शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
4
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
5
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
6
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
7
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
8
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
9
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
10
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
11
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
12
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
13
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
14
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
15
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
16
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
17
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
18
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
19
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
20
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी

शिष्यवृत्तीचे २.३५ कोटी शिक्षण विभागाकडे जमा

By admin | Updated: March 22, 2017 00:57 IST

आदिवासी विद्यार्थ्याना शिक्षण घेताना आर्थिक अडचण जाऊ नये याकरिता शासनाच्यावतीने त्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

वर्धा : आदिवासी विद्यार्थ्याना शिक्षण घेताना आर्थिक अडचण जाऊ नये याकरिता शासनाच्यावतीने त्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्धेत मात्र तब्बल ७८४ शाळेतील विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपोटी २ कोटी ३५ लाख ४२ हजार ५०० रुपये प्राथमिक शिक्षण विभागाकडे जमा असल्याची माहिती प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाने दिली आहे. या शिष्यवृत्तीचे वाटप तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. शासनाच्या विशेष धोरणानुसार सन २०१५-१६ करीता सुवर्ण महोत्सवी आदिवासी माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेत जिल्ह्यातील १,०६५ शाळांमधील १६,०७३ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपोटी २ कोटी ५९ लाख ७ हजार ५०० रुपये एक वर्षापूर्वी मंजूर झाले आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडे जमा असलेल्या या रकमेतून केवळ २३ लाख ६५ हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. १ हजार ६५पैकी २८१ शाळांना शिष्यवृत्ती वर्धा : जिल्ह्याला प्राप्त झालेल्या रक्कमेतून १,०६५ पैकी केवळ २८१ शाळातील विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यामुळे अजूनही ७८४ शाळेतील विद्यार्थी लाभापासून वंचित आहेत. यामुळे अजूनही २ कोटी ३५ लाख ४२ हजार ५०० रुपये शिक्षण विभागाकडे जमा असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मारूती उईके यांनी दिली आहे. सन २०१५-१६ ची शिष्यवृत्ती सन २०१६-१७ संपत आली तरी अद्याप वितरीत झाली नाही. याबाबत प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे राज्याध्यक्ष अरूणकुमार हर्षबोधी यांनी मुख्यकार्यकारी नयना गुंडे यांना विचारणा केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे व प्राथमिक शिक्षणाधिकारी शेंडे यांनी आदिवासी विभाग, नागपूर यांच्याकडे माहे फेब्रुवारी २०१७ पर्यंत मंजूर शाळा व विद्यार्थ्यांची यादी प्राप्त न झाल्यामुळे ही शिष्यवृत्ती वितरणास विलंब झाल्याचे समोर आले आहे. परंतु, आता शाळा विद्यार्थ्यांची यादी प्राप्त झाल्यामुळे ३१ मार्च २०१७ पूर्वी संपूर्ण शिष्यवृत्तीचे वितरण करण्याचे आश्वासन त्यांनी हर्षबोधी यांना दिले. याचवेळी ३१ मार्च पर्यंत ही शिष्यवृत्ती वितरीत न झाल्यास प्रजासत्ताकतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा ईशाराही संघटनेद्वारे देण्यात आला. यावेळी संघटनेचे श्रीराम मेंढे, प्रकाश कांबळे, अरविंद माणिककुळे, धनंजय नाखले, सुनील तेलगोटे, मारोती उईके आदींसह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते(प्रतिनिधी).