शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

१.५३ लाखांचा गांजा जप्त

By admin | Updated: September 4, 2016 00:26 IST

सेवाग्राम रेल्वेस्थानक परिसरात संशयीतरित्या बसून असलेल्या तिघांकडून १.५३ लाख रुपये किंमतीचा १५ किलो गांजा जप्त करण्यात आला.

तिघांना अटक : सेवाग्राम रेल्वे स्थानकावर कारवाईवर्धा : सेवाग्राम रेल्वेस्थानक परिसरात संशयीतरित्या बसून असलेल्या तिघांकडून १.५३ लाख रुपये किंमतीचा १५ किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी सकाळी ११.१५ वाजता करण्यात आली. मुजफ्फर खान नियामत खान (३०) रा. हैदरपुरा इदगाह फाटा पठाण चौकसमोर अमरावती, आप्पाराव नुकूराजू गौड (४०) रा. चिन्नागडा, पो.स्टे. चिंतापल्ली, जि. विशाखापट्टनम आणि शेख आबीद शेख रज्जाक (२०) रा. जमील कॉलनी, अमरावती अशी आरोपींची नावे आहेत.रेल्वे पोलिसांच्यावतीने नित्याप्रमाणे स्थानकावर तपासणी सुरू असताना फलाट क्रमांक तीनवर नागपूरकडे जाण्यासाठी तीन संशयीत इसम आढळून आले. त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना रेल्वे पोलीस चौकी सेवाग्राम येथे आणून तपासणी केली असता त्यांच्या पोटावर पांढऱ्या रंगाच्या कापडी पिशवीमध्ये काहीतरी बांधून असल्याचे दिसले. त्यांची अधिक चौकशी केली असता गांजा घेऊन जात असल्याची कबुली दिली. हा गांजा पांढऱ्या रंगाच्या चार ते पाच फुट लांब पिशवीमध्ये ठेवण्यात आला होता. ती पिशवी चापट करून तिघांनीही पोटाला गुंडाळली होती. ती पद्धतशीरपणे बांधून ते नागपूर येथे घेऊन जात होते. प्रत्येकाकडे सुमारे पाच किलो प्रमाणे तिघांकडून १५ किलो ३४१ ग्रॅम किंमत १ लाख ५३ हजार ७१० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रसंगी पंच व नायब तहसीलदार सी.जी. बर्वे यांच्या समक्ष पंचनामा करून आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई रेल्वे पोलीस निरीक्षक नालट, दिलीप बारंगे, श्याम धुर्वे, अशोक हनवंते, राहुल यावले तसेच सेवाग्राम येथील पोलीस उपनिरीक्षक जाटोलीया, उमेशसिंग, आर.के. भारती, सुभाष जुमळे, प्रमोद सांगळे, चौधरी, लोकेश राऊत, गणेश पवार, आकाश मेश्राम यांनी केली.(कार्यालय प्रतिनिधी) एका फेरीसाठी चार हजार रुपयेरेल्वेच्या माध्यमातून गांजा बहुतांश भागात पोहोचविला जातो. यासाठी गरीब व थोडी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले युवक हेरले जातात. अमरावती येथील दोन्ही युवकांनी पहिल्यांदाच गांजा घेऊन जात असल्याची कबुली दिली. शिवाय किती रुपयांचा माल आहे, याबाबत माहिती नाही. आम्हाला संबंधित टोळीकडून प्रत्येक फेरीसाठी तीन ते चार हजार रुपये दिले जातात. शिवाय जेवण आणि अन्य खर्चही तेच करतात, असे सांगितले. यावरून गांजाची तस्करी करणारी मोठी टोळी असल्याचे निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.