शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

वर्धेतील २,७९७ जोडप्यांनीच केली विवाह नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:41 IST

नवविवाहीत जोडप्यांनी नगर पालिका, महानगर पालिका तसेच ग्रामपंचायत या स्वराज्य संस्थांकडून विवाह नोंदणी करून घेण्याचा शासन आदेश असताना अनेक सुशिक्षित तरुण आणि तरुणी त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येते. शहरातील केवळ २ हजार ७९७ जोडप्यांनीच आतापर्यंत विवाह नोंदणी केल्याची नोंद स्थानिक न.प. प्रशासनाने घेतली आहे.

ठळक मुद्देशासनाच्या नियमांकडे पाठ : विवाहित मुलींच्या दृष्टीने नोंदणी महत्त्वाचीच

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवविवाहीत जोडप्यांनी नगर पालिका, महानगर पालिका तसेच ग्रामपंचायत या स्वराज्य संस्थांकडून विवाह नोंदणी करून घेण्याचा शासन आदेश असताना अनेक सुशिक्षित तरुण आणि तरुणी त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येते. शहरातील केवळ २ हजार ७९७ जोडप्यांनीच आतापर्यंत विवाह नोंदणी केल्याची नोंद स्थानिक न.प. प्रशासनाने घेतली आहे.विवाह नोंदणी संदर्भात पारदर्शकता यावी यासाठी काही नियमावली लादण्याचे सरकारच्या विचाराधीन असल्याचे सांगण्यात येते. त्याबाबतचा ठोस निर्णय झाल्यास नवीन नोंदणीसाठी नवविवाहितांना फरफटच करावी लागणार असल्याचे बोलल्या जाते. आधार कार्ड सारखे सध्या विवाह नोंदणी प्रमाणपत्र सरकारने सक्तीचे केले नसले तरी विविध कामांसाठी त्याची गरज भासत असल्याचे वास्तव आहे. पासपोर्टसह विविध कामांसाठी सदर प्रमाणपत्र आवश्यक आहे. असे असतानाही शहरी भागातील अनेक सुशिक्षित तरुण-तरुणी विवाह नोंदणीला फाटाच देत असल्याचे दिसून येते. विवाह नोंदणी प्रक्रिया अतिशय सोपी असली तरी तरुण मंडळींकडून ती किटकच असल्याची बोंब ठोकली जात आहे. नवविवाहित मुलींच्या दृष्टीने सदर नोंदणी महत्त्वाचीच आहे.नावातील बदलासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यकलग्नानंतर मुलीचे नाव व आडनाव बदलते. लग्नानंतर मुलीच्या बदललेल्या नावाची विविध कागदपत्रांवर दुरूस्ती करून घेणे यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक व महत्त्वाचेच ठरते. त्यामुळे प्रत्येकाने विवाहानंतर विवाहाची नोंदणी करणे गरजेचे आहे.विवाह नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रेविवाह नोंदणी यापूर्वी कोणत्याही निबंधकाकडे झालेली नसल्याबाबतचे शपथपत्र किंवा निबंधकाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.वर व वधूचे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, वाहनचालविण्याचा परवाना, वयोमर्यादेकरिता जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे.रहिवासी पुरावा म्हणून शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत, विद्युत किंवा टेलिफोनच्या देयकाची झेरॉक्स प्रत गरजेची आहे.लग्नाची पत्रिका व पत्रिका नसल्यास १०० रुपयांचे शपथपत्र, लग्नाचे छायाचित्र आवश्यक आहे.वधू व वराचे पाच तसेच साक्षीदारांचे प्रत्येकी दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, साक्षीदारांचे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र तसेच वधू किंवा वर घटस्फोटीत असल्यास त्याचा आदेश, वधू किंवा वर विधवा, विधूर असल्यास पूर्वीच्या जोडीदाराचे मृत्यू प्रमाणपत्र तसेच न.प.मालमत्ता कर भरल्याची पावती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.