शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

151 मृत कोविड बाधितांवर वर्धेत झालेत अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 05:00 IST

शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून वर्धा शहरातील वैकुंठधामात मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. याच ठिकाणी जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील रहिवासी असलेल्या तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करून अंत्यसंस्कार केले जात आहेत.

ठळक मुद्देमार्च महिन्यातील स्थिती : ४९ मृतक जिल्ह्याबाहेरील रहिवासी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मार्च महिन्यात तब्बल १५१ मृत कोविड बाधितांवर वर्धा येथील वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यापैकी ४९ व्यक्ती जिल्ह्याबाहेरील असून तशी नोंद वर्धा नगरपालिका प्रशासनाने घेतली आहे.शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून वर्धा शहरातील वैकुंठधामात मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. याच ठिकाणी जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील रहिवासी असलेल्या तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करून अंत्यसंस्कार केले जात आहेत. मार्च महिन्यात या वैकुंठधामात तब्बल १५१ मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यापैकी ४९ व्यक्ती जिल्ह्याबाहेरील असल्याचे सांगण्यात आले. सध्या कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या ठिकाणची व्यवस्था सध्या तोकडी पडत आहे. भविष्यातील गरज लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने पर्यायी व्यवस्थाही उभी करणे गरजेचे आहे.

सूचना मिळताच स्मशानभूमितील कर्मचारी होतात ॲक्टिव्हआज किती मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करायचे आहेत याची माहिती सुरूवातीला स्मशानभूमितील कर्मचाऱ्यांना दिली जाते. ही माहिती मिळताच कर्मचारीही ॲक्टिव्ह मोडवर येत संपूर्ण तयारी करतात. शववाहिनीच्या सहाय्याने आणण्यात आलेले मृत कोविड बाधिताचे पार्थिव पीपीई किट परिधान केलेले व्यक्ती थेट रचलेल्या सरणावर ठेवतात. त्यानंतर त्या मृतदेहाला मुखाग्नी दिला जातो. जवळपास अशाच पद्धतीचा अवलंब करून काही मृत कोविड बाधितांवर दफनविधीही करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

आर्वी तालुक्यातील घटनेनंतर बदलली रणनीतीआर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथे १० मे रोजी जिल्ह्यातील कोविडचा पहिला रुग्ण सापडला. या महिला कोविड बाधिताच्या अंत्यसंस्कारासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती. तर अंत्यविधी झाल्यानंतर या महिलेचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीवर वर्धा येथील वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

एकाच वेळी नऊ मृतांना मुखाग्नीची व्यवस्थावर्धा शहरातील इतवारा भागात असलेल्या वैकुंठधामात मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेगळी आणि विशिष्ट व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरात एकाच वेळी तब्बल नऊ मृत कोविड बाधितांना मुखाग्नी देण्याची व्यवस्था आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू