शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

चार महिन्यांत २६२ लिकेजेसची दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:05 IST

शहरातील नागरिकांना वर्धा नगर परिषद प्रशासनाच्यावतीने नळ योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केल्या जातो. असे असले तरी शहरातील विविध भागात असलेली काही जलवाहिनी सुमारे ५० वर्ष जुनी असल्याने त्यात तांत्रिक दोष निर्माण होतो. असेच तांत्रिक दोष असलेले जलवाहिनीतील २६२ लिकेजेस वर्धा न.प. प्रशासनाने मागील चार महिन्यांच्या कालावधीत दुरूस्त केले. लिकेजेस दुरूस्तीसाठी कंत्राटदार नियुक्त केला असला तरी दुरूस्तीच्या कामावर न.प.ला लाखोंचा भुर्दंडच सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देन.प.ला लाखोंचा भुर्दंड : जुनी जलवाहिनी वाढवतेय डोकेदुखी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील नागरिकांना वर्धा नगर परिषद प्रशासनाच्यावतीने नळ योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केल्या जातो. असे असले तरी शहरातील विविध भागात असलेली काही जलवाहिनी सुमारे ५० वर्ष जुनी असल्याने त्यात तांत्रिक दोष निर्माण होतो. असेच तांत्रिक दोष असलेले जलवाहिनीतील २६२ लिकेजेस वर्धा न.प. प्रशासनाने मागील चार महिन्यांच्या कालावधीत दुरूस्त केले. लिकेजेस दुरूस्तीसाठी कंत्राटदार नियुक्त केला असला तरी दुरूस्तीच्या कामावर न.प.ला लाखोंचा भुर्दंडच सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे.वर्धा शहरातील नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी न.प. प्रशासनाच्यावतीने पवनार व येळाकेळी येथील धाम नदीच्या पात्रातून पाण्याची उचल केली जाते. सदर पाण्यावर शुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केल्या जातो. असे असले तरी वर्धा शहरातील काही जलवाहिनी इंग्रजकालीन तर काही सुमारे ५० वर्ष जुनी असल्याने त्या जलवाहिनीत वेळोवेळी तांत्रिक बिघाड होतात. नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सध्या अमृत योजनेच्या माध्यमातून वर्धा शहरात होत असले तरी जुनी जलवाहिनी न.प. प्रशासनाच्या अडचणीत भर टाकणारीच ठरत आहे. सप्टेंबर २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत जलवाहिनी फुटल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर तब्बल २६२ लिकेजेसची दुरूस्ती करण्यात आली. सदर लिकेजेस दुरूस्तीचे काम न.प. प्रशासनाने वर्ध्यातीच सेवा कस्ट्रक्शन नामक एजन्सीला दिले आहे.सदर कंत्राटदाराकडून दुरूस्तीचे साहित्य व मनुष्यबळ पुरवित दुरूस्तीचे काम पूर्ण केले जात असल्याचे सांगण्यात आले. जलवाहिनीच्या लिकेजेसचे वेळीच दुरूस्ती करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत झाली आहे.तक्रारीची घेतली जातेय वेळीच दखलजलवाहिनीमध्ये दोष निर्माण होऊन पाण्याचा अपव्यय होत असल्याची तक्रार प्राप्त होताच न.प. प्रशासन सदर तक्रारीची दखल घेवून कंत्राटदाराच्या माध्यमातून दुरूस्तीचे काम पूर्ण करते.ऐरवी दोन दिवसात दुरूस्तीचे काम पूर्ण केले जाते. मात्र, जलवाहिनीतील तांत्रिक दोष मोठा असल्यास त्याला जास्त वेळ लागत असल्याचे सांगण्यात आले.जलवाहिनीच्या लिकेजेसच्या दुरूस्तीचा कंत्राट देण्यात आला आहे. कंत्राटदाराच्या माध्यमातून दुरूस्तीचे काम केले जाते. मागील चार महिन्यात सुमारे २६२ लिकेजेसची दुरूस्ती करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त होताच तक्रारीची दखल घेवून दुरूस्ती केले जाते. वेळीच दुरूस्ती झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत झाली आहे.- नीलेश नंदनवार, अभियंता, न.प. पाणी पुरवठा, वर्धा.