शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

१४ गावांतील नागरिकांची वनविभागावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:57 IST

बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत निर्माण झालेल्या समस्या वनविभागाच्या कानावर घालण्याकरिता आधार संघर्ष समितीने नेतृत्वात १४ गावांतील नागरिकांचा समावेश असलेली ‘वनमंत्री मुखदर्शन आंदोलन’ची पदयात्रा सोमवारी वर्धेत जिल्हा उपवनसंरक्षकांच्या कार्यालयावर धडकली. यावेळी आंदोलकांनी कार्यालयात ठिय्या मांडला. दरम्यान, वन अधिकाऱ्यांनी बोर व्याघ्र प्रकल्पातील नागरिकांच्या समस्या मार्गी काढाव्या, अशी मागणी केली.

ठळक मुद्देबोर व्याघ्र प्रकल्पग्रस्तांचे ‘वनमंत्री मुखदर्शन’ आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत निर्माण झालेल्या समस्या वनविभागाच्या कानावर घालण्याकरिता आधार संघर्ष समितीने नेतृत्वात १४ गावांतील नागरिकांचा समावेश असलेली ‘वनमंत्री मुखदर्शन आंदोलन’ची पदयात्रा सोमवारी वर्धेत जिल्हा उपवनसंरक्षकांच्या कार्यालयावर धडकली. यावेळी आंदोलकांनी कार्यालयात ठिय्या मांडला. दरम्यान, वन अधिकाऱ्यांनी बोर व्याघ्र प्रकल्पातील नागरिकांच्या समस्या मार्गी काढाव्या, अशी मागणी केली.ही पदयात्रा उपवनसंरक्षक कार्यालयवर पोहोचल्याची माहिती खा. रामदास तडस यांना मिळताच तेही वनविविभागाच्या कार्यालयात पोहोचले. खा. तडस व आंदोलनाचे नेतृत्व करणारे हरिष इथापे, भास्कर इथापे यांच्यासह संघर्ष समितीत असलेल्या इतर सदस्यांच्या उपस्थितीत त्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातील मागण्या मान्य करण्याची मागणी आंदोलकांनी केली. यावर खा. तडस यांनी वनमंत्री मुंबईत असल्याने त्यांची भेट घेणे सध्या शक्य नाही. त्यांची तारीख घेवून ३० मे पूर्वी नागपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आधार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांची बैठक घेण्यात येईल. त्याची तारीख लवकरच कळवू असे आश्वासन खा. तडस यांनी आंदोलकांना दिले. या आश्वासनावर आंदोलकांनी माघार घेतली. यावेळी वनविभागाचे अधिकारीही उपस्थित होते.वनमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत काय निर्णय होतो. यावर आंदोलनाची पुढील भूमिका ठरवू, अशी माहिती हरिष इथापे यांनी दिली. वनमंत्री मुखदर्शन आंदोलनात सेलू तालुक्यातील सालई (कला) या गावातून निघालेली पदयात्रा रविवारी रात्री वर्धेतील धुनिवाले मठ चौकात पोहोचली. येथे मुक्काम करून ही पदयात्रा आज सकाळी १० वाजता शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत उपवनसंरक्षकाच्या कार्यालयावर धडकली. पदयात्रा येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांना असल्याने येथे सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.बोर व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली; पण बाधित गावांच्या पुनर्वसनाकडे लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शिवाय वाघांच्या हल्ल्यात गुरांसह मनुष्यांनाही जीव गमवावा लागत आहे. यामुळे शासनाला जागे करण्यासाठी बोर व्याघ्र प्रकल्प पुनर्वसन आधार संघर्ष समितीने वनमंत्री मुखदर्शन आंदोलन सुरू केले आहे.यासाठी शनिवारपासून आमगाव ते वर्धा वन विभाग कार्यालय, अशी पदयात्रा आरंभली होती. प्रशासन जागे करण्यासाठी हरिष इथापे व तब्बल १४ गावांतील युवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी आमगाव (जंगली) ते वनविभाग कार्यालय वर्धा अशी पदयात्रा काढत वनमंत्री मुखदर्शन आंदोलन सुरू केले होते. आज त्याचा समारोप झाला.वनविभागाचे अधिकारी सुरक्षा घेऱ्यातपदयात्रा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या उपवनसरंक्षकांच्या कार्यालयावर धडकली. याची माहिती विनभागाच्या अधिकाºयांना असल्याने त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेला पाचारण केले होते. उपवनसंरक्षकांच्या कार्यालयालयाला यावेळी पोलीस छावणीचे स्वरूप आल्याचे दिसले. आंदोलन शांतेच्या मार्गाने असताना शासनाकडून एवढी सुरक्षा कशाला, अशी चर्चा आंदोलक करीत होते.