शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

४ हजार तूर उत्पादकांचे २६.५० कोटी थकले

By admin | Updated: June 19, 2017 01:07 IST

मान्सून दारात आहे. आर्थिक विवंचनेत पेरणी करण्याचे संकट घोंगावत असताना तालुक्यातील ४ हजार तूर

हंगामाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : मान्सून दारात आहे. आर्थिक विवंचनेत पेरणी करण्याचे संकट घोंगावत असताना तालुक्यातील ४ हजार तूर उत्पादकांचे तब्बल २६ कोटी ५० लाख रुपयांचे चुकारे शासनाकडे अडकले आहेत. त्यांना थकीत चुकाऱ्याची रक्कम व्याजासह देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तुरीला मिळालेल्या उत्तम दरामुळे गत हंगामात शेतकऱ्यांनी तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले होते. परंतु शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे तूर उत्पादक अडचणीत आला. शेतकऱ्यांची तूर बाजारात येताच भाव गडगडले. व्यापारी हमी भावापेक्षा हजार रुपये कमी दराने तुरीची खरेदी करीत होते. यामुळे होणारी लुट टाळण्याची मागणी करीत शासकीय खरेदीची मागणी करण्यात आली. यात शासनाने आपण शेतकऱ्यांच्या पाठशी आहो, असे दर्शवित ३ जानेवारी २०१७ पासून २२ एप्रिल पर्यंत नाफेडच्या माध्यमातून तुरीची खरेदी केली. यात तालुक्यातील २ हजार ४७८ शेतकऱ्यांकडून नाफेडने ४२ हजार ४७१ क्विंटल तुरीची खरेदी केली; परंतु विविध कारणांनी ही तूर खरेदी रखडल्याने योजना बंद करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांत पुन्हा असंतोष उफाळून आला. मोठ्या प्रमाणात ओरड झाल्यानंतर राज्य शासनाने बाजारात तूर असलेल्या शेतकऱ्यांना टोकन दिले. या पद्धतीने २३ एप्रिल ते ६ जून पर्यंत खरेदी केली. या पूर्वी शासनाने नाफेड व एफसीआयच्या माध्यमातून येथील ३ हजार ३९८ शेतकऱ्यांकडून ४४ हजार ५५९.५८ क्विंटल तूर खरेदी केली. परंतु चुकारे मात्र २० एप्रिल २०१७ पर्यंत खरेदी केलेल्या तुरीचेच देण्यात आले. यामुळे तालुक्यातील जवळपास ४ हजार शेतकऱ्यांचे २६ कोटी ५० लाख रुपयांचे तुरीचे चुकारे शासनाकडे थकीत आहेत. शेती हंगाम सुरू झाला आहे. बँका कर्ज देत नाही, सावकारांनी शासन बडग्याची मोठी धास्ती घेतली आहे, अशा स्थितीत तुरीचे चुकारेच शेतकऱ्यांकरिता आधार असताना शासन सुद्धा दगा देत आहे. त्यामुळे आता पर्याय काय असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.