शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

१४ गावांतील नागरिकांची वनविभागावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:57 IST

बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत निर्माण झालेल्या समस्या वनविभागाच्या कानावर घालण्याकरिता आधार संघर्ष समितीने नेतृत्वात १४ गावांतील नागरिकांचा समावेश असलेली ‘वनमंत्री मुखदर्शन आंदोलन’ची पदयात्रा सोमवारी वर्धेत जिल्हा उपवनसंरक्षकांच्या कार्यालयावर धडकली. यावेळी आंदोलकांनी कार्यालयात ठिय्या मांडला. दरम्यान, वन अधिकाऱ्यांनी बोर व्याघ्र प्रकल्पातील नागरिकांच्या समस्या मार्गी काढाव्या, अशी मागणी केली.

ठळक मुद्देबोर व्याघ्र प्रकल्पग्रस्तांचे ‘वनमंत्री मुखदर्शन’ आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत निर्माण झालेल्या समस्या वनविभागाच्या कानावर घालण्याकरिता आधार संघर्ष समितीने नेतृत्वात १४ गावांतील नागरिकांचा समावेश असलेली ‘वनमंत्री मुखदर्शन आंदोलन’ची पदयात्रा सोमवारी वर्धेत जिल्हा उपवनसंरक्षकांच्या कार्यालयावर धडकली. यावेळी आंदोलकांनी कार्यालयात ठिय्या मांडला. दरम्यान, वन अधिकाऱ्यांनी बोर व्याघ्र प्रकल्पातील नागरिकांच्या समस्या मार्गी काढाव्या, अशी मागणी केली.ही पदयात्रा उपवनसंरक्षक कार्यालयवर पोहोचल्याची माहिती खा. रामदास तडस यांना मिळताच तेही वनविविभागाच्या कार्यालयात पोहोचले. खा. तडस व आंदोलनाचे नेतृत्व करणारे हरिष इथापे, भास्कर इथापे यांच्यासह संघर्ष समितीत असलेल्या इतर सदस्यांच्या उपस्थितीत त्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातील मागण्या मान्य करण्याची मागणी आंदोलकांनी केली. यावर खा. तडस यांनी वनमंत्री मुंबईत असल्याने त्यांची भेट घेणे सध्या शक्य नाही. त्यांची तारीख घेवून ३० मे पूर्वी नागपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आधार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांची बैठक घेण्यात येईल. त्याची तारीख लवकरच कळवू असे आश्वासन खा. तडस यांनी आंदोलकांना दिले. या आश्वासनावर आंदोलकांनी माघार घेतली. यावेळी वनविभागाचे अधिकारीही उपस्थित होते.वनमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत काय निर्णय होतो. यावर आंदोलनाची पुढील भूमिका ठरवू, अशी माहिती हरिष इथापे यांनी दिली. वनमंत्री मुखदर्शन आंदोलनात सेलू तालुक्यातील सालई (कला) या गावातून निघालेली पदयात्रा रविवारी रात्री वर्धेतील धुनिवाले मठ चौकात पोहोचली. येथे मुक्काम करून ही पदयात्रा आज सकाळी १० वाजता शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत उपवनसंरक्षकाच्या कार्यालयावर धडकली. पदयात्रा येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांना असल्याने येथे सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.बोर व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली; पण बाधित गावांच्या पुनर्वसनाकडे लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शिवाय वाघांच्या हल्ल्यात गुरांसह मनुष्यांनाही जीव गमवावा लागत आहे. यामुळे शासनाला जागे करण्यासाठी बोर व्याघ्र प्रकल्प पुनर्वसन आधार संघर्ष समितीने वनमंत्री मुखदर्शन आंदोलन सुरू केले आहे.यासाठी शनिवारपासून आमगाव ते वर्धा वन विभाग कार्यालय, अशी पदयात्रा आरंभली होती. प्रशासन जागे करण्यासाठी हरिष इथापे व तब्बल १४ गावांतील युवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी आमगाव (जंगली) ते वनविभाग कार्यालय वर्धा अशी पदयात्रा काढत वनमंत्री मुखदर्शन आंदोलन सुरू केले होते. आज त्याचा समारोप झाला.वनविभागाचे अधिकारी सुरक्षा घेऱ्यातपदयात्रा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या उपवनसरंक्षकांच्या कार्यालयावर धडकली. याची माहिती विनभागाच्या अधिकाºयांना असल्याने त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेला पाचारण केले होते. उपवनसंरक्षकांच्या कार्यालयालयाला यावेळी पोलीस छावणीचे स्वरूप आल्याचे दिसले. आंदोलन शांतेच्या मार्गाने असताना शासनाकडून एवढी सुरक्षा कशाला, अशी चर्चा आंदोलक करीत होते.