शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
5
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
6
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
7
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
8
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
9
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
10
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
11
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
12
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
13
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
14
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
15
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
16
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
17
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
18
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
19
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
20
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी

१६७ गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: April 6, 2015 02:00 IST

पारा ३९ - ४० अंशावर स्थिरावत आहे. वाढत्या तापमानामुळे जलस्त्रोत आटत असल्याने जिल्ह्यात बऱ्याच गावात पाणी टंचाई

जिल्हा प्रशासनाकडून २१५ उपाययोजना : तिसऱ्या टप्प्याकरिता ३ कोटी ३२ लाख रुपयांचा खर्च, तरीही झळारूपेश खैरी ल्ल वर्धापारा ३९ - ४० अंशावर स्थिरावत आहे. वाढत्या तापमानामुळे जलस्त्रोत आटत असल्याने जिल्ह्यात बऱ्याच गावात पाणी टंचाई जाणवत आहे. काही गावात पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात ही परिस्थिती असताना जिल्हा प्रशासन केवळ आराखडा तयार करून उपाय योजना सुरू असल्याचे सोंग आणत असल्याचे दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यानुसार एप्रिल-जून या तिसऱ्या टप्प्यात एकूण १६७ गावात पाणी टंचाई असल्याचे दर्शविण्यात आले आहे. या गावात पाणी पुरविण्याकरिता एकूण २१५ योजना अंमलात आणण्यात येत असल्याचे यात नमूद असून यावर ३ कोटी ३२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पाणी टंचाई निवारणार्थ एवढी रक्कम उपलब्ध असताना जिल्ह्यात नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. पाणी टंचाई निवारणार्थ तयार करण्यात आलेल्या आराखड्यात जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात एकाही गावात पाणी टंचाई नसल्याचे दर्शविण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात एकूण ७९ गावांत ९४ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. टंचाई निवारणार्थ १ कोटी १८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. असे असतानाही नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागत आहे. तिसऱ्या टप्प्यातील पाणी टंचाई निवारणार्थ कार्य सुरू करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात वर्धा व हिंगणघाट तालुक्यात सर्वाधिक गावात पाणीटंचाई असल्याचे आराखड्यातून दिसत आहे. असे असले तरी आष्टी तालुक्यातील मोई या गावात मागणी करूनही टँकर सुरू झाला नसल्याने त्यांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. ड्रमभर पाण्याकरिता शंभर रुपये मोजावे लागत आहे. हीच स्थिती तालुक्यातील तळेगाव (श्यामजीपंत) या गावातील काही भागात असल्याचे दिसून आले आहे. १५ सार्वजनिक विहिरींचे खोलीकरणपाणी टंचाई असलेल्या गावातील नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे याकरिता एकूण १५ सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण करण्यात येणार आहे. यावर १५ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. तर ७० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार असून यावर १८.९० लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याचा आराखडा सांगत आहे. तीन ठिकाणी होणार टँकरने पाणीपुरवठा जिल्ह्यात काही भागातील पाणी टंचाई निवारण्याकरिता इतर उपाययोजना कुचकामी ठरत आहे. त्यावर मार्ग काढण्याकरिता टँकर सुविधा करण्यात येणार आहे. ही सुविधा तीन गावात प्रस्तावित आहे. याकरिता दोन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पाणी नसल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली असतानाही टँकर सुरू करण्यात आले नाही. ५६ ठिकाणी होणार नळ योजनेची दुरूस्ती जिल्ह्यात पाणी पुरवठा करण्याकरिता नळ योजना कार्यान्वित आहे. मात्र काही ठिकाणी ती नादुरूस्त आहे. यात ५६ ठिकाणी ती दुरूस्त करण्यात येणार असल्याचे आरखड्यात नमूद आहे. यावर २२ लाख रुपयांचा खर्च होणार असल्याचे आराखड्यात नमूद आहे. यापैकी ९ ठिकाणचे काम प्रगतीपथावर असून ते तत्काळ करण्याच्या सूचना आहेत. १५ ठिकाणी तात्पुरती पुरक पाणीपुरवठा योजना पाणी टंचाई असलेल्या गावात तात्पूरती पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे आराखड्यात नमूद आहे. यात १५ गावांचा समावेश आहे. यावरील खर्च नळयोजनेच्या २२ लाख रुपयांत समाविष्ट आहे. यावर काम सुरू असून ही उपाययोजना लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे आराखड्यात नमूद आहे.