शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

१५० नागरिकांना घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:35 IST

मानसी फायनान्स या कंपनीकडून लाख रूपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली १५० जणांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आली आहे. सदर व्यक्तींकडून प्रत्येकी ६ हजार रुपये उकळून त्यांना एकूण नऊ लाखांनी गंडा घालण्यात आला असून त्याबाबतची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपोलिसात तक्रार : फायनान्सच्या नावाखाली नऊ लाखांची अफरातफर

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : मानसी फायनान्स या कंपनीकडून लाख रूपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली १५० जणांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आली आहे. सदर व्यक्तींकडून प्रत्येकी ६ हजार रुपये उकळून त्यांना एकूण नऊ लाखांनी गंडा घालण्यात आला असून त्याबाबतची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. चौकशी अंती गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, अंतोरा येथील रविंद्र प्रांजळे, गणेश कुरवाडे चिंचोली या दोघा एजंटनी मानसी फायनान्स कन्सल्टन्सी प्रा. लि. न्यू लक्ष्मीनगर कॉलनी नं. २ जय प्लाझा सर्कीट हाऊस रोड गोरेगाव वेस्ट मुंबई या नावाने कंपनी तयार केली. याचे पत्रक छापून ग्रामीण भागात वाटण्यात आली.यामध्ये विमा खर्च, प्रोसेसींग फी, कागदपत्र रजिस्टर्ड यासाठी सहा हजार रूपये देऊन एक लाख कर्ज मिळते, असे सांगितल्यावर लोकांनी त्यावर विश्वास करून पैसे देणे सुरू केले. लहान आर्वी ३५, देलवाडी २०, अंतोरा १५, खंबीत १६, अंबिकापूर १०, चिंचोली ४, किन्हाळा ५, जोलवाडी ७, बेलोरा १३, माणिकनगर ६ आणि इतर गावात २० असे एकूण १५० लोकांजवळून यामध्ये महिला बचत गट सदस्य, गावातील नागरीक यांच्याकडून प्रत्येकी सहा हजार रुपये गोळा करण्यात आले. त्याच्या पावत्या या दोन्ही एजंटनी दिल्या नाही. सर्व लोकांना २ नोव्हेंबर २०१८ ला प्रत्येकी १ लाख कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजवरी १७ वेळा तारीख पे तारीख देत मोठ्या प्रमाणात बनवेगिरी करण्यात आली. शेवटी लोकांनी प्रांजळे व कुरवाडे या दोघांना ६ हजार परत देण्याची मागणी केली असता त्यांनी पळून गेलो का, कंपनीने फसविले असे म्हणत पैसे देणाऱ्यांच्या अडचणीतच भर टाकली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच देलवाडीचे राजेंद्र कोहळे, लहानआर्वीचे विलास गुंबळे व आदींनी आष्टी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.आष्टी (शहीद)चे ठाणेदार जितेंद्र चांदे यांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून याप्रकरणी आर्थीक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात अशा अनेक फायनान्स कंपन्यांनी जाळा पसरविले असून त्यांच्याकडून होणाºया आर्थिक फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांनीही कुणालाही असे पैसे देवू नयेत, असे पोलिसांनी केले आहे.मानसी फायनान्स या कंपनीकडून १ लाख कर्ज देतो असे सांगितल्यावर आम्ही त्यावर विश्वास ठेवून प्रत्येकी ६ हजार रूपये दिले होते. मात्र, ४ महिने लोटूनही कर्ज दिले नाही. आमची फसवणूकच झाली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.- राजेंद्र कोहळे, देलवाडी.सदर प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येईल.- जितेंद्र चांदे, ठाणेदार, आष्टी (शहीद).

टॅग्स :fraudधोकेबाजी