शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१.५३ लाखांचा गांजा जप्त

By admin | Updated: September 4, 2016 00:26 IST

सेवाग्राम रेल्वेस्थानक परिसरात संशयीतरित्या बसून असलेल्या तिघांकडून १.५३ लाख रुपये किंमतीचा १५ किलो गांजा जप्त करण्यात आला.

तिघांना अटक : सेवाग्राम रेल्वे स्थानकावर कारवाईवर्धा : सेवाग्राम रेल्वेस्थानक परिसरात संशयीतरित्या बसून असलेल्या तिघांकडून १.५३ लाख रुपये किंमतीचा १५ किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी सकाळी ११.१५ वाजता करण्यात आली. मुजफ्फर खान नियामत खान (३०) रा. हैदरपुरा इदगाह फाटा पठाण चौकसमोर अमरावती, आप्पाराव नुकूराजू गौड (४०) रा. चिन्नागडा, पो.स्टे. चिंतापल्ली, जि. विशाखापट्टनम आणि शेख आबीद शेख रज्जाक (२०) रा. जमील कॉलनी, अमरावती अशी आरोपींची नावे आहेत.रेल्वे पोलिसांच्यावतीने नित्याप्रमाणे स्थानकावर तपासणी सुरू असताना फलाट क्रमांक तीनवर नागपूरकडे जाण्यासाठी तीन संशयीत इसम आढळून आले. त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना रेल्वे पोलीस चौकी सेवाग्राम येथे आणून तपासणी केली असता त्यांच्या पोटावर पांढऱ्या रंगाच्या कापडी पिशवीमध्ये काहीतरी बांधून असल्याचे दिसले. त्यांची अधिक चौकशी केली असता गांजा घेऊन जात असल्याची कबुली दिली. हा गांजा पांढऱ्या रंगाच्या चार ते पाच फुट लांब पिशवीमध्ये ठेवण्यात आला होता. ती पिशवी चापट करून तिघांनीही पोटाला गुंडाळली होती. ती पद्धतशीरपणे बांधून ते नागपूर येथे घेऊन जात होते. प्रत्येकाकडे सुमारे पाच किलो प्रमाणे तिघांकडून १५ किलो ३४१ ग्रॅम किंमत १ लाख ५३ हजार ७१० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रसंगी पंच व नायब तहसीलदार सी.जी. बर्वे यांच्या समक्ष पंचनामा करून आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई रेल्वे पोलीस निरीक्षक नालट, दिलीप बारंगे, श्याम धुर्वे, अशोक हनवंते, राहुल यावले तसेच सेवाग्राम येथील पोलीस उपनिरीक्षक जाटोलीया, उमेशसिंग, आर.के. भारती, सुभाष जुमळे, प्रमोद सांगळे, चौधरी, लोकेश राऊत, गणेश पवार, आकाश मेश्राम यांनी केली.(कार्यालय प्रतिनिधी) एका फेरीसाठी चार हजार रुपयेरेल्वेच्या माध्यमातून गांजा बहुतांश भागात पोहोचविला जातो. यासाठी गरीब व थोडी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले युवक हेरले जातात. अमरावती येथील दोन्ही युवकांनी पहिल्यांदाच गांजा घेऊन जात असल्याची कबुली दिली. शिवाय किती रुपयांचा माल आहे, याबाबत माहिती नाही. आम्हाला संबंधित टोळीकडून प्रत्येक फेरीसाठी तीन ते चार हजार रुपये दिले जातात. शिवाय जेवण आणि अन्य खर्चही तेच करतात, असे सांगितले. यावरून गांजाची तस्करी करणारी मोठी टोळी असल्याचे निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.