शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

विशेष निधीतून जिल्ह्याला २५ कोटी

By admin | Updated: September 11, 2015 02:35 IST

शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेल्या ५ हजार ६४६ कृषी वीज जोडण्या देण्याबाबत कालबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे.

वर्धा : शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेल्या ५ हजार ६४६ कृषी वीज जोडण्या देण्याबाबत कालबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी विशेष निधीतून २५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सोबतच इन्फ्रा दोन साठीही २२ कोटी रुपयांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी महावितरण आणि पारेषणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.महावितरण कंपनीमध्ये रिक्त असलेली पदे प्राधान्याने भरण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना संधी देण्याच्या दृष्टीने अधीक्षक अभियंत्यांनाच कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याचे अधिकार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, बेरोजगार अभियंत्यांना १५ लाख रुपयांपर्यंतची कामे देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. फिडर व्यवस्थापन योजनेंतर्गत कंत्राटदारांना यापुढे कामे न देता बेरोजगार अभियंत्यांमार्फतच ही कामे करण्यात येणार आहे. यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अधिक लोकाभिमूख होऊन आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांना प्राधान्याने विद्युत पुरवठा करावा. शिवाय त्यांना त्यांच्या मागणीनुसार सेवा पुरवाव्यात, अशा सूचना करताना ऊर्जा मंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील नादुरूस्त रोहित्र त्वरित बदलण्याच्या व दुरूस्तीच्या दृष्टीने तालुकास्तरावर विशेष विभाग करण्यात येणार आहे. विजेमुळे ज्या शेतकऱ्यांचा अपघात झाला आहे, त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घरी जाऊन सांत्वन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.वर्धा जिल्ह्यातील ग्राहकांच्या मागणीनुसार वीज पुरवठा, कृषी पंपांना वीज तसेच उद्योगांना नियमित वीज पुरवठा करण्यासाठी पाच वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यातील नवीन कामांसाठी १०० कोटी रुपये खर्च येणार आहे. महापारेषणतर्फे हिंगणघाट व वर्धा येथे २३ कोटी रुपयांची कामे सुरू आहे. रोहित्र क्षमतेत वाढ करणे, अतिरिक्त कॅपेसेटर बसविणे यासाठी मार्च अखेरपर्यंत ५६ कोटी खर्च करण्यात येणार आहेत. सोबतच नवीन कामांना ५० कोटी रुपयांची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. महावितरणतर्फे जिल्ह्यात अधिक सक्षमपणे विद्युत पुरवठा करण्याच्या दृष्टीने हा जिल्हा चंद्रपूर सर्कलमधून नागपूर शहराशी जोडण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर उभारताना त्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती गठित करण्यात आली आहे. सौरउर्जेवरील पंप उपलब्ध करून देण्यासाठी विशेष योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही उर्जामंत्री बावणकुळे यांनी यावेळी केले.(जिल्हा प्रतिनिधी)