शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

१४ कोटी परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 21:52 IST

वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने ब्रेक लावत लायसन्स रद्द केले होते. शासनाने १६१.२१ कोटी रुपयांची मदत केल्याने बँकेला लायसन्स परत घेता आले.

ठळक मुद्देसहकारी बँकेतील व्यवहाराची गाडी रुळावर

ऑनलाईन लोकमतवर्धा : वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने ब्रेक लावत लायसन्स रद्द केले होते. शासनाने १६१.२१ कोटी रुपयांची मदत केल्याने बँकेला लायसन्स परत घेता आले. आता कर्जमाफीने बँक तारली गेली असून ४० टक्के वा अधिकाधिक एक लाख याप्रमाणे ठेवीदारांना १४ कोटी रुपये परत करण्यात आले आहेत.शेतकऱ्यांकडील कर्ज अडकले तथा खासगी संस्था, उद्योगांना दिलेले कर्ज वसूल करता आले नाही. यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तोट्यात आली. शिवाय रिझर्व्ह बँकेने दिलेले संगणकीकरण तथा वसुली करण्याचे निर्देशही बँकेला वेळेपर्यंत पाळता आले नाही. परिणामी, रिझर्व्ह बँकेने राज्यातील काही शाखांचे परवानेच रद्द केले. यात वर्धा सहकारी बँकेचे व्यवहारही बंद झाले. बँकच बंद झाल्याने वसुलीही ठप्प झाली. असे असले तरी काही प्रमाणात पीक कर्जाची वसुली करून बँकेने तग धरला; पण यात व्यवहार सुरळीत होणे नव्हते. शासनाकडे मदतीची मागणी केली. यावर बरेच वर्षे खल झाले. अखेर राज्य शासनाकडून १२७ कोटी ९६ लाख रुपये, केंद्र शासनाकडून २२ कोटी १७ लाख रुपये तर नाबार्डकडून ११ कोटी ८ लाख रुपये प्राप्त झाले. या रकमेतून सहकारी बँकेला परवाना परत मिळविता आला.दरम्यान, ठेवी अडकल्याने ठेवीदारांत असंतोष होता. अनेकदा मोर्चे काढून बँकेने ठेवी परत करण्याची मागणी केली गेली; पण बँक प्रशासन हतबल होते. आता मात्र बँकेला कर्जमाफीच्या रूपात नवीन उर्जा मिळाली आहे. सहकारी बँकेच्या १२ हजार थकबाकीदार शेतकºयांना शासनाकडून ५५ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. या रकमेतून बँकेला व्यवहार सुरळीत करण्याची संधी प्राप्त झाली आहे. आणखी १५ हजार शेतकºयांचे कर्ज माफ व्हायचे असून ती रक्कमही बँकेला संजीवनी ठरणार आहे. बँकेला कोष उपलब्ध झाल्याने ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सध्या ठेवीच्या ४० टक्के प्रमाणे वा अधिकाधिक एक लाख रुपयांप्रमाणे ठेवी परत केल्या जात आहेत. यात आजपर्यंत १४ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आलेले आहे. ठेवी परत मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. बँक पुन्हा विश्वास संपादित करीत असल्याचेही दिसून येत आहे.पीक कर्जासाठी प्रस्ताव पाठविणारखरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्याला ७५० कोटींचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. हे पीककर्ज राष्ट्रीयकृत तथा खासगी बँकांच्या १२८ शाखांतून वितरित केले जाणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कर्जवाटप करायचे झाल्यास शासनाकडे प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.ठेवी स्वीकारणे सुरूकर्जमाफीच्या रकमेतून बँकेला व्यवहार सुरळीत करण्याची संधी मिळाली आहे. आणखी १५ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यातूनही बँकेला बऱ्यापैकी कोष उपलब्ध होणार आहे. शिवाय जुन्या ठेवी परत केल्या जात असल्याने ग्राहकांचा विश्वास संपादित होत आहे. आता व्यवहार सुरळीत करण्याच्या उद्देशाने बँकेने नवीन ठेवी स्वीकारण्यास प्रारंभ केला आहे.