शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

१५ लाखांत १.५ दलघमी पाणी

By admin | Updated: May 13, 2016 02:06 IST

शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे.

शहरात पाणीटंचाई : पालिकेने घेतले पाणी विकतहिंगणघाट : शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. यामुळे शहर वासियांची तहान भागविण्यासाठी नगर परिषदेने पाटबंधारे विभागाकडून १५ लाख रुपयांत १.५ द.ल.घ.मी. पाण्याची उचल केलेली आहे. हा पाणीसाठा आजंती बंधाऱ्यात उपलब्ध झालेला आहे. भविष्यात नागरिकांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार नसले तरीही नागरिकांनी जपून व काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. शहरात अनेक ठिकाणी बोअरींगची व्यवस्था आहे; परंतु उन्हाळ्यामध्ये बोअरींगचा वापर वाढल्यास बोअरींग बिघडण्याच्या तक्रारीतही सातत्याने वाढ होत आहे. त्याच्या दुरुस्तीकरिता नगर परिषदेने पथक तैनात करण्यात आले असून त्यांना तक्रारीची प्रथम दखल घेण्याचे निर्देश असल्याचे पालिकेकडून देण्यात आले आहे. टंचाईग्रस्त भागात पाण्याविना नागरिकांची भटकंती होवू नये म्हणून नगर पालिकेच्या वतीने दोन टँकरद्वारे सतत पाणी पुरवठा सुरू आहे. ज्या भागात पाण्याची टंचाई जाणवत असेल त्यांनी नगर परिषदेशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे. यातून पाण्याची समस्या सोडविण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याची बचत करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्यासह न.प. उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, पाणीपुरवठा सभापती बादलसिंग रेवते, आरोग्य सभापती जितेंद्र कुकसे, महिला व बालकल्याण सभापती ज्योती मुडे, शिक्षण सभापती सोनाली सुटे, बांधकाम सभापती गीता मांडवकर, स्थायी समिती सदस्य प्रा. राजू अवचट, शंकर मोहमारे, अनिल भोंगाडे व सर्व नगर सेवकांच्या वतीने करण्यात आले आहे.(तालुका प्रतिनिधी)