडकला नाही ना? अशी शंका व्यक्त होत आहे. यासंदर्भात ग्रामविकास अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करु न माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान