शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

महिनाभरात १८३० रुग्णांची नोंद

By admin | Updated: August 26, 2014 23:38 IST

पावसाची दडी, पाऱ्याची न होणारी घसरण, शिवाय जिल्ह्याच्या वातावरणात दिवसागणिक होत असलेली प्रदुषणाची वाढ यामुळे जिल्ह्यात श्वसनाचे आजार वाढत असल्याचे समोर येत आहे.

वातावरणातील बदल : बळावताहेत श्वसनाचे आजार; रुग्णालयात वाढतेय गर्दीरूपेश खैरी - वर्धापावसाची दडी, पाऱ्याची न होणारी घसरण, शिवाय जिल्ह्याच्या वातावरणात दिवसागणिक होत असलेली प्रदुषणाची वाढ यामुळे जिल्ह्यात श्वसनाचे आजार वाढत असल्याचे समोर येत आहे. ही वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. गत एक महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात या श्वसनाचे आजार जडलेल्या एकूण एक हजार ८३० रुग्णांची नोंद झाली आहे. यात एक हजार तीन पुरूष व ७२७ महिलांचा समावेश आहे. निसर्गाच्या कोपामुळे केवळ शेती वा त्याच्याशी निगडीत असलेल्या घटकावर विपरीत परिणाम होतो असेच नाही तर या कोपाचा परिणाम सर्वांवरच होत असल्याचे रुग्णालयात वाढत असलेल्या गर्दीवरून दिसून येत आहे. या महिनाभरात रुग्णालयात सर्दी, खोकला, ताप, डायरिया, हगणव, गॅस्ट्रोचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले आहे. या तुलनेत श्वसनाचे आजार असलेले रुग्ण अधिक असल्याचे समोर येत आहे. या रुग्णांवर उपचार शक्य आहे; मात्र वाढत असलेले प्रमाण चिंतेचा विषय आहे. वातवारणात सध्या झालेला बदल हेच एक कारण नाही तर याला अनेक कारणे जबाबदार असल्याचे समोर येत आहे. वातावरणातील बदल हे नैसर्गिक कारण असले तरी वाढते प्रदुषण हे एक महत्त्वाचे कारण समोर येत आहे. वर्धा शहरात प्रदुषणाचा विचार केल्यास शहरालगत असलेल्या कंपनीकडे बोट दाखविले जाते. यात कंपनीचा वाटा असला तरी रस्त्याने धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत झपाट्याने होत असलेली वाढ हे एक महत्त्वाचे कारण ठरत आहे. ही वाहने चालविताना त्यातून निघणारा धुर श्वसनाचे आजार वाढवित आहे. रस्त्याने धावणाऱ्या वाहनात आॅटोतून निघणारा धूर नाकावर रूमाल लावण्यास भाग पाडणारा आहे. शिवाय या आॅटोत पेट्रोलसोबत रॉकेलचा वापर होत असल्याने त्यातून निघणारा धूर सर्वसामान्यांना आजारी पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. डायरियाचे २७६ रुग्णसध्या असलेल्या वातावरणातील सर्वात घातक रोग म्हणून डायरियाकडे बघितल्या जात आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास प्राण गमविण्याची वेळ येवू शकते. हा आजार सर्वाधिक चिमुकल्यांना होत असल्याने राज्य शासनाने अतिसार पंंधरवडा सुरू केला. यात रुग्णसंख्या वाढत असल्याने त्याचा कालावधी वाढवून दिला. या कालावधीत जागृती करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार काम सुरू असले तरी त्याचा विशेष लाभ होत नसल्याचे दिसून येत आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात या आजाराच्या २७६ रुग्णांची नोंद झाली आहे. यात १४७ पुरूष व १२९ महिला रुग्णांचा समावेश आहे. शिवाय शासनाच्यावतीने रुग्णांना घरी जावूनही औषधोपचार सुरू आहे.