शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

४० पैकी ३० फूट रस्त्यावर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 06:00 IST

रुंदीकरण होऊनही बहुतांश रस्ता अतिक्रमणकर्त्यांनीच कवेत घेतल्याचे चित्र आहे. रस्त्यालगत सद्यस्थितीत नालीचे बांधकाम केली जात आहे. हे पूर्णत: सदोष आहे. नालीचे बांधकाम सरळ नव्हे, तर नागमोडी पद्धतीने होत आहे. रस्त्यापेक्षा नाल्याच उंच झाल्या आहेत. घरे खाली गेली आहेत.सांडपाणी वाहून जाण्याऐवजी रहिवाशांच्या थेट घरात शिरत आहे.

ठळक मुद्देआर्वी मार्गाचे रुंदीकरण ठरतेय व्यर्थ : दुभाजक बसविण्याकरिता कंत्राटदाराला सापडेना मुहूर्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी याकरिता आर्वी मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले; मात्र उद्देशच सार्थ होत नसल्याचे चित्र आहे. एकूण चाळीसपैकी तीस फूट मार्गाला अतिक्रमणाने विळखा घातलेला असतो. परिणामी, दररोज किरकोळ अपघाताच्या घटना घडतात.छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जुनापाणी चौकापर्यंतच्या रस्ता बांधकामाला मंजुरी मिळाली. आर्वी नाका चौक ते जुनापाणी रस्त्यापर्यंत रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. तब्बल ३५ कोटी रुपये या मार्गाच्या बांधकामावर खर्ची घालण्यात आले. मात्र, संपूर्ण बांधकाम नियोजनाच्या अभावातच पार पडले. रस्ता बांधकाम करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण काढण्यात आले नाही. पक्षपात करीत अतिक्रमणकर्त्यांना अभय देण्यात आले. अद्याप रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिक आणि रहिवाशांचे अतिक्रमण कायम असल्याने रस्ता रुंदीकरण खरेच झाले काय, असा प्रश्न पडतो. सायंकाळी एकेरी रस्त्यावर फेरीवाल्यांनी कब्जा केलेला असतो. यातच भाजी-फळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांची वाहने, यामुळे येथे दररोज वाहतूकव्यवस्था कोलमडते. त्यातच मोकाट जनावरांनी काही दिवसांपासून शहरातील विविध मार्ग आणि चौकात ठिय्या देणे सुरू केले आहे. या मार्गावरही मधोमध जनावरांचा मुक्काम असतो. त्यामुळे अद्याप वाहतुकीला मोकळा श्वास घेता येत नसल्याचे चित्र आहे. रुंदीकरण होऊनही बहुतांश रस्ता अतिक्रमणकर्त्यांनीच कवेत घेतल्याचे चित्र आहे. रस्त्यालगत सद्यस्थितीत नालीचे बांधकाम केली जात आहे. हे पूर्णत: सदोष आहे. नालीचे बांधकाम सरळ नव्हे, तर नागमोडी पद्धतीने होत आहे. रस्त्यापेक्षा नाल्याच उंच झाल्या आहेत. घरे खाली गेली आहेत.सांडपाणी वाहून जाण्याऐवजी रहिवाशांच्या थेट घरात शिरत आहे. कित्येक दिवसांपासून करून ठेवलेल्या खोदकामामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. बांधकामात असा अनागोंदी कारभार सुरू असताना बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचीही या प्रकाराला मूकसंमती दिसून येत आहे. आर्वी नाका ते जुना पाणी चौकापर्यंत रस्ता बांधकाम पूर्णत्वास जाऊन कित्येक महिने लोटले. मात्र, अद्याप दुभाजक बसविण्यात आले नाही.आर्वी नाका चौकात अतिक्रमणछत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाक्यापर्यंत एका बाजूने रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले. दुसºया बाजूने काम केले जात आहे. यामुळे वाहतुकीचा संपूर्ण ताण एकाच मार्गावर आहे. असे असताना चौकातील इटनकर पान पॅलेस, चहाटपऱ्यांसमोर अवैधरीत्या तासन्तास वाहने उभी दिसतात. यामुळेही वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. चौकात वाहतूक पोलिस तैनात असतात. त्यांचेही याकडे दुर्लक्ष आहे. कारवाई करण्याची मागणी होत आहे.मोकाट जनावरांची धरपकड कधी?शहरातील विविध मार्ग आणि चौकात मोकाट जनावरे ठिय्या मांडून बसत असून नागरिकांना त्यांनी अक्षरश: वेठीस धरले आहे. रहदारीला नित्याने अडथळा निर्माण होत असून दररोज कोणत्या ना कोणत्या भागात जनावरांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. मात्र, नगरपालिकेने अद्याप जनावरांची धरपकड सुरू केलेली नाही. त्यामुळे नागरिकांत संतापाची लाट आहे.फेरीवाल्यांवर कारवाई व्हावीआर्वी मार्गावर सायंकाळनंतर हातगाडीच्या माध्यमातून फळ, भाजी विकणाºयांकडून अतिक्रमण केले जाते. खरेदीकरिता ग्राहकही गर्दी करतात. ग्राहक वाहनेही हातगाडीपुढेच उभे करतात. यामुळे या मार्गावरील वाहतूक असुरक्षित झाली आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करीत रस्ता वाहतुकीकरिता मोकळा करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण