शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

१.५९ कोटींची नळयोजना शोभेची

By admin | Updated: April 9, 2017 00:18 IST

पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून २०१४ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत तळेगाव (टा.) गावाला १ कोटी ५९ लाख रुपये मंजूर झाले.

नागरिकांची तारांबळ : पाण्याकरिता होते भटकंती वर्धा : पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून २०१४ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत तळेगाव (टा.) गावाला १ कोटी ५९ लाख रुपये मंजूर झाले. पैकी ८५ लाख रुपये खर्च करून विहीर खोदण्यात आली. टाकी उभारली; पण ग्रा.पं. प्रशासन व राजकीय उदासिनतेने ही योजना रखडल्याचे चित्र आहे. यामुळे दोन वर्षांपासून भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शाळकरी मुलांच्या हातात दप्तराऐवजी घागरी आल्या आहेत. पाईपलाईन गावाच्या जवळ आणून ठेवली आहे. त्यानंतर समोर पाईपलाईन नेणे अद्याप सुरू केले नाही. सध्या हातपंपाद्वारे ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. यातही हातपंपाने उन्हाळ्याच्या प्रारंभीच तळ गाठल्याचे चित्र आहे. दोन वर्षे लोटत आहेत; पण ग्रा.पं. प्रशासन व राजकीय पुढारी ग्रामस्थांना पाणी देण्यास असमर्थ ठरत आहेत. सध्या १० ते १२ दिवसांनी ग्रामस्थांना पाणी मिळत आहे. याबाबत ग्रामस्थांनी ग्रा.पं. च्या संबंधित पदाधिकाऱ्यांना विचारणा केल्यास, लवकरच सुरू होईल, असे सांगितले जाते; पण हे वाक्य दोन वर्षांपासून गावकरी ऐकत आहेत. ग्रामीण पेयजल योजनेमार्फत २०१४ मध्ये १ कोटी ५९ लाख रुपये मंजूर झाले होते. पैकी ८४ लाख रुपये कंत्राटदारापर्यंत पोहोचले; पण पाणी मिळाले नाही. सध्या तळेगाव (टा.) येथील नागरिक हातपंपावर अवलंबून असून तो किती दिवस आधार देईल, ही चिंता ग्रामस्थांना त्रस्त करीत आहे. दोन वर्षापासूनचा दुर्लक्षितपणा यंदाही कायम राहण्याची शक्यता दिसून येत असल्याने दुष्काळाची दाहकता वाढण्याचे संकेत आहेत.(तालुका प्रतिनिधी) तीन वर्षानंतरही नळांना पाणी नाही राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमार्फत तळेगाव (टा.) येथे तीन वर्षांपपूर्वी योजनेला मंजुरी देण्यात आली. सन २०१४ मध्ये १ कोटी ५९ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. याला तीन वर्षे लोटत असताना सुध्दा अद्याप नळ योजना सुरळीत नसल्याने पाण्यासाठी नागरिकांसह विद्यार्थ्यांना सुध्दा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.