शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

२३३ वाहन चालकांचा परवाना केला निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 21:54 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना व वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वेळोवेळी विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांना फाटा देणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जाते. १ जानेवारी २०१८ ते १४ डिसेंबर २०१८ या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी कारवाई करून चक्क २३३ बेशिस्त वाहनचालकांचे परवानेच निलंबित केले आहे.

ठळक मुद्देआरटीओची कारवाई : वाहतुकीचे नियम न पाळणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना व वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वेळोवेळी विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांना फाटा देणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जाते. १ जानेवारी २०१८ ते १४ डिसेंबर २०१८ या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी कारवाई करून चक्क २३३ बेशिस्त वाहनचालकांचे परवानेच निलंबित केले आहे.दुचाकी प्रवासादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर महत्त्वाचा आहे. परंतु, पोलीस प्रशासनाकडून पोलीस अधीक्षकांची खांदेपालट झाल्यापासून हेल्मेट क्रमप्राप्त मोहीम थंडबस्त्यात पडल्याचे दिसून येते आहे. परंतु, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी हेल्मेटचे महत्त्व आणि दुचाकी चालकाची सुरक्षा हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून हेल्मेटचा वापर न करणाºया १८४ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून २९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणी सहा वाहनचालकांचा परवाना उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी निलंबित केला आहे. चारचाकीसह जड वाहन चालविताना सिटबेल्टचा वापर न करताना आढळून आल्याने सहा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करताना १७ वाहनचालक आढळून आल्याने त्यांच्याकडून २ हजारांचा दंडा आकारण्यात आला आहे. अवैध प्रवासी वाहतूक प्रकरणी ११७ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ लाख ३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यापैकी ४८ वाहनचालकांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. वाहनात क्षमतेपेक्षा जादा साहित्य भरून वाहतूक करणे हा कायदेशीर गुन्हाच आहे. परंतु, अनेक वाहनचालक वाहतुकीच्या या नियमाकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरतो. ओव्हरलोड वाहतूक प्रकरणी ४०२ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ कोटी ४६ लाख ६० हजारांचा दंड वसूल केला आहे. तर १६८ वाहनचालकांची परवाने निलंबित करण्यात आले आहेत. धोकादायक वाहतूक प्रकरणी नऊ जनांवर कारवाई करून १८ हजारांचा दंड वसूल करून आठ जणांचे वाहन चालविण्याचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.पथकाकडून या गोष्टींची होतेय तपासणीसुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी चालकाने वाहन चालविताना हेल्मेटचा वापर केला की नाही.वाहनचालविताना वाहनचालकाने सिटबेल्ट लावला की नाही.कुठला वाहनचालक वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करतो काय.वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत वाहन तर चालवित नाही ना.वाहन चालकाजवळ विमा आहे की नाही तसेच कुठला वाहनचालक अवैध प्रवासी वाहतूक तर करीत नाही.