शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

२३३ वाहन चालकांचा परवाना केला निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 21:54 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना व वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वेळोवेळी विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांना फाटा देणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जाते. १ जानेवारी २०१८ ते १४ डिसेंबर २०१८ या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी कारवाई करून चक्क २३३ बेशिस्त वाहनचालकांचे परवानेच निलंबित केले आहे.

ठळक मुद्देआरटीओची कारवाई : वाहतुकीचे नियम न पाळणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना व वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वेळोवेळी विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांना फाटा देणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जाते. १ जानेवारी २०१८ ते १४ डिसेंबर २०१८ या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी कारवाई करून चक्क २३३ बेशिस्त वाहनचालकांचे परवानेच निलंबित केले आहे.दुचाकी प्रवासादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर महत्त्वाचा आहे. परंतु, पोलीस प्रशासनाकडून पोलीस अधीक्षकांची खांदेपालट झाल्यापासून हेल्मेट क्रमप्राप्त मोहीम थंडबस्त्यात पडल्याचे दिसून येते आहे. परंतु, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी हेल्मेटचे महत्त्व आणि दुचाकी चालकाची सुरक्षा हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून हेल्मेटचा वापर न करणाºया १८४ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून २९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणी सहा वाहनचालकांचा परवाना उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी निलंबित केला आहे. चारचाकीसह जड वाहन चालविताना सिटबेल्टचा वापर न करताना आढळून आल्याने सहा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करताना १७ वाहनचालक आढळून आल्याने त्यांच्याकडून २ हजारांचा दंडा आकारण्यात आला आहे. अवैध प्रवासी वाहतूक प्रकरणी ११७ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ लाख ३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यापैकी ४८ वाहनचालकांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. वाहनात क्षमतेपेक्षा जादा साहित्य भरून वाहतूक करणे हा कायदेशीर गुन्हाच आहे. परंतु, अनेक वाहनचालक वाहतुकीच्या या नियमाकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरतो. ओव्हरलोड वाहतूक प्रकरणी ४०२ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ कोटी ४६ लाख ६० हजारांचा दंड वसूल केला आहे. तर १६८ वाहनचालकांची परवाने निलंबित करण्यात आले आहेत. धोकादायक वाहतूक प्रकरणी नऊ जनांवर कारवाई करून १८ हजारांचा दंड वसूल करून आठ जणांचे वाहन चालविण्याचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.पथकाकडून या गोष्टींची होतेय तपासणीसुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी चालकाने वाहन चालविताना हेल्मेटचा वापर केला की नाही.वाहनचालविताना वाहनचालकाने सिटबेल्ट लावला की नाही.कुठला वाहनचालक वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करतो काय.वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत वाहन तर चालवित नाही ना.वाहन चालकाजवळ विमा आहे की नाही तसेच कुठला वाहनचालक अवैध प्रवासी वाहतूक तर करीत नाही.