शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
3
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
4
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
5
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
6
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
7
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
8
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
9
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
10
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
11
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
12
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
13
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
14
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
15
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
16
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
17
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
18
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
19
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
20
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 

१५ धरणांत १८ टक्केच जलसाठा

By admin | Updated: May 24, 2015 02:23 IST

जिल्ह्याचा पारा ४७ अंशावर स्थिरावत आहे. या वाढत्या तापमानामुळे सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे.

वर्धा : जिल्ह्याचा पारा ४७ अंशावर स्थिरावत आहे. या वाढत्या तापमानामुळे सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. या वाढत्या तापमानाचा फटका जलाशयांनाही बसत असून त्यांची पातळी कमालीची घसरत आहे. जिल्ह्याच्या पाटबंधारे विभागाच्यावतीने घेण्यात येत असलेल्या १५ जलाशयांची टक्केवारी दिवसेंदिवस खालावत आहे. या जलाशयात केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे पाणी टंचाईचे चित्र जिल्ह्यात आणखी भीषण रूप धारण करण्याचे संकेत मिळत आहे.जिल्ह्यात असलेल्या १५ प्रकल्पांपैकी १४ प्रकल्पात वापरण्यायोग्य जलसाठा असला तरी नांद प्रकल्पात मात्र कोरड पडली आहे. अशीच अवस्था जिल्ह्यातील लघू प्रकल्पाची झाली आहे. एकूण असलेल्या २० लघू प्रकल्प कोरडे पडले असल्याने रानात भटकंती करणाऱ्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. पारा कमी जास्त होत असल्याने बऱ्यास पकल्पातील जलस्तर घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात लालनाला व पोथरा ही दोन जलसाठे कोरडी पडण्याच्या जवळ आल्याचे त्यांच्यात असलेल्या पाण्याच्या टक्केवारीवरून दिसत आहे. इतर जलाशयाचीही हीच अवस्था असल्याचे दिसून येत आहे. धाम प्रकल्पातून वर्धा शहराला पाणी पुरवठा होत आहे. या धरणात जलसाठा असल्याने शहराला पाणी टंचाईची झळ बसणार नाही.(प्रतिनिधी)