शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

आठ महिन्यात ३० हत्या

By admin | Updated: August 31, 2016 00:57 IST

अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या तत्त्वांची शिकवण आत्मसात करण्याकरिता देशभऱ्यातील नेते,

हत्यांचे सत्र सुरूच : आरोपी पकडणे सोपे; आळा घालणे कठीण रूपेश खैरी ल्ल वर्धा अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या तत्त्वांची शिकवण आत्मसात करण्याकरिता देशभऱ्यातील नेते, समाजसवेक सेवाग्रामच्या बापू कुटीत येतात; मात्र ही कुटी असलेल्या वर्धा जिल्ह्यालाच त्यांच्या अहिंसा तत्त्वाचा विसर पडला आहे. जिल्ह्यात अवघ्या आठ महिन्यात ३० हत्यांची नोंद झाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. जिल्ह्यात सुरू झालेले हत्यांचे सत्र अजूनही सुरूच असल्याचे वर्धेतील संगीता परसराम हिच्या हत्येने उघड झाले. जिल्ह्यात सुरू वर्षाच्या जानेवारी ते जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत एकूण २८ हत्यांची नोंद झाली आहे. यात आॅगस्ट महिन्यात दोन हत्यांची नोंद झाल्याने हा आकडा ३० वर पोहोचला आहे. अर्ध्या वर्षात हत्येचा आकडा ३० वर गेल्याने वर्षाच्या अखेरीस हा आकडा कितीवर पोहोचतो याचा अंदाज बांधणे कठीण होत आहे. जिल्ह्यात घडलेल्या प्रकरणातील जवळपास सर्वच आरोपींना अटक असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी यावर आळा घालण्याची गरज वर्तविण्यात येत आहे. सोमवारी वर्धेत झालेल्या हत्येत पोलिसांनी पहिले गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. यामुळे घडलेल्या या हत्या प्रकरणात कुठे ना कुठे पोलिसांकडून झालेली हयगय एक कारण असल्याचे बोलले जात आहे. समुद्रपूर येथे झालेल्या छत्रपती थुटे यांच्या हत्येतही पहिले झालेली पोलीस तक्रार एक कारण असल्याची चर्चा तालुक्यात आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तपासात हयगय झाल्याने कदाचित छत्रपतींना जीव गमवावा लागला, अशी चर्चा आहे. जुलै महिन्यात हत्येच्या कारणांनी चर्चेत असलेला जिल्हा आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभी यातून सुटला असे वाटले होते. मात्र सोमवारी सकाळी संगीता परसराम हिची चाकूने गळा कापून दगडाने ठेचत हत्या केल्याने वर्धेतील क्रूर हत्यांची परंपरा कायमच आहे. जानेवारी महिन्यात हत्येच्या एका गुन्ह्याने सुरू झालेले हत्येचे सत्र आॅगस्ट महिन्यातही थांबले नाही. सर्वाधिक सात हत्या मे महिन्यात झाल्याचे दिसून आले आहे.