शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

१५ लाखांत १.५ दलघमी पाणी

By admin | Updated: May 13, 2016 02:06 IST

शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे.

शहरात पाणीटंचाई : पालिकेने घेतले पाणी विकतहिंगणघाट : शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. यामुळे शहर वासियांची तहान भागविण्यासाठी नगर परिषदेने पाटबंधारे विभागाकडून १५ लाख रुपयांत १.५ द.ल.घ.मी. पाण्याची उचल केलेली आहे. हा पाणीसाठा आजंती बंधाऱ्यात उपलब्ध झालेला आहे. भविष्यात नागरिकांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार नसले तरीही नागरिकांनी जपून व काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. शहरात अनेक ठिकाणी बोअरींगची व्यवस्था आहे; परंतु उन्हाळ्यामध्ये बोअरींगचा वापर वाढल्यास बोअरींग बिघडण्याच्या तक्रारीतही सातत्याने वाढ होत आहे. त्याच्या दुरुस्तीकरिता नगर परिषदेने पथक तैनात करण्यात आले असून त्यांना तक्रारीची प्रथम दखल घेण्याचे निर्देश असल्याचे पालिकेकडून देण्यात आले आहे. टंचाईग्रस्त भागात पाण्याविना नागरिकांची भटकंती होवू नये म्हणून नगर पालिकेच्या वतीने दोन टँकरद्वारे सतत पाणी पुरवठा सुरू आहे. ज्या भागात पाण्याची टंचाई जाणवत असेल त्यांनी नगर परिषदेशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे. यातून पाण्याची समस्या सोडविण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याची बचत करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्यासह न.प. उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, पाणीपुरवठा सभापती बादलसिंग रेवते, आरोग्य सभापती जितेंद्र कुकसे, महिला व बालकल्याण सभापती ज्योती मुडे, शिक्षण सभापती सोनाली सुटे, बांधकाम सभापती गीता मांडवकर, स्थायी समिती सदस्य प्रा. राजू अवचट, शंकर मोहमारे, अनिल भोंगाडे व सर्व नगर सेवकांच्या वतीने करण्यात आले आहे.(तालुका प्रतिनिधी)