शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

२१ युनिटचे १६६ तर १८ युनिटचे ३३२ रुपये देयक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 23:46 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या-ना त्या कारणाने नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. आम्ही स्वच्छ; शुद्ध पाणी नागरिकांना देतो असे म्हणत कॉलर टाईट करणाऱ्या याच विभागाने आता जावाई शोध लावल्याचे एका प्रकरणावरून दिसून येत आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा जावईशोध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या-ना त्या कारणाने नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. आम्ही स्वच्छ; शुद्ध पाणी नागरिकांना देतो असे म्हणत कॉलर टाईट करणाऱ्या याच विभागाने आता जावाई शोध लावल्याचे एका प्रकरणावरून दिसून येत आहे. आॅक्टोबर महिन्यातील पाणी वापराचे देयक देताना याच विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिंदी (मेघे) येथील एका ग्राहकाला २१ युनिटचे ११६ रुपये तर दुसऱ्या ग्राहकाला १८ युनिटचे चक्क ३३२ रुपयांचे देयक दिले आहे. या प्रकरणी तक्रार देऊनही दुर्लक्ष केल्या जात असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.सविस्त वृत्त असे की, सिंदी (मेघे) येथील रहिवासी असलेल्या अरुण कुंभारे यांना १ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत १८ युनिट पाण्याचा वापर केल्याचे पुढे करीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने ३३२ रुपयांचे देयक देण्यात आले. तर याच गावातील रहिवासी असलेल्या विजय नामदेव मसराम यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने आॅक्टोबर महिन्याच्या २१ युनिट पाण्याच्या वापरासाठी १६६ रुपयांचे देयक दिले आहे. सदर दोन्ही देयकांवर जबाबदार अधिकारी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता विलास उमळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने पाण्याचे देयक देताना काहीतरी त्रुटी झाली असावी असे लक्षात येताच अरुण कुंभारे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यालय गाठून सदर समस्या अधिकाऱ्यांना सांगितली. परंतु, त्यांनाच दोषीच्या कठगड्यात उभे करून असभ्यतेची वागणून देण्यात आली.शिवाय उडवा-उडवीची उत्तरे देऊन परत पाठविण्यात आल्याच्या आशयाची तक्रार कुंभारे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. सदर प्रकरणाची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करून आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी तक्रारीतून केली आहे.देयकांमध्ये अनावधानाने त्रुट्या होतात. तसाच काहीसा प्रकार या प्रकरणी असावा. देयकांमधील त्रुट्या दुरूस्तीची जबाबदारी गायधने यांच्याकडे देण्यात आली आहे. देयकांमधील त्रुट्या त्यांच्या निदर्शनास ग्राहकांनी आणून द्याव्या. तात्काळ दुरूस्ती करण्यात येईल. कुण्या ग्राहकाला असभ्यतेची वागणूक देणे ही बाब निंदनियच आहे.- विलास उमाळे, उपविभागीय अभियंता, म. जी. प्रा. वर्धा.