शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
6
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
7
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
8
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
10
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
11
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
12
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
13
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
14
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
15
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
16
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
17
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
18
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
19
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
20
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?

३ हजार मातांना मिळाली जननी सुरक्षा

By admin | Updated: February 23, 2017 00:51 IST

ग्रामीण भागासह शहरी भागात संस्थात्मक प्रसुतींना वाव मिळावा यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून जननी सुरक्षा

९ लाख ८४ हजार ३०० रुपयांच्या अनुदानाचे वाटप गौरव देशमुख   वर्धा ग्रामीण भागासह शहरी भागात संस्थात्मक प्रसुतींना वाव मिळावा यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून जननी सुरक्षा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून एप्रिल ते जानेवारी या १० महिन्यांच्या कालावधीत ३ हजार १३६ मातांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. जिल्ह्यातील ३ हजार १३६ मातांना जननी सुरक्षा योजनेमार्फत ९ लाख ८४ हजार ३०० रूपयांचे अनुदान देण्यात आले. आर्थिक विवंचनेमुळे गरजू कुटुंबातील गरोदर महिलेच्या आरोग्यावरील खर्च त्यांना झेपत नाही. अशा परिस्थितीत प्रसुती दरम्यान किंवा त्यापुर्वी मातेच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ नये म्हणून ही योजना आखण्यात आली. महिलेला योग्य पोषण आहार मिळावा. प्रसुती योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी योनजेतून अनुदान दिले जाते. गरोदर मातांना सुरक्षित प्रसुतीसाठी वेळोवेळी तपासणी आणि औषधोपचार मोफत देण्यात येतो. या योजनेतून गरोदर मातेला, गरोदरकाळ आणि प्रसुतीनंतरच्या कालावधीत आपला खर्च भागविण्यासाठी अनुदान वितरीत करण्यात येते. जिल्ह्यात ही योजना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या देखरीखीत राबविण्यात येत आहे. या योजनेतून दोन जिवंत अपत्यापर्यंत लाभ दिला जातो. लाभासाठी मातेचे वय १९ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. वय कमी असल्यास सदर महिला योजनेकरिता अपात्र ठरते. तसेच आरोग्य संस्थेत प्रसुती केल्यावर महिलेला ७०० रूपये प्रोत्साहन म्हणून देण्यात येते. महिलेला प्रसुतीसाठी रूग्णालयात नेण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी टोल फ्री क्रमांक १०८ व १०२ वर संपर्क साधण्याची सुविधा आहे. जिल्ह्यात काही दुर्गम भागात प्रसुतीसाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध नसल्याने ही प्रसुती घरी होते. माता आणि बाळाच्या आरोग्यासाठी ही बाब धोकादायक असते. आरोग्य संस्थेत प्रसुती झाल्यास येथे योग्य काळजी घेतली जाते. अनुसूचित जाती-जमाती, दारिद्र्यरेषेखालील महिलांना या योजनेचा लाभ दिल्या जातो. आगामी काळात शहरी आणि ग्रामीण भागातील अधिकाधिक महिलांना याचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती संबंधितांनी दिली.