शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

१४ गावांतील नागरिकांची वनविभागावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:57 IST

बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत निर्माण झालेल्या समस्या वनविभागाच्या कानावर घालण्याकरिता आधार संघर्ष समितीने नेतृत्वात १४ गावांतील नागरिकांचा समावेश असलेली ‘वनमंत्री मुखदर्शन आंदोलन’ची पदयात्रा सोमवारी वर्धेत जिल्हा उपवनसंरक्षकांच्या कार्यालयावर धडकली. यावेळी आंदोलकांनी कार्यालयात ठिय्या मांडला. दरम्यान, वन अधिकाऱ्यांनी बोर व्याघ्र प्रकल्पातील नागरिकांच्या समस्या मार्गी काढाव्या, अशी मागणी केली.

ठळक मुद्देबोर व्याघ्र प्रकल्पग्रस्तांचे ‘वनमंत्री मुखदर्शन’ आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत निर्माण झालेल्या समस्या वनविभागाच्या कानावर घालण्याकरिता आधार संघर्ष समितीने नेतृत्वात १४ गावांतील नागरिकांचा समावेश असलेली ‘वनमंत्री मुखदर्शन आंदोलन’ची पदयात्रा सोमवारी वर्धेत जिल्हा उपवनसंरक्षकांच्या कार्यालयावर धडकली. यावेळी आंदोलकांनी कार्यालयात ठिय्या मांडला. दरम्यान, वन अधिकाऱ्यांनी बोर व्याघ्र प्रकल्पातील नागरिकांच्या समस्या मार्गी काढाव्या, अशी मागणी केली.ही पदयात्रा उपवनसंरक्षक कार्यालयवर पोहोचल्याची माहिती खा. रामदास तडस यांना मिळताच तेही वनविविभागाच्या कार्यालयात पोहोचले. खा. तडस व आंदोलनाचे नेतृत्व करणारे हरिष इथापे, भास्कर इथापे यांच्यासह संघर्ष समितीत असलेल्या इतर सदस्यांच्या उपस्थितीत त्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातील मागण्या मान्य करण्याची मागणी आंदोलकांनी केली. यावर खा. तडस यांनी वनमंत्री मुंबईत असल्याने त्यांची भेट घेणे सध्या शक्य नाही. त्यांची तारीख घेवून ३० मे पूर्वी नागपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आधार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांची बैठक घेण्यात येईल. त्याची तारीख लवकरच कळवू असे आश्वासन खा. तडस यांनी आंदोलकांना दिले. या आश्वासनावर आंदोलकांनी माघार घेतली. यावेळी वनविभागाचे अधिकारीही उपस्थित होते.वनमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत काय निर्णय होतो. यावर आंदोलनाची पुढील भूमिका ठरवू, अशी माहिती हरिष इथापे यांनी दिली. वनमंत्री मुखदर्शन आंदोलनात सेलू तालुक्यातील सालई (कला) या गावातून निघालेली पदयात्रा रविवारी रात्री वर्धेतील धुनिवाले मठ चौकात पोहोचली. येथे मुक्काम करून ही पदयात्रा आज सकाळी १० वाजता शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत उपवनसंरक्षकाच्या कार्यालयावर धडकली. पदयात्रा येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांना असल्याने येथे सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.बोर व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली; पण बाधित गावांच्या पुनर्वसनाकडे लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शिवाय वाघांच्या हल्ल्यात गुरांसह मनुष्यांनाही जीव गमवावा लागत आहे. यामुळे शासनाला जागे करण्यासाठी बोर व्याघ्र प्रकल्प पुनर्वसन आधार संघर्ष समितीने वनमंत्री मुखदर्शन आंदोलन सुरू केले आहे.यासाठी शनिवारपासून आमगाव ते वर्धा वन विभाग कार्यालय, अशी पदयात्रा आरंभली होती. प्रशासन जागे करण्यासाठी हरिष इथापे व तब्बल १४ गावांतील युवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी आमगाव (जंगली) ते वनविभाग कार्यालय वर्धा अशी पदयात्रा काढत वनमंत्री मुखदर्शन आंदोलन सुरू केले होते. आज त्याचा समारोप झाला.वनविभागाचे अधिकारी सुरक्षा घेऱ्यातपदयात्रा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या उपवनसरंक्षकांच्या कार्यालयावर धडकली. याची माहिती विनभागाच्या अधिकाºयांना असल्याने त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेला पाचारण केले होते. उपवनसंरक्षकांच्या कार्यालयालयाला यावेळी पोलीस छावणीचे स्वरूप आल्याचे दिसले. आंदोलन शांतेच्या मार्गाने असताना शासनाकडून एवढी सुरक्षा कशाला, अशी चर्चा आंदोलक करीत होते.