शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

शिष्यवृत्तीचे २.३५ कोटी शिक्षण विभागाकडे जमा

By admin | Updated: March 22, 2017 00:57 IST

आदिवासी विद्यार्थ्याना शिक्षण घेताना आर्थिक अडचण जाऊ नये याकरिता शासनाच्यावतीने त्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

वर्धा : आदिवासी विद्यार्थ्याना शिक्षण घेताना आर्थिक अडचण जाऊ नये याकरिता शासनाच्यावतीने त्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्धेत मात्र तब्बल ७८४ शाळेतील विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपोटी २ कोटी ३५ लाख ४२ हजार ५०० रुपये प्राथमिक शिक्षण विभागाकडे जमा असल्याची माहिती प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाने दिली आहे. या शिष्यवृत्तीचे वाटप तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. शासनाच्या विशेष धोरणानुसार सन २०१५-१६ करीता सुवर्ण महोत्सवी आदिवासी माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेत जिल्ह्यातील १,०६५ शाळांमधील १६,०७३ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपोटी २ कोटी ५९ लाख ७ हजार ५०० रुपये एक वर्षापूर्वी मंजूर झाले आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडे जमा असलेल्या या रकमेतून केवळ २३ लाख ६५ हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. १ हजार ६५पैकी २८१ शाळांना शिष्यवृत्ती वर्धा : जिल्ह्याला प्राप्त झालेल्या रक्कमेतून १,०६५ पैकी केवळ २८१ शाळातील विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यामुळे अजूनही ७८४ शाळेतील विद्यार्थी लाभापासून वंचित आहेत. यामुळे अजूनही २ कोटी ३५ लाख ४२ हजार ५०० रुपये शिक्षण विभागाकडे जमा असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मारूती उईके यांनी दिली आहे. सन २०१५-१६ ची शिष्यवृत्ती सन २०१६-१७ संपत आली तरी अद्याप वितरीत झाली नाही. याबाबत प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे राज्याध्यक्ष अरूणकुमार हर्षबोधी यांनी मुख्यकार्यकारी नयना गुंडे यांना विचारणा केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे व प्राथमिक शिक्षणाधिकारी शेंडे यांनी आदिवासी विभाग, नागपूर यांच्याकडे माहे फेब्रुवारी २०१७ पर्यंत मंजूर शाळा व विद्यार्थ्यांची यादी प्राप्त न झाल्यामुळे ही शिष्यवृत्ती वितरणास विलंब झाल्याचे समोर आले आहे. परंतु, आता शाळा विद्यार्थ्यांची यादी प्राप्त झाल्यामुळे ३१ मार्च २०१७ पूर्वी संपूर्ण शिष्यवृत्तीचे वितरण करण्याचे आश्वासन त्यांनी हर्षबोधी यांना दिले. याचवेळी ३१ मार्च पर्यंत ही शिष्यवृत्ती वितरीत न झाल्यास प्रजासत्ताकतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा ईशाराही संघटनेद्वारे देण्यात आला. यावेळी संघटनेचे श्रीराम मेंढे, प्रकाश कांबळे, अरविंद माणिककुळे, धनंजय नाखले, सुनील तेलगोटे, मारोती उईके आदींसह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते(प्रतिनिधी).