शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

बोगस ले-आऊटची चौकशी दडपण्यासाठी ३० लाखांची तोडी?

By admin | Updated: January 11, 2017 00:53 IST

सतीश नरहरशेट्टीवार प्रकरणात सावंगी(मेघे) ठाण्याने केलेल्या चौकशीत एका आरोपीने वर्धा शहरातील ले-आऊट

 नऊ जण होते ’आॅऊट आॅफ कव्हरेज’ : नरहरशेट्टीवार प्रकरणाच्या तपासात उघड झाली होती धक्कादायक माहिती वर्धा : सतीश नरहरशेट्टीवार प्रकरणात सावंगी(मेघे) ठाण्याने केलेल्या चौकशीत एका आरोपीने वर्धा शहरातील ले-आऊट धारकांनी कागदपत्रात केलेल्या हेराफेरीचा पाढाच वाचला होता. यानंतर सावंगी पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी करणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. सदर प्रकरण दडपण्यासाठी चक्क ३० लाखांची तोडी झाल्याची माहिती विश्वसनीय पोलीस सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली. नरहरशेट्टीवारला अटक केल्यानंतर वर्धेतील ले-आऊट बाबतीतील अनेक घबाड पोलीस चौकशीत बाहेर आणतील, अशी आशा वर्धेकरांना होती. सुरुवातीला सावंगी(मेघे) पोलिसांनी त्याच तोऱ्यात चौकशी केली. चौकशीत गोरखनाथ चौधरी याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने वर्धेतील ले-आऊटमधे कसे घबाड झालेले आहे याची इत्यंभूत माहिती पोलिसांपुढे उघड केल्याचेही पोलीस सूत्राने म्हणणे आहे. या अनुषंगाने ज्यांची नावे बयाणात पुढे आली त्यांना चौकशीसाठी बोलाविणे एखाद्या प्रकरणात क्रमप्राप्त ठरते. मात्र एकालाही चौकशीसाठी बोलाविल्याचे ऐकिवात नाही. ही बाब संबंधित ले-आऊट धारकांना माहिती होताच कारवाईच्या भीतीने सुमारे नऊजण वर्धेतून एकाएकी भूमिगत झाले. तब्बल आठ दिवस ही मंडळी ‘आॅऊट आॅफ कव्हरेज एरिया’ होती. दरम्यानच्या काळात त्यांनी प्रकरण दडपण्यासाठी जोरदार हालचाली केल्या. यामध्ये त्यांना यश आले. सदर प्रकरणाची चौकशी दडपण्यासाठी तब्बल ३० लाखांची तोडी झाल्याची माहिती विश्वसनीय पोलीस सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली. यानंतर आरोपीने याबाबत दिलेल्या बयाणात गडबड झाल्याचेही सूत्राने सांगितले. सदर प्रकरण निवळल्यानंतर सर्वजण वर्धेत दाखल झाले. आता ते निर्धास्त असल्याचेही सांगण्यात आले. नरहरशेट्टीवार प्रकरणात अनेक खळबळजनक बाबींचा उलगडा झाल्याचेही बोलले जात आहे. मात्र यानंतर पोलिसांनी सदर प्रकरण गांभिर्याने हाताळणे बंद केल्याचेही सूत्राचे म्हणणे आहे. नरहरशेट्टीवार प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी केल्यास अनेक धक्कादायक वास्तव पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र कुंपणच शेत खात असेल, तर दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(जिल्हा प्रतिनिधी) पोलीस अधीक्षकांची भूमिका अद्यापही मवाळ नरहरशेट्टीवार प्रकरण हे वर्धा पोलिसांसाठी अभिमानाची बाब ठरणारी होती. याप्रकरणात अनेक धक्कादायक वास्तव पुढे येणार हे वर्धेकर गृहीत धरुन होते. मात्र प्रकरणात पोलीस अधीक्षकांचीच भूमिका मवाळच दिसली. सावंगी ठाणेदाराने जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे यांना अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे गेली आहे. यानंतर एका दुचाकीस्वाराला नशेत असल्याचे सांगून बेदम मारहाण केली यात त्याचा हात मोडला. याचीही तक्रार पोलीस अधीक्षकांकडे गेलेली आहे. इतकेच नव्हे, तर सदर दुचाकीस्वाराच्या मित्राला सावंगी ठाण्यात बोलावून त्यांच्याकडून नशेत असल्यामुळे दुचाकीला अपघात झाल्याचे बयाण नोंदवून घेतल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. या सर्व प्रकरणात पोलीस अधीक्षक इतके मवाळ कसे काय, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तपासच संशयास्पद वर्धा शहरात विक्री अलीकडच्या काळातील असताना एनए मात्र त्याहीपेक्षा जुना आहे. ही बाब यापूर्वीच वर्धेत परिविक्षाधिन अधिकारी असताना शिवशंकर यांनी उघडकीस आणली होती. नरहरशेट्टीवार यांच्या प्रकरणाच्या निमित्ताने सदर बाब चौकशीत येणे अनिवार्य असताना याबाबत पोलीस खोलात जावून चौकशी का करीत नाही, असा सवाल संशयाला बळ देणारा असल्याचेही बोलले जात आहे.