शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
3
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
4
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
5
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
6
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
7
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
8
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
9
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
10
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
11
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
12
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
13
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
14
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
15
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
16
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
17
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
18
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
19
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
20
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

चार महिन्यांत २६२ लिकेजेसची दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:05 IST

शहरातील नागरिकांना वर्धा नगर परिषद प्रशासनाच्यावतीने नळ योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केल्या जातो. असे असले तरी शहरातील विविध भागात असलेली काही जलवाहिनी सुमारे ५० वर्ष जुनी असल्याने त्यात तांत्रिक दोष निर्माण होतो. असेच तांत्रिक दोष असलेले जलवाहिनीतील २६२ लिकेजेस वर्धा न.प. प्रशासनाने मागील चार महिन्यांच्या कालावधीत दुरूस्त केले. लिकेजेस दुरूस्तीसाठी कंत्राटदार नियुक्त केला असला तरी दुरूस्तीच्या कामावर न.प.ला लाखोंचा भुर्दंडच सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देन.प.ला लाखोंचा भुर्दंड : जुनी जलवाहिनी वाढवतेय डोकेदुखी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील नागरिकांना वर्धा नगर परिषद प्रशासनाच्यावतीने नळ योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केल्या जातो. असे असले तरी शहरातील विविध भागात असलेली काही जलवाहिनी सुमारे ५० वर्ष जुनी असल्याने त्यात तांत्रिक दोष निर्माण होतो. असेच तांत्रिक दोष असलेले जलवाहिनीतील २६२ लिकेजेस वर्धा न.प. प्रशासनाने मागील चार महिन्यांच्या कालावधीत दुरूस्त केले. लिकेजेस दुरूस्तीसाठी कंत्राटदार नियुक्त केला असला तरी दुरूस्तीच्या कामावर न.प.ला लाखोंचा भुर्दंडच सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे.वर्धा शहरातील नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी न.प. प्रशासनाच्यावतीने पवनार व येळाकेळी येथील धाम नदीच्या पात्रातून पाण्याची उचल केली जाते. सदर पाण्यावर शुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केल्या जातो. असे असले तरी वर्धा शहरातील काही जलवाहिनी इंग्रजकालीन तर काही सुमारे ५० वर्ष जुनी असल्याने त्या जलवाहिनीत वेळोवेळी तांत्रिक बिघाड होतात. नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सध्या अमृत योजनेच्या माध्यमातून वर्धा शहरात होत असले तरी जुनी जलवाहिनी न.प. प्रशासनाच्या अडचणीत भर टाकणारीच ठरत आहे. सप्टेंबर २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत जलवाहिनी फुटल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर तब्बल २६२ लिकेजेसची दुरूस्ती करण्यात आली. सदर लिकेजेस दुरूस्तीचे काम न.प. प्रशासनाने वर्ध्यातीच सेवा कस्ट्रक्शन नामक एजन्सीला दिले आहे.सदर कंत्राटदाराकडून दुरूस्तीचे साहित्य व मनुष्यबळ पुरवित दुरूस्तीचे काम पूर्ण केले जात असल्याचे सांगण्यात आले. जलवाहिनीच्या लिकेजेसचे वेळीच दुरूस्ती करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत झाली आहे.तक्रारीची घेतली जातेय वेळीच दखलजलवाहिनीमध्ये दोष निर्माण होऊन पाण्याचा अपव्यय होत असल्याची तक्रार प्राप्त होताच न.प. प्रशासन सदर तक्रारीची दखल घेवून कंत्राटदाराच्या माध्यमातून दुरूस्तीचे काम पूर्ण करते.ऐरवी दोन दिवसात दुरूस्तीचे काम पूर्ण केले जाते. मात्र, जलवाहिनीतील तांत्रिक दोष मोठा असल्यास त्याला जास्त वेळ लागत असल्याचे सांगण्यात आले.जलवाहिनीच्या लिकेजेसच्या दुरूस्तीचा कंत्राट देण्यात आला आहे. कंत्राटदाराच्या माध्यमातून दुरूस्तीचे काम केले जाते. मागील चार महिन्यात सुमारे २६२ लिकेजेसची दुरूस्ती करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त होताच तक्रारीची दखल घेवून दुरूस्ती केले जाते. वेळीच दुरूस्ती झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत झाली आहे.- नीलेश नंदनवार, अभियंता, न.प. पाणी पुरवठा, वर्धा.