शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

शेतकरी आत्महत्येच्या २५ प्रकरणांना मंजुरी

By admin | Updated: April 30, 2015 01:59 IST

शेतकरी आत्महत्या प्रकरणांसंदर्भात जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २७ प्रकरणांपैकी २५ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.

वर्धा : शेतकरी आत्महत्या प्रकरणांसंदर्भात जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २७ प्रकरणांपैकी २५ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. कानगाव येथील नानीभाई किसना भोयर यांच्या प्रकरणाचा फेरतपास तर सोरटा येथील मृतक अर्जुन गजानन चवरे यांचे प्रकरण जिल्हास्तरीय समितीने अपात्र ठरविले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत आमदार पंकज भोयर, डॉ. नंदकिशोर तोटे, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे सोहम पंड्या, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावाडकर, सहायक पोलीस अधीक्षक प्रदीप डोंगरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे उपस्थित होते. जिल्हास्तरीय समितीसमोर उपविभागीय महसूल अधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयातर्फे २७ प्रकरणे मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहेत. यात हिंगणघाट तहसील अंतर्गत पिपरी येथील विठ्ठल दुर्गे (८०), हिंगणघाट येथील सचिन तिमांडे (२५), अल्लीपूर येथील गुणवंत गिरडे (२४), कानगाव येथील जितेंद राळेकर (३२), देवळी तालुक्यातील येसगाव येथील अनुज राऊत (२३), समुद्रपूर तालुक्यातील कांढळीचे नाना इंगोले (७५), कोरा येथील रामू नखाते (७७), उमरी येथील रामचंद्र भोयर (५१), वर्धा तालुक्यातील दहेगावचे पंकज दाते (३०), धामणगाव वाठोडा येथील सुरेंद्र वानखेडे (३४), देवळी तालुक्यातील कोल्हापूरच्या अन्नपूर्णा मुरार (५२), आपटीचे पंकज निसारकर (२५), मुदलगावचे रमेश भिलकर (६५), गौळचे प्रवीण मोडक (४०) आष्टी तालुक्यातील सचिन पिसे (३०), माणिकवाड्याचे शंकर खवशी (४८), साहुर आष्टीचे विठ्ठल लवणकर (५५), सेलू तालुक्यात आर्वी (ल.) येथील दिनेश लहाने (४०), खैरीचे महादेव सयाम (५४), आर्वीचे नरेंद्र उपाध्ये (४५), प्रफुल्ल जयसिंगपुरे (३९) यांचा समावेश आहे. वर्धा तालुक्यातील सावलीचे शेख बसिरूद्दीन मयनुद्दीन (७०) आष्टी तालुक्यातील चिस्तूरचे अशोक माणिकराव भालेराव (५५) कारंजा तालुक्यातील एकांब्याचे हरिभाऊ विठोबाजी विरोळे ही प्रकरणे जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरविली आहेत. जिल्ह्यात जानेवारी २०१४ ते २८ एप्रिल २०१५ पर्यंत १७५ प्रकरणे सादर झाली असून त्यापैकी जिल्हास्तरीय समितीने १२२ प्रकरणे पात्र ठरवून त्यांना सानुग्रह मदत अनुदान मंजूर केले आहे. २३ प्रकरणे अपात्र ठरविली आहेत.(शहर प्रतिनिधी)