शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना १५ लाख ३२ हजारांनी गंडविले

By admin | Updated: November 22, 2014 23:06 IST

येथील समतानगर, विक्रमशिलानगर, मास्टर कॉलनी व सेवाग्राम येथील नागरिकांना माया अग्रवाल व महेंद्र अग्रवाल या दोघांनी १५ लाख ३२ हजार ४०० रुपयांनी गंडा घातल्याची तक्रार शहर ठाण्यात करण्यात आली.

वर्धा : येथील समतानगर, विक्रमशिलानगर, मास्टर कॉलनी व सेवाग्राम येथील नागरिकांना माया अग्रवाल व महेंद्र अग्रवाल या दोघांनी १५ लाख ३२ हजार ४०० रुपयांनी गंडा घातल्याची तक्रार शहर ठाण्यात करण्यात आली. ही तक्रार एकूण ४८ महिला व दोन पुरूषांनी केली आहे. या दोघांनी गंडविल्याची तक्रार यापूर्वी १९ महिलांनी शहर ठाण्यात केली होती. त्याचा तपास सुरू असताना पुन्हा आलेल्या तक्रारीवरून यात गंडविल्या गेलेले आणखी नागरिक असतील ु, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही तक्रार येथील सत्यमेव जयते जनआंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष राहुलकान्त सिन्हा, विदर्भ प्रभारी सुभाष खोडके, जिल्हा अध्यक्ष वर्धा सिद्धांत कांबळे यांनी या नागरिकांसह नोंदविली. फसवणुकीची एकूण रक्कम १५ हजार ३२ हजार ४०० रुपये आहे. १८ नोव्हेंबर २०१४ ला १९ महिलांनी या दोघांपूर्वी तक्रार केली होती. त्यांची २४ लाख ३२ हजार १४५ रुपयांनी फसगत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. सदर तक्रार स्टेशन डायरीमध्ये केली आहे. तर जुन्या तक्रारीसोबतच या तक्रारीलाही जोडण्यात येणार असल्याचे पालिसांनी सांगितले आहे. महेंद्र अग्रवाल गौरक्षण वॉर्डात राहतात. आरोपीचे अटक पूर्व जामीण मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जनआंदोलनाकडून कळविण्यात आले आहे. यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. शहरात आणि शहराच्या बाहेर २०० पेक्षा जास्त महिलांना या दोघांनी फसविल्याचा आरोप सत्यमेव जयते जनआंदोलनाच्यावतीने करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करून आरोपीला ताबडतोब अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)