शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीचे २.३५ कोटी शिक्षण विभागाकडे जमा

By admin | Updated: March 22, 2017 00:57 IST

आदिवासी विद्यार्थ्याना शिक्षण घेताना आर्थिक अडचण जाऊ नये याकरिता शासनाच्यावतीने त्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

वर्धा : आदिवासी विद्यार्थ्याना शिक्षण घेताना आर्थिक अडचण जाऊ नये याकरिता शासनाच्यावतीने त्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्धेत मात्र तब्बल ७८४ शाळेतील विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपोटी २ कोटी ३५ लाख ४२ हजार ५०० रुपये प्राथमिक शिक्षण विभागाकडे जमा असल्याची माहिती प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाने दिली आहे. या शिष्यवृत्तीचे वाटप तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. शासनाच्या विशेष धोरणानुसार सन २०१५-१६ करीता सुवर्ण महोत्सवी आदिवासी माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेत जिल्ह्यातील १,०६५ शाळांमधील १६,०७३ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपोटी २ कोटी ५९ लाख ७ हजार ५०० रुपये एक वर्षापूर्वी मंजूर झाले आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडे जमा असलेल्या या रकमेतून केवळ २३ लाख ६५ हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. १ हजार ६५पैकी २८१ शाळांना शिष्यवृत्ती वर्धा : जिल्ह्याला प्राप्त झालेल्या रक्कमेतून १,०६५ पैकी केवळ २८१ शाळातील विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यामुळे अजूनही ७८४ शाळेतील विद्यार्थी लाभापासून वंचित आहेत. यामुळे अजूनही २ कोटी ३५ लाख ४२ हजार ५०० रुपये शिक्षण विभागाकडे जमा असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मारूती उईके यांनी दिली आहे. सन २०१५-१६ ची शिष्यवृत्ती सन २०१६-१७ संपत आली तरी अद्याप वितरीत झाली नाही. याबाबत प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे राज्याध्यक्ष अरूणकुमार हर्षबोधी यांनी मुख्यकार्यकारी नयना गुंडे यांना विचारणा केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे व प्राथमिक शिक्षणाधिकारी शेंडे यांनी आदिवासी विभाग, नागपूर यांच्याकडे माहे फेब्रुवारी २०१७ पर्यंत मंजूर शाळा व विद्यार्थ्यांची यादी प्राप्त न झाल्यामुळे ही शिष्यवृत्ती वितरणास विलंब झाल्याचे समोर आले आहे. परंतु, आता शाळा विद्यार्थ्यांची यादी प्राप्त झाल्यामुळे ३१ मार्च २०१७ पूर्वी संपूर्ण शिष्यवृत्तीचे वितरण करण्याचे आश्वासन त्यांनी हर्षबोधी यांना दिले. याचवेळी ३१ मार्च पर्यंत ही शिष्यवृत्ती वितरीत न झाल्यास प्रजासत्ताकतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा ईशाराही संघटनेद्वारे देण्यात आला. यावेळी संघटनेचे श्रीराम मेंढे, प्रकाश कांबळे, अरविंद माणिककुळे, धनंजय नाखले, सुनील तेलगोटे, मारोती उईके आदींसह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते(प्रतिनिधी).