शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

१९६ पैकी २२ बंधाऱ्यांतच अडते पाणी

By admin | Updated: May 21, 2017 00:58 IST

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सिंचनव्यवस्थेत आमुलाग्र बदलाचा निर्णय घेतला.

बांधकामाच्या तपासणीकरिता कृषी विभागाकडे तांत्रिक शाखाच नाही लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सिंचनव्यवस्थेत आमुलाग्र बदलाचा निर्णय घेतला. यातूनच पाच वर्षांत कृषी विभागाने एका आष्टी तालुक्यात १९६ बंधारे बांधकाम पूर्ण केले. त्यापैकी अवघ्या २२ बंधाऱ्यात काही काळी पाणी साचते. उर्वरित ८४ बंधाऱ्यांच्या बांधकाम सदोष असल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे. शासनाच्यावतीने विविध योजनांमधून शेतीच्या सिंचनासाठी खर्च करण्यात आला; मात्र त्याचे फलित काही योजनांत मिळाले तर काही योजना फोल ठरल्या आहे. याचाच प्रत्यय आष्टीत झालेल्या बंधारा बांधकामात आला आहे. सर्वेक्षणातून या बंधाऱ्याची स्थिती दयनिय असल्याचे समोर आले. या गंभीर बाबीची राज्य शासनाने दखल घेवून कृषी योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला तपासणीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आष्टी तालुक्यात ४१ ग्रामपंचायती, ६५ रिठ मौजासह विविध ठिकाणी कृषी विभागाने बंधारा बांधकाम केले आहे. यासाठी शेतीचा परिसर पाहून नाल्यांची निवड करण्यात आली. या बंधारा कामामुळे किती हेक्टर शेती सिंचनाखाली येईल याचे निकष शासनाने दिले आहेत. त्याची दखल न घेता मनमानी पद्धतीने कुठेही, कसेही बंधारे बांधकाम करण्यात आले. कृषी विभागाकडे तांत्रिक शाखा नसल्याने कृषी सहायक, पर्यवेक्षक यांच्या खांद्यावर देखभाल तथा संरक्षणाची धुरा होती; मात्र कुंपणच शेत खायला अग्रस्थानी असल्याने त्यामध्ये कोणीच लक्ष दिले नाही. जमिनीच्या पृष्ठभागावर खोदकाम करून पाया भरतेवेळी चक्क माती भरून, दगडांच्या साह्याने भरावा घातला. सिमेंट क्राँक्रीट काही प्रमाणात वापरल्याने या बंधाऱ्याची वाट लागली आहे. सदोष बांधकाम झाल्याने त्या बंधाऱ्यामध्ये पाणी साठवण्याचे नावच नाही. यावर्षीही कृषी विभागाने नाल्यावर बंधारा बांधकामाचे नियोजन केले. जलयुक्त शिवारमधून अनेक निविदा झाल्या; पण सदोष बांधकामाची परंपरा वर्षानुवर्षे चालतच आहे. कमिशनवारीची चटक लागल्याने अधिकारी कर्मचारी जबाबदारी झटकून मोकळे झाले आहे. त्यामुळे सर्वाधिक भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून कृृषी विभाग नजरेत आला आहे. शेतकरी दिवसरात्र काबाडकष्ट करतात. त्यांना घामाचे दाम मिळत नाही. अधिकारी मात्र निव्वळ उद्देश ठेवून बंधारे बांधतात. त्यांच्या लेखी शेतकरी व शेती याचा उद्देश गौण ठरत आहे. या बंधारा बांधकामाची माहिती शासनाला गेली असून त्याची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई देखील करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बंधारा बांधकाम प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यास चौकशी करून दोषींवर कारवाई करू. आष्टीला नियमित तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी नसल्याने दुर्लक्ष होत आहे, ही बाब खरी आहे. - विजय घावटे, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर.