शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

१९६ पैकी २२ बंधाऱ्यांतच अडते पाणी

By admin | Updated: May 21, 2017 00:58 IST

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सिंचनव्यवस्थेत आमुलाग्र बदलाचा निर्णय घेतला.

बांधकामाच्या तपासणीकरिता कृषी विभागाकडे तांत्रिक शाखाच नाही लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सिंचनव्यवस्थेत आमुलाग्र बदलाचा निर्णय घेतला. यातूनच पाच वर्षांत कृषी विभागाने एका आष्टी तालुक्यात १९६ बंधारे बांधकाम पूर्ण केले. त्यापैकी अवघ्या २२ बंधाऱ्यात काही काळी पाणी साचते. उर्वरित ८४ बंधाऱ्यांच्या बांधकाम सदोष असल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे. शासनाच्यावतीने विविध योजनांमधून शेतीच्या सिंचनासाठी खर्च करण्यात आला; मात्र त्याचे फलित काही योजनांत मिळाले तर काही योजना फोल ठरल्या आहे. याचाच प्रत्यय आष्टीत झालेल्या बंधारा बांधकामात आला आहे. सर्वेक्षणातून या बंधाऱ्याची स्थिती दयनिय असल्याचे समोर आले. या गंभीर बाबीची राज्य शासनाने दखल घेवून कृषी योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला तपासणीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आष्टी तालुक्यात ४१ ग्रामपंचायती, ६५ रिठ मौजासह विविध ठिकाणी कृषी विभागाने बंधारा बांधकाम केले आहे. यासाठी शेतीचा परिसर पाहून नाल्यांची निवड करण्यात आली. या बंधारा कामामुळे किती हेक्टर शेती सिंचनाखाली येईल याचे निकष शासनाने दिले आहेत. त्याची दखल न घेता मनमानी पद्धतीने कुठेही, कसेही बंधारे बांधकाम करण्यात आले. कृषी विभागाकडे तांत्रिक शाखा नसल्याने कृषी सहायक, पर्यवेक्षक यांच्या खांद्यावर देखभाल तथा संरक्षणाची धुरा होती; मात्र कुंपणच शेत खायला अग्रस्थानी असल्याने त्यामध्ये कोणीच लक्ष दिले नाही. जमिनीच्या पृष्ठभागावर खोदकाम करून पाया भरतेवेळी चक्क माती भरून, दगडांच्या साह्याने भरावा घातला. सिमेंट क्राँक्रीट काही प्रमाणात वापरल्याने या बंधाऱ्याची वाट लागली आहे. सदोष बांधकाम झाल्याने त्या बंधाऱ्यामध्ये पाणी साठवण्याचे नावच नाही. यावर्षीही कृषी विभागाने नाल्यावर बंधारा बांधकामाचे नियोजन केले. जलयुक्त शिवारमधून अनेक निविदा झाल्या; पण सदोष बांधकामाची परंपरा वर्षानुवर्षे चालतच आहे. कमिशनवारीची चटक लागल्याने अधिकारी कर्मचारी जबाबदारी झटकून मोकळे झाले आहे. त्यामुळे सर्वाधिक भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून कृृषी विभाग नजरेत आला आहे. शेतकरी दिवसरात्र काबाडकष्ट करतात. त्यांना घामाचे दाम मिळत नाही. अधिकारी मात्र निव्वळ उद्देश ठेवून बंधारे बांधतात. त्यांच्या लेखी शेतकरी व शेती याचा उद्देश गौण ठरत आहे. या बंधारा बांधकामाची माहिती शासनाला गेली असून त्याची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई देखील करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बंधारा बांधकाम प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यास चौकशी करून दोषींवर कारवाई करू. आष्टीला नियमित तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी नसल्याने दुर्लक्ष होत आहे, ही बाब खरी आहे. - विजय घावटे, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर.