शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेतील २,७९७ जोडप्यांनीच केली विवाह नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:41 IST

नवविवाहीत जोडप्यांनी नगर पालिका, महानगर पालिका तसेच ग्रामपंचायत या स्वराज्य संस्थांकडून विवाह नोंदणी करून घेण्याचा शासन आदेश असताना अनेक सुशिक्षित तरुण आणि तरुणी त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येते. शहरातील केवळ २ हजार ७९७ जोडप्यांनीच आतापर्यंत विवाह नोंदणी केल्याची नोंद स्थानिक न.प. प्रशासनाने घेतली आहे.

ठळक मुद्देशासनाच्या नियमांकडे पाठ : विवाहित मुलींच्या दृष्टीने नोंदणी महत्त्वाचीच

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवविवाहीत जोडप्यांनी नगर पालिका, महानगर पालिका तसेच ग्रामपंचायत या स्वराज्य संस्थांकडून विवाह नोंदणी करून घेण्याचा शासन आदेश असताना अनेक सुशिक्षित तरुण आणि तरुणी त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येते. शहरातील केवळ २ हजार ७९७ जोडप्यांनीच आतापर्यंत विवाह नोंदणी केल्याची नोंद स्थानिक न.प. प्रशासनाने घेतली आहे.विवाह नोंदणी संदर्भात पारदर्शकता यावी यासाठी काही नियमावली लादण्याचे सरकारच्या विचाराधीन असल्याचे सांगण्यात येते. त्याबाबतचा ठोस निर्णय झाल्यास नवीन नोंदणीसाठी नवविवाहितांना फरफटच करावी लागणार असल्याचे बोलल्या जाते. आधार कार्ड सारखे सध्या विवाह नोंदणी प्रमाणपत्र सरकारने सक्तीचे केले नसले तरी विविध कामांसाठी त्याची गरज भासत असल्याचे वास्तव आहे. पासपोर्टसह विविध कामांसाठी सदर प्रमाणपत्र आवश्यक आहे. असे असतानाही शहरी भागातील अनेक सुशिक्षित तरुण-तरुणी विवाह नोंदणीला फाटाच देत असल्याचे दिसून येते. विवाह नोंदणी प्रक्रिया अतिशय सोपी असली तरी तरुण मंडळींकडून ती किटकच असल्याची बोंब ठोकली जात आहे. नवविवाहित मुलींच्या दृष्टीने सदर नोंदणी महत्त्वाचीच आहे.नावातील बदलासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यकलग्नानंतर मुलीचे नाव व आडनाव बदलते. लग्नानंतर मुलीच्या बदललेल्या नावाची विविध कागदपत्रांवर दुरूस्ती करून घेणे यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक व महत्त्वाचेच ठरते. त्यामुळे प्रत्येकाने विवाहानंतर विवाहाची नोंदणी करणे गरजेचे आहे.विवाह नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रेविवाह नोंदणी यापूर्वी कोणत्याही निबंधकाकडे झालेली नसल्याबाबतचे शपथपत्र किंवा निबंधकाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.वर व वधूचे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, वाहनचालविण्याचा परवाना, वयोमर्यादेकरिता जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे.रहिवासी पुरावा म्हणून शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत, विद्युत किंवा टेलिफोनच्या देयकाची झेरॉक्स प्रत गरजेची आहे.लग्नाची पत्रिका व पत्रिका नसल्यास १०० रुपयांचे शपथपत्र, लग्नाचे छायाचित्र आवश्यक आहे.वधू व वराचे पाच तसेच साक्षीदारांचे प्रत्येकी दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, साक्षीदारांचे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र तसेच वधू किंवा वर घटस्फोटीत असल्यास त्याचा आदेश, वधू किंवा वर विधवा, विधूर असल्यास पूर्वीच्या जोडीदाराचे मृत्यू प्रमाणपत्र तसेच न.प.मालमत्ता कर भरल्याची पावती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.