शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

१६७ गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: April 6, 2015 02:00 IST

पारा ३९ - ४० अंशावर स्थिरावत आहे. वाढत्या तापमानामुळे जलस्त्रोत आटत असल्याने जिल्ह्यात बऱ्याच गावात पाणी टंचाई

जिल्हा प्रशासनाकडून २१५ उपाययोजना : तिसऱ्या टप्प्याकरिता ३ कोटी ३२ लाख रुपयांचा खर्च, तरीही झळारूपेश खैरी ल्ल वर्धापारा ३९ - ४० अंशावर स्थिरावत आहे. वाढत्या तापमानामुळे जलस्त्रोत आटत असल्याने जिल्ह्यात बऱ्याच गावात पाणी टंचाई जाणवत आहे. काही गावात पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात ही परिस्थिती असताना जिल्हा प्रशासन केवळ आराखडा तयार करून उपाय योजना सुरू असल्याचे सोंग आणत असल्याचे दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यानुसार एप्रिल-जून या तिसऱ्या टप्प्यात एकूण १६७ गावात पाणी टंचाई असल्याचे दर्शविण्यात आले आहे. या गावात पाणी पुरविण्याकरिता एकूण २१५ योजना अंमलात आणण्यात येत असल्याचे यात नमूद असून यावर ३ कोटी ३२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पाणी टंचाई निवारणार्थ एवढी रक्कम उपलब्ध असताना जिल्ह्यात नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. पाणी टंचाई निवारणार्थ तयार करण्यात आलेल्या आराखड्यात जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात एकाही गावात पाणी टंचाई नसल्याचे दर्शविण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात एकूण ७९ गावांत ९४ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. टंचाई निवारणार्थ १ कोटी १८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. असे असतानाही नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागत आहे. तिसऱ्या टप्प्यातील पाणी टंचाई निवारणार्थ कार्य सुरू करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात वर्धा व हिंगणघाट तालुक्यात सर्वाधिक गावात पाणीटंचाई असल्याचे आराखड्यातून दिसत आहे. असे असले तरी आष्टी तालुक्यातील मोई या गावात मागणी करूनही टँकर सुरू झाला नसल्याने त्यांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. ड्रमभर पाण्याकरिता शंभर रुपये मोजावे लागत आहे. हीच स्थिती तालुक्यातील तळेगाव (श्यामजीपंत) या गावातील काही भागात असल्याचे दिसून आले आहे. १५ सार्वजनिक विहिरींचे खोलीकरणपाणी टंचाई असलेल्या गावातील नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे याकरिता एकूण १५ सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण करण्यात येणार आहे. यावर १५ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. तर ७० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार असून यावर १८.९० लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याचा आराखडा सांगत आहे. तीन ठिकाणी होणार टँकरने पाणीपुरवठा जिल्ह्यात काही भागातील पाणी टंचाई निवारण्याकरिता इतर उपाययोजना कुचकामी ठरत आहे. त्यावर मार्ग काढण्याकरिता टँकर सुविधा करण्यात येणार आहे. ही सुविधा तीन गावात प्रस्तावित आहे. याकरिता दोन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पाणी नसल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली असतानाही टँकर सुरू करण्यात आले नाही. ५६ ठिकाणी होणार नळ योजनेची दुरूस्ती जिल्ह्यात पाणी पुरवठा करण्याकरिता नळ योजना कार्यान्वित आहे. मात्र काही ठिकाणी ती नादुरूस्त आहे. यात ५६ ठिकाणी ती दुरूस्त करण्यात येणार असल्याचे आरखड्यात नमूद आहे. यावर २२ लाख रुपयांचा खर्च होणार असल्याचे आराखड्यात नमूद आहे. यापैकी ९ ठिकाणचे काम प्रगतीपथावर असून ते तत्काळ करण्याच्या सूचना आहेत. १५ ठिकाणी तात्पुरती पुरक पाणीपुरवठा योजना पाणी टंचाई असलेल्या गावात तात्पूरती पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे आराखड्यात नमूद आहे. यात १५ गावांचा समावेश आहे. यावरील खर्च नळयोजनेच्या २२ लाख रुपयांत समाविष्ट आहे. यावर काम सुरू असून ही उपाययोजना लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे आराखड्यात नमूद आहे.