शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

ग्रामपंचायतींच्या १५७ कर्मचाऱ्यांनी केले ‘काम बंद’

By admin | Updated: November 3, 2014 23:30 IST

तालुक्यातील ४२ ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत १५७ कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून पंचायत समितीने थकीत वेतन दिले नाही़ त्यामुळे कुटुंबाचा आर्र्थिक प्रश्न ऐेरणीवर आला आहे़

आष्टी (श़) : तालुक्यातील ४२ ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत १५७ कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून पंचायत समितीने थकीत वेतन दिले नाही़ त्यामुळे कुटुंबाचा आर्र्थिक प्रश्न ऐेरणीवर आला आहे़ याप्रकरणी सर्व कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीसमोर कामबंद आंदोलन सुरू केले़ आंदोलनाचा फटका बसल्याचे पाहून गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांची सभा घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगितले़तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना कर्मचारी कार्यरत आहे़ कर्मचारी हा नागरिक व शासन यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून काम करतात़ परंतु दिवसागणिक अतिरिक्त कामाचा बोजा वाढत असल्यामुळे दिवसभर काम करावे लागते़ त्यातच नियमित पगार मिळत नाही़ या कारणाने उसनवारीवर वर्षभर कुटुंबाचा गाडा हाकावा लागतो. दिवाळीच्या दिवशी घरातील सदस्यांना कपडे घेण्यासाठीदेखील कर्मचाऱ्यांकडे पैसे नसल्याचे वास्तव यंदा पहावयास मिळाले. अनेक ठिकाणी ग्रामसेवक दिवसभर हजर राहत नाही़ त्यांचाही अतिरिक्त पदभारही कर्मचाऱ्याना सांभाळावा लागतो. अशा सगळ्या भानगडी असूनही कर्मचारी आपले काम करीत असतात. शासनाने २०१३ च्या आदेशानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता व सुधारित वेतन देणे आवश्यक होते़ परंतु पंचायत समितीच्या दुर्लक्षित धोरणामुळे ग्रामसेवकांचे अरेरावी धोरण आडवे आले़ सर्वच ग्रामसेवक शासन आदेशानुसार वेतन द्यायला तयार नसल्याचा आरोप ग्रा़ पं़ कर्मचाऱ्यांनी केला आहे़ १ एप्रिल २०१४ पासून मूळ किमान वेतन लागू करावे, राहणीमान भत्ता द्यावा, सेवाज्येष्ठता यादीत सामावून घ्यावे, कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्चाची मर्यादा २५ टक्क्यावरून ३५ टक्के करावी, २०११ च्या लोकसंख्येनुसार आकृतिबंधात नव्याने सुधारणा करावी, कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता १०० टक्के अनुदान मिळावे यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ठराव पारित करावे आदी मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे़ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक सन्मानाची वागणूक देत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी आंदोलनात केला. यामध्ये युनियनचे अध्यक्ष संजय पाथरे, सचिव रवीन्द्र होले, सहभागी होते. गटविकास अधिकाऱ्यांनी सभा घेवून लवकरात लवकर तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)