शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

५१४ ग्रा.पं.ना व्याजासह २४.४१ कोटी

By admin | Updated: February 6, 2016 02:12 IST

ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून १४ व्या वित्त आयोगामार्फत थेट ग्रामपंचायतींना निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

१४ वा वित्त आयोग : सिमेंट रस्ते झाले हद्दपार; स्वच्छतेच्या कामांना प्राधान्यअमोल सोटे वर्धा ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून १४ व्या वित्त आयोगामार्फत थेट ग्रामपंचायतींना निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या आयोगांतर्गत वितरीत करण्यात येत असलेल्या निधीचे दोन टप्पे जिल्ह्याला प्राप्त झाले होते. त्याच्या वितरणाचे मार्गदर्शन आले नसल्याने ते रखडले होते. जिल्हा परिषदेला आता नव्याने मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. यात पहिल्या व दुसऱ्या हप्त्याचे मिळून २४ कोटी २० लाख व त्यावरील व्याज २१ लाख २२ हजार २३१ रुपये असे एकूण २४.४१ कोटी रुपयांचे वितरण करण्यात येत आहे. तशा सूचना बँकांना देण्यात आल्याची माहिती आहे. ग्रामपंचायतींना देण्यात येणार असलेल्या निधीतून सिमेंट रस्त्यांचे काम बाद करण्यात आली आहेत. प्राप्त होणाऱ्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. यात पाणीपुरवठ्याच्या स्त्रोताच्या बळकटीकरणावर अधिक भर देण्याच्या सूचना आहेत. जिल्ह्यात एकूण ५१४ ग्रामंपचायती आहेत. नवीन कर वसुलीच्या नियमांमुळे गत दीड वर्षांपासून घराची करवसुली स्थगित आहे. यामुळे ग्रामपंचायतीजवळ निधी नसल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अशात आता हा निधी मिळणार असल्याने गावांच्या विकासाला गती मिळणार असल्याचे बोलले जात आहे. पाणी पुरवठा योजनांवर दिला भरग्रामपंचायतींच्या बळकटीकरणासाठी मूळ अनूदान व कामाच्या दर्जाचे अनुदान या दोन प्रकारच्या गँ्रटस् स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकूण निधीच्या ९० टक्केच निधी खर्च करता येईल. उर्वरित १० टक्के निधी ग्रामपंचायत खर्चासाठी राखीव ठेवावा लागणार आहे. यामध्ये पिण्याच्या पाण्यावर भर देण्यात आला आहे. पाणीपुरवठ्याच्या स्त्रोतांचा विकास करणे, पाणीपुरवठ्याश्ी संबंधित साधनांची दुरूस्ती करून कार्यवत करणे, वीज देयकात बचत होण्यासाठी सोलर पंप बसविणे, दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी पाणी शुद्धीकरण प्रकल्प बसविणे, आरओ प्रणाली अद्यावत करणे आदी कामे करावी लागणार आहेत. स्वच्छतेसंबंधी नियमामध्ये गावाच्या स्वच्छतेसाठी घनकचरा व्यवस्थापन करणे, गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविणे, डासमुक्त करण्यासाठी शोषखड्डे तयार करणे, ग्रामपंचायत भवन व अंगणवाडी बांधकाममध्ये ग्रा.पं. भवन नसेल अशा ठिकाणी ग्रा.पं. भवन बांधणे, तसेच अस्तित्वात असलेल्या ग्रा.पं. भवनाचा विस्तार करणे, ग्रा.पं. भवनास आवश्यक असलेले फर्निचर घेणे, अंगणवाडी इमारत बांधकाम करणे, दिवाबत्ती व सौरदिव्यांचा वापर करणे, ग्रामपंचायतींनी यापुर्वी जी कामे केले असतील अशा कामांवर एकूण अनुदानाच्या २० टक्के पेक्षा जास्त निधी खर्च करता येणार नाही.