शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

६० वर्षांत १५ व्यक्तींनी भूषविले पं. स.चे सभापतीपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2022 05:00 IST

सेलू तालुक्यातील राजकीय परिस्थिती दिवसागणिक बदलत आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय गट तालुक्यात सक्षम आहेत. यावेळी होणारी निवडणूक सोपी व सहज कोणत्याही राजकीय नेत्याला घेता येणार नाही, अशीच परिस्थिती आहे. पंचायत समितीचे बारा गण असून, भाजप व काँग्रेसमध्ये खरी लढत होणार असल्याचे म्हटले जाते. असे असले तरी साहसिक जनशक्ती, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचेही प्राबल्य काही गणांत आहे.

विजय माहुरेलोकमत न्यूज नेटवर्कसेलू (घोराड) : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे गट व गण जाहीर होत प्रारूप रचना तयार करण्यात आली आहे. यामुळे सध्या ग्रामीण भागात हळूहळू हा होईना पण राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. ६० वर्षांत १५ व्यक्तींनी सेलू पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले असून, यानंतर कोणाची वर्णी लागणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.सेलू तालुक्यातील राजकीय परिस्थिती दिवसागणिक बदलत आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय गट तालुक्यात सक्षम आहेत. यावेळी होणारी निवडणूक सोपी व सहज कोणत्याही राजकीय नेत्याला घेता येणार नाही, अशीच परिस्थिती आहे. पंचायत समितीचे बारा गण असून, भाजप व काँग्रेसमध्ये खरी लढत होणार असल्याचे म्हटले जाते. असे असले तरी साहसिक जनशक्ती, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचेही प्राबल्य काही गणांत आहे. तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवार ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पंचायत समितीवर आपली सत्ता यावी, यासाठी आतापासूनच विविध पक्षाचे पुढारी राजकीय खेळी खेळत सक्षम उमेदवाराचा शोध घेताना दिसत आहेत. आरक्षणाची सोडत कशी राहील, याचा अंदाज राजकीय नेत्यांना काही प्रमाणात असल्याने तशा उमेदवाराचा शोध सुरू असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. एकूणच परिसरात सध्या राजकीय वातावरण हळूहळू तापत आहेच. 

निवडणूक काँग्रेस-भाजपसाठी प्रतिष्ठेचीच-  सेलू तालुक्यात भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चांगलेच नेटवर्क आहे. गावागावात पदाधिकारी व कार्यकर्ते असून जिल्हा परिषदे व पंचायत समितीची निवडणूक भाजप व काँग्रेससाठी प्रतिष्ठेचीच राहणार आहे.

यांनी भूषविले सभापतीपद-    अमृत काटकर (दोनवेळा), पुरुषोत्तम दाते, मनोहर सोनटक्के, सुरेश जयस्वाल, जंगलू मसराम, विजय जयस्वाल, चंदा उईके, रामचंद्र चाफले, भीमराव गोमासे, मैनावती सोनपितळे, नीलिमा दंडारे, श्रीराम तुमडाम, मंजुषा दुधबडे, जयश्री खोडे, अशोक मुडे यांनी सेलू पंचायत समितीचे सभापती म्हणून पद भूषविले आहे.

पहिल्या सभापतीचा मान काटकर यांचाच-    सेलू पंचायत समितीचे पहिले सभापतीपद मोही येथील काँग्रेसचे अमृत सीताराम काटकर यांनी भूषविले होते. १९६२ ते १९९० सलग २८ वर्ष हे पद काँग्रेस पक्षाला मिळाले. पण नंतर जयस्वाल गटाची पकड या पंचायत समितीवर राहिली. त्यांना अपक्ष, भाजपची साथ मिळाली.  अलीकडच्या दहा वर्षांत भाजपचे अधिपत्य या पंचायत समितीवर राहिले. २०१७ ते २०२२मध्येही भाजपची सत्ता होती. मात्र, प्रशासक राज सुरू होण्यापूर्वी भाजपचे अशोक मुडे हे सभापती होते. तर सध्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने पंचायत समितीवर प्रशासक राज आहे.

 

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती