शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

५१४ ग्रा.पं.ना व्याजासह २४.४१ कोटी

By admin | Updated: February 6, 2016 02:12 IST

ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून १४ व्या वित्त आयोगामार्फत थेट ग्रामपंचायतींना निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

१४ वा वित्त आयोग : सिमेंट रस्ते झाले हद्दपार; स्वच्छतेच्या कामांना प्राधान्यअमोल सोटे वर्धा ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून १४ व्या वित्त आयोगामार्फत थेट ग्रामपंचायतींना निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या आयोगांतर्गत वितरीत करण्यात येत असलेल्या निधीचे दोन टप्पे जिल्ह्याला प्राप्त झाले होते. त्याच्या वितरणाचे मार्गदर्शन आले नसल्याने ते रखडले होते. जिल्हा परिषदेला आता नव्याने मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. यात पहिल्या व दुसऱ्या हप्त्याचे मिळून २४ कोटी २० लाख व त्यावरील व्याज २१ लाख २२ हजार २३१ रुपये असे एकूण २४.४१ कोटी रुपयांचे वितरण करण्यात येत आहे. तशा सूचना बँकांना देण्यात आल्याची माहिती आहे. ग्रामपंचायतींना देण्यात येणार असलेल्या निधीतून सिमेंट रस्त्यांचे काम बाद करण्यात आली आहेत. प्राप्त होणाऱ्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. यात पाणीपुरवठ्याच्या स्त्रोताच्या बळकटीकरणावर अधिक भर देण्याच्या सूचना आहेत. जिल्ह्यात एकूण ५१४ ग्रामंपचायती आहेत. नवीन कर वसुलीच्या नियमांमुळे गत दीड वर्षांपासून घराची करवसुली स्थगित आहे. यामुळे ग्रामपंचायतीजवळ निधी नसल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अशात आता हा निधी मिळणार असल्याने गावांच्या विकासाला गती मिळणार असल्याचे बोलले जात आहे. पाणी पुरवठा योजनांवर दिला भरग्रामपंचायतींच्या बळकटीकरणासाठी मूळ अनूदान व कामाच्या दर्जाचे अनुदान या दोन प्रकारच्या गँ्रटस् स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकूण निधीच्या ९० टक्केच निधी खर्च करता येईल. उर्वरित १० टक्के निधी ग्रामपंचायत खर्चासाठी राखीव ठेवावा लागणार आहे. यामध्ये पिण्याच्या पाण्यावर भर देण्यात आला आहे. पाणीपुरवठ्याच्या स्त्रोतांचा विकास करणे, पाणीपुरवठ्याश्ी संबंधित साधनांची दुरूस्ती करून कार्यवत करणे, वीज देयकात बचत होण्यासाठी सोलर पंप बसविणे, दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी पाणी शुद्धीकरण प्रकल्प बसविणे, आरओ प्रणाली अद्यावत करणे आदी कामे करावी लागणार आहेत. स्वच्छतेसंबंधी नियमामध्ये गावाच्या स्वच्छतेसाठी घनकचरा व्यवस्थापन करणे, गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविणे, डासमुक्त करण्यासाठी शोषखड्डे तयार करणे, ग्रामपंचायत भवन व अंगणवाडी बांधकाममध्ये ग्रा.पं. भवन नसेल अशा ठिकाणी ग्रा.पं. भवन बांधणे, तसेच अस्तित्वात असलेल्या ग्रा.पं. भवनाचा विस्तार करणे, ग्रा.पं. भवनास आवश्यक असलेले फर्निचर घेणे, अंगणवाडी इमारत बांधकाम करणे, दिवाबत्ती व सौरदिव्यांचा वापर करणे, ग्रामपंचायतींनी यापुर्वी जी कामे केले असतील अशा कामांवर एकूण अनुदानाच्या २० टक्के पेक्षा जास्त निधी खर्च करता येणार नाही.