शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

शेतकरी आत्महत्येच्या २५ प्रकरणांना मंजुरी

By admin | Updated: April 30, 2015 01:59 IST

शेतकरी आत्महत्या प्रकरणांसंदर्भात जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २७ प्रकरणांपैकी २५ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.

वर्धा : शेतकरी आत्महत्या प्रकरणांसंदर्भात जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २७ प्रकरणांपैकी २५ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. कानगाव येथील नानीभाई किसना भोयर यांच्या प्रकरणाचा फेरतपास तर सोरटा येथील मृतक अर्जुन गजानन चवरे यांचे प्रकरण जिल्हास्तरीय समितीने अपात्र ठरविले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत आमदार पंकज भोयर, डॉ. नंदकिशोर तोटे, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे सोहम पंड्या, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावाडकर, सहायक पोलीस अधीक्षक प्रदीप डोंगरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे उपस्थित होते. जिल्हास्तरीय समितीसमोर उपविभागीय महसूल अधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयातर्फे २७ प्रकरणे मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहेत. यात हिंगणघाट तहसील अंतर्गत पिपरी येथील विठ्ठल दुर्गे (८०), हिंगणघाट येथील सचिन तिमांडे (२५), अल्लीपूर येथील गुणवंत गिरडे (२४), कानगाव येथील जितेंद राळेकर (३२), देवळी तालुक्यातील येसगाव येथील अनुज राऊत (२३), समुद्रपूर तालुक्यातील कांढळीचे नाना इंगोले (७५), कोरा येथील रामू नखाते (७७), उमरी येथील रामचंद्र भोयर (५१), वर्धा तालुक्यातील दहेगावचे पंकज दाते (३०), धामणगाव वाठोडा येथील सुरेंद्र वानखेडे (३४), देवळी तालुक्यातील कोल्हापूरच्या अन्नपूर्णा मुरार (५२), आपटीचे पंकज निसारकर (२५), मुदलगावचे रमेश भिलकर (६५), गौळचे प्रवीण मोडक (४०) आष्टी तालुक्यातील सचिन पिसे (३०), माणिकवाड्याचे शंकर खवशी (४८), साहुर आष्टीचे विठ्ठल लवणकर (५५), सेलू तालुक्यात आर्वी (ल.) येथील दिनेश लहाने (४०), खैरीचे महादेव सयाम (५४), आर्वीचे नरेंद्र उपाध्ये (४५), प्रफुल्ल जयसिंगपुरे (३९) यांचा समावेश आहे. वर्धा तालुक्यातील सावलीचे शेख बसिरूद्दीन मयनुद्दीन (७०) आष्टी तालुक्यातील चिस्तूरचे अशोक माणिकराव भालेराव (५५) कारंजा तालुक्यातील एकांब्याचे हरिभाऊ विठोबाजी विरोळे ही प्रकरणे जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरविली आहेत. जिल्ह्यात जानेवारी २०१४ ते २८ एप्रिल २०१५ पर्यंत १७५ प्रकरणे सादर झाली असून त्यापैकी जिल्हास्तरीय समितीने १२२ प्रकरणे पात्र ठरवून त्यांना सानुग्रह मदत अनुदान मंजूर केले आहे. २३ प्रकरणे अपात्र ठरविली आहेत.(शहर प्रतिनिधी)