शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

बोगस ले-आऊटची चौकशी दडपण्यासाठी ३० लाखांची तोडी?

By admin | Updated: January 11, 2017 00:53 IST

सतीश नरहरशेट्टीवार प्रकरणात सावंगी(मेघे) ठाण्याने केलेल्या चौकशीत एका आरोपीने वर्धा शहरातील ले-आऊट

 नऊ जण होते ’आॅऊट आॅफ कव्हरेज’ : नरहरशेट्टीवार प्रकरणाच्या तपासात उघड झाली होती धक्कादायक माहिती वर्धा : सतीश नरहरशेट्टीवार प्रकरणात सावंगी(मेघे) ठाण्याने केलेल्या चौकशीत एका आरोपीने वर्धा शहरातील ले-आऊट धारकांनी कागदपत्रात केलेल्या हेराफेरीचा पाढाच वाचला होता. यानंतर सावंगी पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी करणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. सदर प्रकरण दडपण्यासाठी चक्क ३० लाखांची तोडी झाल्याची माहिती विश्वसनीय पोलीस सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली. नरहरशेट्टीवारला अटक केल्यानंतर वर्धेतील ले-आऊट बाबतीतील अनेक घबाड पोलीस चौकशीत बाहेर आणतील, अशी आशा वर्धेकरांना होती. सुरुवातीला सावंगी(मेघे) पोलिसांनी त्याच तोऱ्यात चौकशी केली. चौकशीत गोरखनाथ चौधरी याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने वर्धेतील ले-आऊटमधे कसे घबाड झालेले आहे याची इत्यंभूत माहिती पोलिसांपुढे उघड केल्याचेही पोलीस सूत्राने म्हणणे आहे. या अनुषंगाने ज्यांची नावे बयाणात पुढे आली त्यांना चौकशीसाठी बोलाविणे एखाद्या प्रकरणात क्रमप्राप्त ठरते. मात्र एकालाही चौकशीसाठी बोलाविल्याचे ऐकिवात नाही. ही बाब संबंधित ले-आऊट धारकांना माहिती होताच कारवाईच्या भीतीने सुमारे नऊजण वर्धेतून एकाएकी भूमिगत झाले. तब्बल आठ दिवस ही मंडळी ‘आॅऊट आॅफ कव्हरेज एरिया’ होती. दरम्यानच्या काळात त्यांनी प्रकरण दडपण्यासाठी जोरदार हालचाली केल्या. यामध्ये त्यांना यश आले. सदर प्रकरणाची चौकशी दडपण्यासाठी तब्बल ३० लाखांची तोडी झाल्याची माहिती विश्वसनीय पोलीस सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली. यानंतर आरोपीने याबाबत दिलेल्या बयाणात गडबड झाल्याचेही सूत्राने सांगितले. सदर प्रकरण निवळल्यानंतर सर्वजण वर्धेत दाखल झाले. आता ते निर्धास्त असल्याचेही सांगण्यात आले. नरहरशेट्टीवार प्रकरणात अनेक खळबळजनक बाबींचा उलगडा झाल्याचेही बोलले जात आहे. मात्र यानंतर पोलिसांनी सदर प्रकरण गांभिर्याने हाताळणे बंद केल्याचेही सूत्राचे म्हणणे आहे. नरहरशेट्टीवार प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी केल्यास अनेक धक्कादायक वास्तव पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र कुंपणच शेत खात असेल, तर दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(जिल्हा प्रतिनिधी) पोलीस अधीक्षकांची भूमिका अद्यापही मवाळ नरहरशेट्टीवार प्रकरण हे वर्धा पोलिसांसाठी अभिमानाची बाब ठरणारी होती. याप्रकरणात अनेक धक्कादायक वास्तव पुढे येणार हे वर्धेकर गृहीत धरुन होते. मात्र प्रकरणात पोलीस अधीक्षकांचीच भूमिका मवाळच दिसली. सावंगी ठाणेदाराने जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे यांना अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे गेली आहे. यानंतर एका दुचाकीस्वाराला नशेत असल्याचे सांगून बेदम मारहाण केली यात त्याचा हात मोडला. याचीही तक्रार पोलीस अधीक्षकांकडे गेलेली आहे. इतकेच नव्हे, तर सदर दुचाकीस्वाराच्या मित्राला सावंगी ठाण्यात बोलावून त्यांच्याकडून नशेत असल्यामुळे दुचाकीला अपघात झाल्याचे बयाण नोंदवून घेतल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. या सर्व प्रकरणात पोलीस अधीक्षक इतके मवाळ कसे काय, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तपासच संशयास्पद वर्धा शहरात विक्री अलीकडच्या काळातील असताना एनए मात्र त्याहीपेक्षा जुना आहे. ही बाब यापूर्वीच वर्धेत परिविक्षाधिन अधिकारी असताना शिवशंकर यांनी उघडकीस आणली होती. नरहरशेट्टीवार यांच्या प्रकरणाच्या निमित्ताने सदर बाब चौकशीत येणे अनिवार्य असताना याबाबत पोलीस खोलात जावून चौकशी का करीत नाही, असा सवाल संशयाला बळ देणारा असल्याचेही बोलले जात आहे.