शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्येच्या २५ प्रकरणांना मंजुरी

By admin | Updated: April 30, 2015 01:59 IST

शेतकरी आत्महत्या प्रकरणांसंदर्भात जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २७ प्रकरणांपैकी २५ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.

वर्धा : शेतकरी आत्महत्या प्रकरणांसंदर्भात जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २७ प्रकरणांपैकी २५ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. कानगाव येथील नानीभाई किसना भोयर यांच्या प्रकरणाचा फेरतपास तर सोरटा येथील मृतक अर्जुन गजानन चवरे यांचे प्रकरण जिल्हास्तरीय समितीने अपात्र ठरविले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत आमदार पंकज भोयर, डॉ. नंदकिशोर तोटे, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे सोहम पंड्या, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावाडकर, सहायक पोलीस अधीक्षक प्रदीप डोंगरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे उपस्थित होते. जिल्हास्तरीय समितीसमोर उपविभागीय महसूल अधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयातर्फे २७ प्रकरणे मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहेत. यात हिंगणघाट तहसील अंतर्गत पिपरी येथील विठ्ठल दुर्गे (८०), हिंगणघाट येथील सचिन तिमांडे (२५), अल्लीपूर येथील गुणवंत गिरडे (२४), कानगाव येथील जितेंद राळेकर (३२), देवळी तालुक्यातील येसगाव येथील अनुज राऊत (२३), समुद्रपूर तालुक्यातील कांढळीचे नाना इंगोले (७५), कोरा येथील रामू नखाते (७७), उमरी येथील रामचंद्र भोयर (५१), वर्धा तालुक्यातील दहेगावचे पंकज दाते (३०), धामणगाव वाठोडा येथील सुरेंद्र वानखेडे (३४), देवळी तालुक्यातील कोल्हापूरच्या अन्नपूर्णा मुरार (५२), आपटीचे पंकज निसारकर (२५), मुदलगावचे रमेश भिलकर (६५), गौळचे प्रवीण मोडक (४०) आष्टी तालुक्यातील सचिन पिसे (३०), माणिकवाड्याचे शंकर खवशी (४८), साहुर आष्टीचे विठ्ठल लवणकर (५५), सेलू तालुक्यात आर्वी (ल.) येथील दिनेश लहाने (४०), खैरीचे महादेव सयाम (५४), आर्वीचे नरेंद्र उपाध्ये (४५), प्रफुल्ल जयसिंगपुरे (३९) यांचा समावेश आहे. वर्धा तालुक्यातील सावलीचे शेख बसिरूद्दीन मयनुद्दीन (७०) आष्टी तालुक्यातील चिस्तूरचे अशोक माणिकराव भालेराव (५५) कारंजा तालुक्यातील एकांब्याचे हरिभाऊ विठोबाजी विरोळे ही प्रकरणे जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरविली आहेत. जिल्ह्यात जानेवारी २०१४ ते २८ एप्रिल २०१५ पर्यंत १७५ प्रकरणे सादर झाली असून त्यापैकी जिल्हास्तरीय समितीने १२२ प्रकरणे पात्र ठरवून त्यांना सानुग्रह मदत अनुदान मंजूर केले आहे. २३ प्रकरणे अपात्र ठरविली आहेत.(शहर प्रतिनिधी)