शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

१६७ गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: April 6, 2015 02:00 IST

पारा ३९ - ४० अंशावर स्थिरावत आहे. वाढत्या तापमानामुळे जलस्त्रोत आटत असल्याने जिल्ह्यात बऱ्याच गावात पाणी टंचाई

जिल्हा प्रशासनाकडून २१५ उपाययोजना : तिसऱ्या टप्प्याकरिता ३ कोटी ३२ लाख रुपयांचा खर्च, तरीही झळारूपेश खैरी ल्ल वर्धापारा ३९ - ४० अंशावर स्थिरावत आहे. वाढत्या तापमानामुळे जलस्त्रोत आटत असल्याने जिल्ह्यात बऱ्याच गावात पाणी टंचाई जाणवत आहे. काही गावात पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात ही परिस्थिती असताना जिल्हा प्रशासन केवळ आराखडा तयार करून उपाय योजना सुरू असल्याचे सोंग आणत असल्याचे दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यानुसार एप्रिल-जून या तिसऱ्या टप्प्यात एकूण १६७ गावात पाणी टंचाई असल्याचे दर्शविण्यात आले आहे. या गावात पाणी पुरविण्याकरिता एकूण २१५ योजना अंमलात आणण्यात येत असल्याचे यात नमूद असून यावर ३ कोटी ३२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पाणी टंचाई निवारणार्थ एवढी रक्कम उपलब्ध असताना जिल्ह्यात नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. पाणी टंचाई निवारणार्थ तयार करण्यात आलेल्या आराखड्यात जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात एकाही गावात पाणी टंचाई नसल्याचे दर्शविण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात एकूण ७९ गावांत ९४ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. टंचाई निवारणार्थ १ कोटी १८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. असे असतानाही नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागत आहे. तिसऱ्या टप्प्यातील पाणी टंचाई निवारणार्थ कार्य सुरू करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात वर्धा व हिंगणघाट तालुक्यात सर्वाधिक गावात पाणीटंचाई असल्याचे आराखड्यातून दिसत आहे. असे असले तरी आष्टी तालुक्यातील मोई या गावात मागणी करूनही टँकर सुरू झाला नसल्याने त्यांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. ड्रमभर पाण्याकरिता शंभर रुपये मोजावे लागत आहे. हीच स्थिती तालुक्यातील तळेगाव (श्यामजीपंत) या गावातील काही भागात असल्याचे दिसून आले आहे. १५ सार्वजनिक विहिरींचे खोलीकरणपाणी टंचाई असलेल्या गावातील नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे याकरिता एकूण १५ सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण करण्यात येणार आहे. यावर १५ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. तर ७० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार असून यावर १८.९० लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याचा आराखडा सांगत आहे. तीन ठिकाणी होणार टँकरने पाणीपुरवठा जिल्ह्यात काही भागातील पाणी टंचाई निवारण्याकरिता इतर उपाययोजना कुचकामी ठरत आहे. त्यावर मार्ग काढण्याकरिता टँकर सुविधा करण्यात येणार आहे. ही सुविधा तीन गावात प्रस्तावित आहे. याकरिता दोन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पाणी नसल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली असतानाही टँकर सुरू करण्यात आले नाही. ५६ ठिकाणी होणार नळ योजनेची दुरूस्ती जिल्ह्यात पाणी पुरवठा करण्याकरिता नळ योजना कार्यान्वित आहे. मात्र काही ठिकाणी ती नादुरूस्त आहे. यात ५६ ठिकाणी ती दुरूस्त करण्यात येणार असल्याचे आरखड्यात नमूद आहे. यावर २२ लाख रुपयांचा खर्च होणार असल्याचे आराखड्यात नमूद आहे. यापैकी ९ ठिकाणचे काम प्रगतीपथावर असून ते तत्काळ करण्याच्या सूचना आहेत. १५ ठिकाणी तात्पुरती पुरक पाणीपुरवठा योजना पाणी टंचाई असलेल्या गावात तात्पूरती पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे आराखड्यात नमूद आहे. यात १५ गावांचा समावेश आहे. यावरील खर्च नळयोजनेच्या २२ लाख रुपयांत समाविष्ट आहे. यावर काम सुरू असून ही उपाययोजना लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे आराखड्यात नमूद आहे.