शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

४० पैकी ३० फूट रस्त्यावर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 06:00 IST

रुंदीकरण होऊनही बहुतांश रस्ता अतिक्रमणकर्त्यांनीच कवेत घेतल्याचे चित्र आहे. रस्त्यालगत सद्यस्थितीत नालीचे बांधकाम केली जात आहे. हे पूर्णत: सदोष आहे. नालीचे बांधकाम सरळ नव्हे, तर नागमोडी पद्धतीने होत आहे. रस्त्यापेक्षा नाल्याच उंच झाल्या आहेत. घरे खाली गेली आहेत.सांडपाणी वाहून जाण्याऐवजी रहिवाशांच्या थेट घरात शिरत आहे.

ठळक मुद्देआर्वी मार्गाचे रुंदीकरण ठरतेय व्यर्थ : दुभाजक बसविण्याकरिता कंत्राटदाराला सापडेना मुहूर्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी याकरिता आर्वी मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले; मात्र उद्देशच सार्थ होत नसल्याचे चित्र आहे. एकूण चाळीसपैकी तीस फूट मार्गाला अतिक्रमणाने विळखा घातलेला असतो. परिणामी, दररोज किरकोळ अपघाताच्या घटना घडतात.छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जुनापाणी चौकापर्यंतच्या रस्ता बांधकामाला मंजुरी मिळाली. आर्वी नाका चौक ते जुनापाणी रस्त्यापर्यंत रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. तब्बल ३५ कोटी रुपये या मार्गाच्या बांधकामावर खर्ची घालण्यात आले. मात्र, संपूर्ण बांधकाम नियोजनाच्या अभावातच पार पडले. रस्ता बांधकाम करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण काढण्यात आले नाही. पक्षपात करीत अतिक्रमणकर्त्यांना अभय देण्यात आले. अद्याप रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिक आणि रहिवाशांचे अतिक्रमण कायम असल्याने रस्ता रुंदीकरण खरेच झाले काय, असा प्रश्न पडतो. सायंकाळी एकेरी रस्त्यावर फेरीवाल्यांनी कब्जा केलेला असतो. यातच भाजी-फळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांची वाहने, यामुळे येथे दररोज वाहतूकव्यवस्था कोलमडते. त्यातच मोकाट जनावरांनी काही दिवसांपासून शहरातील विविध मार्ग आणि चौकात ठिय्या देणे सुरू केले आहे. या मार्गावरही मधोमध जनावरांचा मुक्काम असतो. त्यामुळे अद्याप वाहतुकीला मोकळा श्वास घेता येत नसल्याचे चित्र आहे. रुंदीकरण होऊनही बहुतांश रस्ता अतिक्रमणकर्त्यांनीच कवेत घेतल्याचे चित्र आहे. रस्त्यालगत सद्यस्थितीत नालीचे बांधकाम केली जात आहे. हे पूर्णत: सदोष आहे. नालीचे बांधकाम सरळ नव्हे, तर नागमोडी पद्धतीने होत आहे. रस्त्यापेक्षा नाल्याच उंच झाल्या आहेत. घरे खाली गेली आहेत.सांडपाणी वाहून जाण्याऐवजी रहिवाशांच्या थेट घरात शिरत आहे. कित्येक दिवसांपासून करून ठेवलेल्या खोदकामामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. बांधकामात असा अनागोंदी कारभार सुरू असताना बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचीही या प्रकाराला मूकसंमती दिसून येत आहे. आर्वी नाका ते जुना पाणी चौकापर्यंत रस्ता बांधकाम पूर्णत्वास जाऊन कित्येक महिने लोटले. मात्र, अद्याप दुभाजक बसविण्यात आले नाही.आर्वी नाका चौकात अतिक्रमणछत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाक्यापर्यंत एका बाजूने रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले. दुसºया बाजूने काम केले जात आहे. यामुळे वाहतुकीचा संपूर्ण ताण एकाच मार्गावर आहे. असे असताना चौकातील इटनकर पान पॅलेस, चहाटपऱ्यांसमोर अवैधरीत्या तासन्तास वाहने उभी दिसतात. यामुळेही वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. चौकात वाहतूक पोलिस तैनात असतात. त्यांचेही याकडे दुर्लक्ष आहे. कारवाई करण्याची मागणी होत आहे.मोकाट जनावरांची धरपकड कधी?शहरातील विविध मार्ग आणि चौकात मोकाट जनावरे ठिय्या मांडून बसत असून नागरिकांना त्यांनी अक्षरश: वेठीस धरले आहे. रहदारीला नित्याने अडथळा निर्माण होत असून दररोज कोणत्या ना कोणत्या भागात जनावरांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. मात्र, नगरपालिकेने अद्याप जनावरांची धरपकड सुरू केलेली नाही. त्यामुळे नागरिकांत संतापाची लाट आहे.फेरीवाल्यांवर कारवाई व्हावीआर्वी मार्गावर सायंकाळनंतर हातगाडीच्या माध्यमातून फळ, भाजी विकणाºयांकडून अतिक्रमण केले जाते. खरेदीकरिता ग्राहकही गर्दी करतात. ग्राहक वाहनेही हातगाडीपुढेच उभे करतात. यामुळे या मार्गावरील वाहतूक असुरक्षित झाली आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करीत रस्ता वाहतुकीकरिता मोकळा करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण