शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

२०० भिंती झाल्या बोलक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:58 IST

शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने वर्धा नगर पालिका व बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी ‘आलेखन’ या भिंती चित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देस्वच्छतेचा संदेश : वर्धा न.प. व बा.दे. अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने वर्धा नगर पालिका व बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी ‘आलेखन’ या भिंती चित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकाच दिवशी शहरातील सुमारे २०० भिंतींवर एकापेक्षा एक चित्र रेखाटून त्या बोलक्या केल्या. सध्या या भिंती नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देत आहेत.‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ या विषयावर आधारीत आलेखन या भिंती चित्र स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी सकाळी १० वाजता नगराध्यक्ष अतुल तराळे, न. प. उपाध्यक्ष प्रदिपसिंग ठाकुर, न. प. आरोग्य सभापती गुंजन मिसाळ, न. प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, माजी न. प. सभापती श्रेया देशमुख, नगरसेवक परवेझ खान, प्रदीप जग्यासी आदींच्या प्रमुख उपस्थितीत न. प. कार्यालय परिसरात झाले. याप्रसंगी नगराध्यक्ष अतुल तराळे, न. प. आरोग्य सभापती गुंजन मिसाळ व मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मान्यवरांनी स्वच्छतेचे महत्त्व विषद केले. त्यानंतर स्पर्धेत सहभागी झालेले विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी नियोजित ठिकाणी भिंतीवर चित्र रेखाटण्यासाठी रवाना झाले. बुधवारी सायंकाळी उशीरापर्यंत स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची संरक्षण भिंत, जिल्हाधिकाºयांच्या निवासस्थानाची संरक्षण भिंत, न. प. मुख्याधिकाºयांच्या निवास स्थानाची संरक्षण भिंत, जिल्हा मध्यवर्ती कारागृहाची संरक्षण भिंत, इतवारा भागातील शासकीय कर्मचाºयांच्या निवासस्थानाची संरक्षण भिंत यासह शहरातील शासकीय मालकीच्या भिंतींवर एकापेक्षा एक असे आकर्षक व स्वच्छतेचा संदेश देणारी चित्र रेखाटली. सदर स्पर्धेत शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील सुमारे ५०० विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी सहभागी झाले होते. यशस्वीतेकरिता न.प. आरोग्य विभागाचे प्रमुख बोरकर, अशोक ठाकुर, विशाल सोमवंशी, अशोक वाघ यांच्यासह न.प. अधिकारी व कर्मचाºयांनी सहकार्य केले.५०० विद्यार्थ्यांचा सहभागअस्वच्छतेला शहरातून हद्दपार करण्यासाठी स्थानिक नगर पालिका व बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित आलेखन भिंती चित्र स्पर्धेत बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय, अग्रगामी विद्यालय, केसलीमल कन्या विद्यालय, भरत ज्ञान मंदिरम्, लोक विद्यालय, यशवंत महाविद्यालय, नवोदय विद्यालय सेलू आदी शाळा व महाविद्यालयातील सुमारे ५०० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.रंगाची व्यवस्था केलीय पालिकेनेस्वच्छ शहर, सुंदर शहर या विषयावर आधारित आलेखन या भिंती चित्र स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी लागणारा विविध रंग वर्धा नगर पालिकेच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आला होता.सागरचे चित्र ठरले आकर्षणाचे केंद्रसदर भिंती चित्र स्पर्धेत एकापेक्षा एक आकर्षक व समाजप्रबोधनात्मक चित्र विद्यार्थी, विद्यार्थिनींनी रेखाटली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सागर पिसुड्डे या विद्यार्थ्यांने खुद्द महात्मा गांधी हे भारत स्वच्छ करीत असल्याचे चित्र रेखाटले. सदर चित्र अनेकांना आपल्याकडे आकर्षीत करीत होते.स्वच्छतेबाबत लोकचळवळ उभी होणे गरजेचे - तराळेस्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या माध्यमातून अस्वच्छतेला शहराबाहेर करण्याचे काम सध्या पालिकेच्यावतीने सुरू आहे. यासाठी नागरिकांच्या सहकार्याचीही गरज आहे. स्वच्छ व सुंदर वर्धा शहरासाठी नागरिकांनी एकजुटीने पुढे येत स्वच्छ सर्वेक्षणाला लोकचळवळ, ती काळाची गरज आहे, असे आवाहन अतुल तराळे यांनी केले आहे.