शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

१.५९ कोटींची नळयोजना शोभेची

By admin | Updated: April 9, 2017 00:18 IST

पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून २०१४ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत तळेगाव (टा.) गावाला १ कोटी ५९ लाख रुपये मंजूर झाले.

नागरिकांची तारांबळ : पाण्याकरिता होते भटकंती वर्धा : पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून २०१४ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत तळेगाव (टा.) गावाला १ कोटी ५९ लाख रुपये मंजूर झाले. पैकी ८५ लाख रुपये खर्च करून विहीर खोदण्यात आली. टाकी उभारली; पण ग्रा.पं. प्रशासन व राजकीय उदासिनतेने ही योजना रखडल्याचे चित्र आहे. यामुळे दोन वर्षांपासून भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शाळकरी मुलांच्या हातात दप्तराऐवजी घागरी आल्या आहेत. पाईपलाईन गावाच्या जवळ आणून ठेवली आहे. त्यानंतर समोर पाईपलाईन नेणे अद्याप सुरू केले नाही. सध्या हातपंपाद्वारे ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. यातही हातपंपाने उन्हाळ्याच्या प्रारंभीच तळ गाठल्याचे चित्र आहे. दोन वर्षे लोटत आहेत; पण ग्रा.पं. प्रशासन व राजकीय पुढारी ग्रामस्थांना पाणी देण्यास असमर्थ ठरत आहेत. सध्या १० ते १२ दिवसांनी ग्रामस्थांना पाणी मिळत आहे. याबाबत ग्रामस्थांनी ग्रा.पं. च्या संबंधित पदाधिकाऱ्यांना विचारणा केल्यास, लवकरच सुरू होईल, असे सांगितले जाते; पण हे वाक्य दोन वर्षांपासून गावकरी ऐकत आहेत. ग्रामीण पेयजल योजनेमार्फत २०१४ मध्ये १ कोटी ५९ लाख रुपये मंजूर झाले होते. पैकी ८४ लाख रुपये कंत्राटदारापर्यंत पोहोचले; पण पाणी मिळाले नाही. सध्या तळेगाव (टा.) येथील नागरिक हातपंपावर अवलंबून असून तो किती दिवस आधार देईल, ही चिंता ग्रामस्थांना त्रस्त करीत आहे. दोन वर्षापासूनचा दुर्लक्षितपणा यंदाही कायम राहण्याची शक्यता दिसून येत असल्याने दुष्काळाची दाहकता वाढण्याचे संकेत आहेत.(तालुका प्रतिनिधी) तीन वर्षानंतरही नळांना पाणी नाही राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमार्फत तळेगाव (टा.) येथे तीन वर्षांपपूर्वी योजनेला मंजुरी देण्यात आली. सन २०१४ मध्ये १ कोटी ५९ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. याला तीन वर्षे लोटत असताना सुध्दा अद्याप नळ योजना सुरळीत नसल्याने पाण्यासाठी नागरिकांसह विद्यार्थ्यांना सुध्दा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.