शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, S-400 ने रॉकेट पाडले, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
3
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
4
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
5
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
6
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
7
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
8
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
9
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
10
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
11
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
12
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
13
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
14
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
15
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
16
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
17
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
18
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
19
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
20
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या

आठ महिन्यात ३० हत्या

By admin | Updated: August 31, 2016 00:57 IST

अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या तत्त्वांची शिकवण आत्मसात करण्याकरिता देशभऱ्यातील नेते,

हत्यांचे सत्र सुरूच : आरोपी पकडणे सोपे; आळा घालणे कठीण रूपेश खैरी ल्ल वर्धा अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या तत्त्वांची शिकवण आत्मसात करण्याकरिता देशभऱ्यातील नेते, समाजसवेक सेवाग्रामच्या बापू कुटीत येतात; मात्र ही कुटी असलेल्या वर्धा जिल्ह्यालाच त्यांच्या अहिंसा तत्त्वाचा विसर पडला आहे. जिल्ह्यात अवघ्या आठ महिन्यात ३० हत्यांची नोंद झाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. जिल्ह्यात सुरू झालेले हत्यांचे सत्र अजूनही सुरूच असल्याचे वर्धेतील संगीता परसराम हिच्या हत्येने उघड झाले. जिल्ह्यात सुरू वर्षाच्या जानेवारी ते जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत एकूण २८ हत्यांची नोंद झाली आहे. यात आॅगस्ट महिन्यात दोन हत्यांची नोंद झाल्याने हा आकडा ३० वर पोहोचला आहे. अर्ध्या वर्षात हत्येचा आकडा ३० वर गेल्याने वर्षाच्या अखेरीस हा आकडा कितीवर पोहोचतो याचा अंदाज बांधणे कठीण होत आहे. जिल्ह्यात घडलेल्या प्रकरणातील जवळपास सर्वच आरोपींना अटक असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी यावर आळा घालण्याची गरज वर्तविण्यात येत आहे. सोमवारी वर्धेत झालेल्या हत्येत पोलिसांनी पहिले गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. यामुळे घडलेल्या या हत्या प्रकरणात कुठे ना कुठे पोलिसांकडून झालेली हयगय एक कारण असल्याचे बोलले जात आहे. समुद्रपूर येथे झालेल्या छत्रपती थुटे यांच्या हत्येतही पहिले झालेली पोलीस तक्रार एक कारण असल्याची चर्चा तालुक्यात आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तपासात हयगय झाल्याने कदाचित छत्रपतींना जीव गमवावा लागला, अशी चर्चा आहे. जुलै महिन्यात हत्येच्या कारणांनी चर्चेत असलेला जिल्हा आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभी यातून सुटला असे वाटले होते. मात्र सोमवारी सकाळी संगीता परसराम हिची चाकूने गळा कापून दगडाने ठेचत हत्या केल्याने वर्धेतील क्रूर हत्यांची परंपरा कायमच आहे. जानेवारी महिन्यात हत्येच्या एका गुन्ह्याने सुरू झालेले हत्येचे सत्र आॅगस्ट महिन्यातही थांबले नाही. सर्वाधिक सात हत्या मे महिन्यात झाल्याचे दिसून आले आहे.