शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

२८ टक्के वाटप दाखविला ९१ टक्के

By admin | Updated: June 2, 2014 01:35 IST

जिल्ह्यात अतवृष्टीनंतर रबी पिकांना गारपीटमुळे प्रचंड झळ बसली. अनेकांचे उभे पीक भुईसपाट झाले.

जिल्ह्यात अतवृष्टीनंतर रबी पिकांना गारपीटमुळे प्रचंड झळ बसली. अनेकांचे उभे पीक भुईसपाट झाले. या नुकसानीचा तत्काळ सर्व्हे करून शेतकर्‍यांना मदत देण्याचे जाहीर केले. या घटनेला अडीच महिने पूर्ण झाले; मात्र शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. याचे खरे कारण माहिती अधिकारातून समोर आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २८ टक्के मदतीचे वाटप झाले असताना जिल्हा कृषी अधीक्षकांनी ९१ टक्के वाटप पूर्ण केल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांना पुरविली आहे. माहिती अधिकारातून कृषी अधीक्षकांचे पितळ उघडे पडले असून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

फेब्रुवारी व मार्च २0१४ या कालावधीत जिल्ह्यात पाऊस व गारपीट झाली. यात अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले. शासनाच्या नियमानुसार त्यांना मदत वाटप केल्याचा अहवाल २१ मे २0१४ रोजी जिल्हा कृषी अधीक्षकांनी जिल्हाधिकारी वर्धा, विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांना पाठविला. यामध्ये वर्धा तालुक्यात ५0 टक्के नुकसान आहे. शेतपीक नुकसानीचे क्षेत्र १४८५ हेक्टरआर आहे. याकरिता २ कोटी १ लाख रुपयांचा निधी मिळाला असून त्यापैकी १ कोटी ६९ लाख ८४ हजार रुपये शेतकर्‍यांना वाटप करण्यात आले आहे. वाटप करण्यात आलेल्या निधीची टक्केवारी ८५ असून शेतकरी संख्या २१३२ आहे.

सेलू तालुक्यात ९८४ हेक्टरआर नुकसानीपोटी एकूण १ कोटी ४0 लाख रुपयांपैकी शेतकर्‍यांना १00 टक्के वाटप झाल्याचे दाखविण्यात आले. शेतकरी संख्या १९२३ आहेत.

देवळी तालुक्यात ३८५.३0 हेक्टरआर नुकसानीपोटी एकूण ६0 लाख रुपयांपैकी ५५ लाख ५७ हजार वाटप केला असून त्याची ९२ टक्केवारी आहे. १३३५ शेतकरी संख्या आहे. आर्वी तालुक्यात सर्वाधिक ४११९ हेक्टरआर नुकसान झाले. या नुकसानीपोटी ६ कोटी १0 लाख रुपये निधी मिळाला. यापैकी ५ कोटी ८२ लाख रुपये वाटप झाले असून त्याची टक्केवारी ९५ आहे. शेतकरी संख्या ५,६३९ आहे.

आष्टी(श.) तालुक्यात २७१२.३0 हे. आर. नुकसान झाले आहे. याकरिता एकूण ४ कोटी ३0 लाख रुपये आले असून त्यापैकी शेतकर्‍यांना ३ कोटी ४९ लाख २0 हजार रुपये वाटप करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. वाटपाची टक्केवारी ८१ असून एकूण शेतकरी संख्या ४३८४ आहे. तालुक्यातील बँकांनी सीडी व हार्ड कॉपीमध्ये आणि इंग्रजीत नावांची यादी मागितली. या याद्या सादर करायला विलंब झाला. त्यामुळे आतापर्यंत अवघ्या २५ टक्के लोकांना वाटप झाले.

जिल्हा कृषी अधीक्षक ९१ टक्के वाटप पूर्ण झाल्याचे दाखवून दिशाभूल करीत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

कारंजा (घा.) तालुक्यात १७६२ हेक्टरआर नुकसान झाले असून २ कोटी ७0 लाख रुपये मिळाले आहे. त्यापैकी २ कोटी ५४ लाख ६९ हजार शेतकर्‍यांना वाटप करण्यात आला. वाटपाची टक्केवारी ९४ असून एकूण शेतकरीसंख्या ५७४३ दाखविली आहे. हिंगणघाट तालुक्यात ५९४.६५ हे.आर. नुकसान दाखविण्यात आले आहे. एकूण ८0 लाख निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी ६६ लाख ५६ हजार रुपये वाटप करण्यात आले. वाटपाची टक्केवारी ८३ आहे. एकूण शेतकरी संख्या १२८१ आहे. समुद्रपूर तालुक्यात शुन्य टक्के नुकसान झाल्याची आकडेवारी दाखविण्यात आली आहे.