शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

वर्षभरात गांधी आश्रमला २.२३ लाख पर्यटकांची भेट

By admin | Updated: April 4, 2015 02:05 IST

येथील महात्मा गांधी यांचे आश्रम स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र होते. ते आता जगासाठी प्रेरणास्थान बनू पाहत आहे.

बापू कुटीची ‘क्रेझ’ कायम : देश-विदेशातील पर्यटकांची गर्दीदिलीप चव्हाण ल्ल सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांचे आश्रम स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र होते. ते आता जगासाठी प्रेरणास्थान बनू पाहत आहे. या बापू कुटीला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशपातळीवर महत्त्व असलेल्या या आश्रमला एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या काळात २ लाख २३ हजार ५८६ पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद आहे. महात्मा गांधी १९३६ मध्ये सेवाग्रामला आले. तिथे त्यांच्या वास्तव्याकरिता आश्रमची स्थापन करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने येथे कार्यकर्त्यांची संख्या वाढायला लागली. आश्रम व्रतांवर आधारित असल्यासने आश्रमीय जीवनाचा अंगिकार करून देशासाठी कार्यकर्ता आश्रमात घडू लागला. येथूनच रचनात्मक कार्यक्रमाची सुरुवात, स्वातंत्र्य चळवळीची दिशा, चर्चा, बैठका आदी या होवू लागले. १९४२ चा भारत छोडोचा ठरावही याच आश्रमात झाल्याचे इतिहास सांगत आहे. आश्रमात तब्बल दहा वर्ष बापूंचे वास्तव्य राहिले. बापंूची कर्मभूमी आणि वास्तू देशासाठीच नव्हे, तर विश्वासाठी दिशा देणारे प्रेरणास्थान बनले आहे. या आश्रमात आल्यावर वेगळीच उर्जा मिळते असे येथे येणाऱ्या पर्यटकांनी त्यांच्या प्रतिक्रीयेत लिहिले आहे. वर्धा शहराला लागून असलेल्या या सेवाग्राम आश्रमाला राजकीय व सामाजिक क्षेत्रात देशपातळीवर काम करणाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. आश्रमात यंदाच्या वर्षाला मोठमोठे चिंतन शिबिर झाले. येथूनच दिशा ठरवून देशपातळीवर करण्यात येणार असलेल्या मागण्यांसदर्भात मोर्चे काढण्यात आले. राजकीय क्षेत्रात राबविण्यात येणार असलेल्या नवनव्या अजेंड्यावरही याच आश्रम परिसरात चर्चा झाली. आश्रमातील साध्या जीवनशैलीमुळै अनेक जण भारावून गेले आहेत. आश्रमात कोणतीही मोठी व्यक्ती असो तिचे स्वागत करण्याची एकच प्रथा आहे. या प्रथेवरून आश्रमात आजही महात्मा गांधीच विचाराप्रमााणेच मोठा छोटा असा भेदभाव होत नसल्याचे दिसत आहे. अनेक चिंतन शिबिरातून झाली राष्ट्रीय विषयांवर चर्चाआश्रम परिसरात यंदाच्या सत्रात विविध विषयांवर चर्चा झाली. यात सध्या चर्चेत असलेल्या भूमी अधिग्रहण कायद्यासंदर्भात अण्णा हजारे यांनी याच आश्रमात त्यांच्या कार्यकर्त्यांची सभा घेतली. यावेळी मेधा पाटकर यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित झाले होते. या व्यतिरिक्त ग्वाल्हेर येथील एका मोठ्या शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी येथे वास्तवाकरिता होते. तर शेतकऱ्याच्या समस्यांवर राष्ट्रीय चर्चासत्रही होवून आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. शैक्षणिक सहलीही वाढल्या महात्मा गांधी यांच्या कार्याची व त्यांच्या साध्या जीवनशैलीची माहिती नवीन पिढीसाठी दिशादर्शक आहे. महात्मा गांधी यांच्या कार्याची माहिती पुस्तकातून होत असली तरी त्यांच्या जीवनाची खरी माहिती देणारे हे आश्रम आहे. असे म्हणत येथे यंदाच्या सत्रात शैक्षणिक सहलींची संख्या वाढली आहे. चिमुकल्यांनी येथे येत महात्मा गांधी यांच्या साध्या राहणीतून शिक्षा घ्यावी व भौगोलिक सुखाच्या अधीन होत असलेल्या नव्या पिढीला दिशा मिळावी, अशी अपेक्षा असल्याच्या प्रतिक्रीया येथे आलेल्या काही शिक्षकांनी नोंद वहीत दिल्या आहेत.