शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

१० महिन्यात २२४ नवजात बालकांचा मृत्यू

By admin | Updated: March 25, 2017 00:48 IST

नवजात बालकांचा मृत्यू रोखण्याकरिता शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने अनेक योजना राबविल्या जातात.

प्रमाण होतेय कमी : १६,१४९ प्रसुतींची नोंद रूपेश खैरी   वर्धा नवजात बालकांचा मृत्यू रोखण्याकरिता शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने अनेक योजना राबविल्या जातात. हे मृत्यू रोखण्यात या योजना तोकड्या पडत असल्याचे नोंदीवरून दिसत असले तरी वर्धेतील स्थिती तशी नसल्याचे दिसते. वर्धेत गत १० महिन्यात तब्बल २२४ नवजात बालकांच्या मृत्यूची नोंद झाली. शून्य ते एक वर्षे वयोगटातील बालकांची झालेली यंदाची नोंद ही गत चार वर्षांच्या तुलनेत कमी आहे. यामुळे नवजात बालकांचा मृत्यू रोखण्यात जिल्हा आघाडी घेत असल्याचे दिसते. प्रसूतीदरम्यान आलेल्या अडचणी आणि वेळेवर मिळत नसलेल्या उपचाराअभावी नवजात बालकांचा मृत्यू होतो, असे संशोधनातून समोर आले. या प्रकारावर आळा बसविण्याकरिता शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून विविध योजना राबविल्या जात आहे. राज्यात त्या अपयशी ठरत असल्या तरी वर्धेत त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. गत चार वर्षांत नवजात अर्भकांचे झालेले मृत्यू आणि सुरू वर्षातील नोंद विचारात घेता नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. वर्धा जिल्ह्यात गत १० महिन्यात १६ हजार १४९ प्रसूती झाल्या आहेत. त्यापैकी २२४ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्ह्याच्या आरोग्य विभागात आहे. शासनाच्या सुचनेनुसार राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात हा दर शून्य असणे अपेक्षित आहे. वर्धेत त्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे दिसते.