शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

१५ धरणांत १८ टक्केच जलसाठा

By admin | Updated: May 24, 2015 02:23 IST

जिल्ह्याचा पारा ४७ अंशावर स्थिरावत आहे. या वाढत्या तापमानामुळे सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे.

वर्धा : जिल्ह्याचा पारा ४७ अंशावर स्थिरावत आहे. या वाढत्या तापमानामुळे सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. या वाढत्या तापमानाचा फटका जलाशयांनाही बसत असून त्यांची पातळी कमालीची घसरत आहे. जिल्ह्याच्या पाटबंधारे विभागाच्यावतीने घेण्यात येत असलेल्या १५ जलाशयांची टक्केवारी दिवसेंदिवस खालावत आहे. या जलाशयात केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे पाणी टंचाईचे चित्र जिल्ह्यात आणखी भीषण रूप धारण करण्याचे संकेत मिळत आहे.जिल्ह्यात असलेल्या १५ प्रकल्पांपैकी १४ प्रकल्पात वापरण्यायोग्य जलसाठा असला तरी नांद प्रकल्पात मात्र कोरड पडली आहे. अशीच अवस्था जिल्ह्यातील लघू प्रकल्पाची झाली आहे. एकूण असलेल्या २० लघू प्रकल्प कोरडे पडले असल्याने रानात भटकंती करणाऱ्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. पारा कमी जास्त होत असल्याने बऱ्यास पकल्पातील जलस्तर घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात लालनाला व पोथरा ही दोन जलसाठे कोरडी पडण्याच्या जवळ आल्याचे त्यांच्यात असलेल्या पाण्याच्या टक्केवारीवरून दिसत आहे. इतर जलाशयाचीही हीच अवस्था असल्याचे दिसून येत आहे. धाम प्रकल्पातून वर्धा शहराला पाणी पुरवठा होत आहे. या धरणात जलसाठा असल्याने शहराला पाणी टंचाईची झळ बसणार नाही.(प्रतिनिधी)