शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

१२ वीच्या परीक्षेत १८ हजार विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:06 IST

आयुष्याला कलाटणी देणारी बारावी परीक्षा आता दहा दिवसांवर आली असून कनिष्ठ महाविद्यालयात सध्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा अंतिम टप्प्यात आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी अहोरात्र तयारी करीत आहेत.

ठळक मुद्देप्रात्यक्षिक अंतिम टप्प्यात : २८ दिवस चालणार परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आयुष्याला कलाटणी देणारी बारावी परीक्षा आता दहा दिवसांवर आली असून कनिष्ठ महाविद्यालयात सध्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा अंतिम टप्प्यात आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी अहोरात्र तयारी करीत आहेत. बारावीच्या परीक्षेचा हा महासंग्राम २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार असून जिल्ह्यातील १८ हजार ३६१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. २ फेब्रुवारीपासून सर्वच कनिष्ठ महाविद्यालयात प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा सुरु करण्यात आली. ही परीक्षा आता अंतिम टप्प्यात असून बारावीच्या अंतिम परीक्षेकरिता शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात परीक्षेचे वारे वाहू लागल्याने विद्यार्थ्यांसह पालकही व्यस्त दिसून येत आहेत. बारावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा मार्ग निवडला जातो. त्यामुळे अतिमहत्वाच्या असलेल्या या परीक्षेकरिता मागील दोन वर्षापासून विद्यार्थी आपापल्यापरिने प्रयत्नरत आहेत. २१ फेब्रुवारीपासून सुरु होणारा परीक्षेचा हा महासंग्राम २० मार्चपर्यंत चालणार आहे. त्यामुळे वर्ष-दोन वर्षातील मेहनतीचे फळ विद्यार्थ्यांना तीन तासातच मिळवायचे असल्याने, आता विद्यार्थी परीक्षा केंद्रातील तीन तासाच्याच खेळाचे गणित जुळवताना दिसून येत आहे. या तीन तासात जो यशस्वी झाला तोच परीक्षेवर आपली मोहर उमटविणार आहे.परीक्षेकरिता पाल्यांसोबत पालकांचीही कसरतपाल्य बारावीत असताना त्याच्या उत्तीर्ण होण्याची चिंता पालकांनाच जास्त असल्याने पालकही आपल्या पाल्याचा अभ्यास करुन घेण्यासाठी झटत आहे. पाल्य शाळेतून आला की शिकवणी वर्ग आणि त्यानंतर घरी अभ्यास यामुळे या दोन वर्षात ‘अभ्यास एके अभ्यास’ अशीच दिनचर्चा होऊन जाते. नातेवाईकांकडील कार्यक्रम, सोहळे, समारंभही पालक मुलांच्या परीक्षेमुळे वर्षभर टाळताना दिसतात. आता घोडामैदान जवळ असल्याने पालक मुलांच्या प्रकृतीची जास्त काळजी घेताना दिसून येत आहे. अभ्यासावर भर देण्यासोबतच प्रकृतीही ठणठणीत कशी राहील, यासाठी काही उपाययोजनाही सुरु आहे. म्हणजेच परीक्षेच्या महासंग्रामात पालक आपल्या पाल्याला एक योद्धा म्हणूनच तयार करतांना दिसत आहे.बायोमॅट्रिक हजेरी केवळ देखावाबारावी विज्ञान शाखेतील कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित न राहता शिकवणी वर्गातच वर्षभर राहून अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या दांडीबहाद्दरांना आळा घालण्यासाठी शासनाने बायोमॅट्रिक हजेरी सुरू केली होती. यामुळे विद्यार्थ्यांची महाविद्यालयात पूर्ण उपस्थिती राहणार, अशी अपेक्षा होती. परंतु, शिक्षण विभागाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे आणि खासगी महाविद्यालयाच्या दुकानदारीमुळे या उद्देशाला हरताळ फासल्या गेले.आजही बायोमॅट्रिक यंत्रणा लागली; पण अंमलबजावणीअभावी शोभेच्या वस्तू ठरली आहे. त्यामुळे या परीक्षेत नियमित उपस्थित न राहणारे विद्यार्थीही परीक्षेला बसणार आहेत. परिणामी, नियमित उपस्थित राहणाºया विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

टॅग्स :examपरीक्षा