शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

आठ महिन्यात ३० हत्या

By admin | Updated: August 31, 2016 00:57 IST

अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या तत्त्वांची शिकवण आत्मसात करण्याकरिता देशभऱ्यातील नेते,

हत्यांचे सत्र सुरूच : आरोपी पकडणे सोपे; आळा घालणे कठीण रूपेश खैरी ल्ल वर्धा अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या तत्त्वांची शिकवण आत्मसात करण्याकरिता देशभऱ्यातील नेते, समाजसवेक सेवाग्रामच्या बापू कुटीत येतात; मात्र ही कुटी असलेल्या वर्धा जिल्ह्यालाच त्यांच्या अहिंसा तत्त्वाचा विसर पडला आहे. जिल्ह्यात अवघ्या आठ महिन्यात ३० हत्यांची नोंद झाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. जिल्ह्यात सुरू झालेले हत्यांचे सत्र अजूनही सुरूच असल्याचे वर्धेतील संगीता परसराम हिच्या हत्येने उघड झाले. जिल्ह्यात सुरू वर्षाच्या जानेवारी ते जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत एकूण २८ हत्यांची नोंद झाली आहे. यात आॅगस्ट महिन्यात दोन हत्यांची नोंद झाल्याने हा आकडा ३० वर पोहोचला आहे. अर्ध्या वर्षात हत्येचा आकडा ३० वर गेल्याने वर्षाच्या अखेरीस हा आकडा कितीवर पोहोचतो याचा अंदाज बांधणे कठीण होत आहे. जिल्ह्यात घडलेल्या प्रकरणातील जवळपास सर्वच आरोपींना अटक असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी यावर आळा घालण्याची गरज वर्तविण्यात येत आहे. सोमवारी वर्धेत झालेल्या हत्येत पोलिसांनी पहिले गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. यामुळे घडलेल्या या हत्या प्रकरणात कुठे ना कुठे पोलिसांकडून झालेली हयगय एक कारण असल्याचे बोलले जात आहे. समुद्रपूर येथे झालेल्या छत्रपती थुटे यांच्या हत्येतही पहिले झालेली पोलीस तक्रार एक कारण असल्याची चर्चा तालुक्यात आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तपासात हयगय झाल्याने कदाचित छत्रपतींना जीव गमवावा लागला, अशी चर्चा आहे. जुलै महिन्यात हत्येच्या कारणांनी चर्चेत असलेला जिल्हा आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभी यातून सुटला असे वाटले होते. मात्र सोमवारी सकाळी संगीता परसराम हिची चाकूने गळा कापून दगडाने ठेचत हत्या केल्याने वर्धेतील क्रूर हत्यांची परंपरा कायमच आहे. जानेवारी महिन्यात हत्येच्या एका गुन्ह्याने सुरू झालेले हत्येचे सत्र आॅगस्ट महिन्यातही थांबले नाही. सर्वाधिक सात हत्या मे महिन्यात झाल्याचे दिसून आले आहे.