शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

४ हजार तूर उत्पादकांचे २६.५० कोटी थकले

By admin | Updated: June 19, 2017 01:07 IST

मान्सून दारात आहे. आर्थिक विवंचनेत पेरणी करण्याचे संकट घोंगावत असताना तालुक्यातील ४ हजार तूर

हंगामाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : मान्सून दारात आहे. आर्थिक विवंचनेत पेरणी करण्याचे संकट घोंगावत असताना तालुक्यातील ४ हजार तूर उत्पादकांचे तब्बल २६ कोटी ५० लाख रुपयांचे चुकारे शासनाकडे अडकले आहेत. त्यांना थकीत चुकाऱ्याची रक्कम व्याजासह देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तुरीला मिळालेल्या उत्तम दरामुळे गत हंगामात शेतकऱ्यांनी तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले होते. परंतु शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे तूर उत्पादक अडचणीत आला. शेतकऱ्यांची तूर बाजारात येताच भाव गडगडले. व्यापारी हमी भावापेक्षा हजार रुपये कमी दराने तुरीची खरेदी करीत होते. यामुळे होणारी लुट टाळण्याची मागणी करीत शासकीय खरेदीची मागणी करण्यात आली. यात शासनाने आपण शेतकऱ्यांच्या पाठशी आहो, असे दर्शवित ३ जानेवारी २०१७ पासून २२ एप्रिल पर्यंत नाफेडच्या माध्यमातून तुरीची खरेदी केली. यात तालुक्यातील २ हजार ४७८ शेतकऱ्यांकडून नाफेडने ४२ हजार ४७१ क्विंटल तुरीची खरेदी केली; परंतु विविध कारणांनी ही तूर खरेदी रखडल्याने योजना बंद करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांत पुन्हा असंतोष उफाळून आला. मोठ्या प्रमाणात ओरड झाल्यानंतर राज्य शासनाने बाजारात तूर असलेल्या शेतकऱ्यांना टोकन दिले. या पद्धतीने २३ एप्रिल ते ६ जून पर्यंत खरेदी केली. या पूर्वी शासनाने नाफेड व एफसीआयच्या माध्यमातून येथील ३ हजार ३९८ शेतकऱ्यांकडून ४४ हजार ५५९.५८ क्विंटल तूर खरेदी केली. परंतु चुकारे मात्र २० एप्रिल २०१७ पर्यंत खरेदी केलेल्या तुरीचेच देण्यात आले. यामुळे तालुक्यातील जवळपास ४ हजार शेतकऱ्यांचे २६ कोटी ५० लाख रुपयांचे तुरीचे चुकारे शासनाकडे थकीत आहेत. शेती हंगाम सुरू झाला आहे. बँका कर्ज देत नाही, सावकारांनी शासन बडग्याची मोठी धास्ती घेतली आहे, अशा स्थितीत तुरीचे चुकारेच शेतकऱ्यांकरिता आधार असताना शासन सुद्धा दगा देत आहे. त्यामुळे आता पर्याय काय असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.