शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

१७ तासात मारेकऱ्यांना ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 23:46 IST

प्रेम प्रकरणातून घडलेल्या हत्याकांडातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी १७ तासात बेड्या ठोकल्या. अमरावती जिल्ह्याच्या मंगरुळ (दस्तगीर) येथून आरोनींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ठळक मुद्देअजय वाणी हत्याकांड : दोघांनाही बुधवारपर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : प्रेम प्रकरणातून घडलेल्या हत्याकांडातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी १७ तासात बेड्या ठोकल्या. अमरावती जिल्ह्याच्या मंगरुळ (दस्तगीर) येथून आरोनींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.येथील तेलघाणी फैल परिसरात आषाढी एकादशीच्या दिवशी १२ जुलैला अजय उर्फ जय वाणी याची प्रेयसीच्या भावाने धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर त्याच्या डोक्यापासून मानेपर्यंत धारदार शस्त्राचे चार घाव तर खांद्यापासून हातापर्यंत तीन असे जवळपास सात घाव ३ ते ४ इंचापर्यंत खोल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपींनी तलवारीचा किंवा सत्तुराचा वापर केला असावा, असा अंदाज पोलीस निरिक्षक रविंद्र गायकवाड यांनी व्यक्त केला. मृत अजय व आरोपीच्या बहिणीची जुनीच ओळख होती.त्यांच्या या प्रेमप्रकरणाची कुटुंबियांनाही माहिती होती. प्रेयसीच्या भावाने मृत अजयला तिच्यापासून दूर राहण्याचे वारंवार सांगितले होते. परंतु अजयने याकडे कानाडोळा केल्यानेच हा हत्याकांड घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.याप्रकरणी पोलिसांनी अक्षय माहुरे व आशिष लोणकर या दोघांनाही मंगरुळ (दस्तगीर) येथून अटक केली. आरोपी लोणकर आणि मृतक हे दोघेही डीजेचा व्यवसाय करायचे. हत्येनंतर तेलघाणी फैल परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण होते. परंतु पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि नागरिकांच्या मध्यस्तीने हा तणाव शांत करण्यात यश आले. मृत अजयच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :MurderखूनArrestअटक