शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

२१ युनिटचे १६६ तर १८ युनिटचे ३३२ रुपये देयक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 23:46 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या-ना त्या कारणाने नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. आम्ही स्वच्छ; शुद्ध पाणी नागरिकांना देतो असे म्हणत कॉलर टाईट करणाऱ्या याच विभागाने आता जावाई शोध लावल्याचे एका प्रकरणावरून दिसून येत आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा जावईशोध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या-ना त्या कारणाने नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. आम्ही स्वच्छ; शुद्ध पाणी नागरिकांना देतो असे म्हणत कॉलर टाईट करणाऱ्या याच विभागाने आता जावाई शोध लावल्याचे एका प्रकरणावरून दिसून येत आहे. आॅक्टोबर महिन्यातील पाणी वापराचे देयक देताना याच विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिंदी (मेघे) येथील एका ग्राहकाला २१ युनिटचे ११६ रुपये तर दुसऱ्या ग्राहकाला १८ युनिटचे चक्क ३३२ रुपयांचे देयक दिले आहे. या प्रकरणी तक्रार देऊनही दुर्लक्ष केल्या जात असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.सविस्त वृत्त असे की, सिंदी (मेघे) येथील रहिवासी असलेल्या अरुण कुंभारे यांना १ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत १८ युनिट पाण्याचा वापर केल्याचे पुढे करीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने ३३२ रुपयांचे देयक देण्यात आले. तर याच गावातील रहिवासी असलेल्या विजय नामदेव मसराम यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने आॅक्टोबर महिन्याच्या २१ युनिट पाण्याच्या वापरासाठी १६६ रुपयांचे देयक दिले आहे. सदर दोन्ही देयकांवर जबाबदार अधिकारी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता विलास उमळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने पाण्याचे देयक देताना काहीतरी त्रुटी झाली असावी असे लक्षात येताच अरुण कुंभारे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यालय गाठून सदर समस्या अधिकाऱ्यांना सांगितली. परंतु, त्यांनाच दोषीच्या कठगड्यात उभे करून असभ्यतेची वागणून देण्यात आली.शिवाय उडवा-उडवीची उत्तरे देऊन परत पाठविण्यात आल्याच्या आशयाची तक्रार कुंभारे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. सदर प्रकरणाची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करून आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी तक्रारीतून केली आहे.देयकांमध्ये अनावधानाने त्रुट्या होतात. तसाच काहीसा प्रकार या प्रकरणी असावा. देयकांमधील त्रुट्या दुरूस्तीची जबाबदारी गायधने यांच्याकडे देण्यात आली आहे. देयकांमधील त्रुट्या त्यांच्या निदर्शनास ग्राहकांनी आणून द्याव्या. तात्काळ दुरूस्ती करण्यात येईल. कुण्या ग्राहकाला असभ्यतेची वागणूक देणे ही बाब निंदनियच आहे.- विलास उमाळे, उपविभागीय अभियंता, म. जी. प्रा. वर्धा.