शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

२२ उमेदवारांची दांडी तर १,३५८ उमेदवारांनी दिली कोतवाल होण्यासाठी परीक्षा

By महेश सायखेडे | Updated: May 23, 2023 16:41 IST

पाच उपकेंद्रांवरून झाली शांततेत परीक्षा

वर्धा : जिल्ह्यातील कोतवालांच्या ८९ पदांसाठी मंगळवारी वर्धा शहरातील पाच उपकेंद्रांवरून प्रत्यक्ष लेखी परीक्षा घेण्यात आली. या पाचही उपकेंद्रांवर शांततेत कोतवाल पदभरतीची परीक्षा पार पडली असून संबंधित परीक्षेला २२ उमेदवारांची अनुपस्थिती होती. तर १ हजार ३८० उमेदवारांपैकी तब्बल १ हजार ३५८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील कोतवाल पदभरती प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असलेली परीक्षा ही ‘एमपीएससी’च्या धर्तीवर आणि पारदर्शीच व्हावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने प्रभावी नियोजन केले होते. मंगळवारी दुपारी १२ ते १ या वेळेत यशवंत महाविद्यालय वर्धा, न्यू इंग्लिश हायस्कूल वर्धा, न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज वर्धा, जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय वर्धा आणि गो. से. वाणिज्य महाविद्यालय वर्धा या उपकेंद्रावरील एकूण ६४ खोल्यांतून ही परीक्षा शांततेत पार पडली. संबंधित परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाचही परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त होता. शिवाय पाच परीक्षा केंद्रांवर प्रत्येकी एक असे पाच उपकेंद्रप्रमुख, २१ पर्यवेक्षक व अतिरिक्त पर्यवेक्षक, ६३ समवेक्षक व अतिरिक्त समवेक्षक, १० लिपिक, १५ शिपाई, आठ वाहनचालक आणि १० पोलिस कर्मचाऱ्यांनी सेवा दिली.

पॉईंटकुठल्या केंद्रावरून किती उमेदवारांनी दिली परीक्षा

* यशवंत महाविद्यालय, वर्धा : २६०* न्यू इंग्लिश हायस्कूल, वर्धा : ४२३* न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज, वर्धा : २३६* जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय, वर्धा : ३५६* गो. से. वाणिज्य महाविद्यालय, वर्धा : ८३कुठल्या केंद्रावरील किती उमेदवारांनी परीक्षेला दाखविली पाठ* यशवंत महाविद्यालय, वर्धा : ०४* न्यू इंग्लिश हायस्कूल, वर्धा : ०९* न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज, वर्धा : ०४* जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय, वर्धा : ०४* गो. से. वाणिज्य महाविद्यालय, वर्धा : ०१२४ तासांच्या आत तपासल्या उत्तरपत्रिका

मंगळवारी पाच परीक्षा उपकेंद्रांवरून कोतवाल पदभरती प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असलेली परीक्षा घेण्यात आली. दुपारी १२ ते १ या वेळेत ही परीक्षा झाली असली तरी त्यानंतर लगेच उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी जिल्हा कचेरीत करण्यात आली. संबंधित परीक्षेचा निकाल मंगळवारीच जाहीर करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाचा असला तरी वृत्तलिहिस्तोवर म्हणजेच दुपारी ४.१७ वाजेपर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर झाला नव्हता.

टॅग्स :examपरीक्षाwardha-acवर्धा