शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

१४ गावांचा कारभार चार कर्मचाऱ्यांवर

By admin | Updated: November 17, 2014 22:59 IST

देवळी पोलीस ठाण्याच्या अधिकारक्षेत्रात येत असलेल्या या पोलीस चौकीत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने अनेक अडचणी आहेत. रात्री कर्मचारी गस्तीवर व दारू पकडण्याच्या कामात असल्याने

वायगाव (नि.) : देवळी पोलीस ठाण्याच्या अधिकारक्षेत्रात येत असलेल्या या पोलीस चौकीत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने अनेक अडचणी आहेत. रात्री कर्मचारी गस्तीवर व दारू पकडण्याच्या कामात असल्याने पोलीस चौकीला कुलूप असते. यामुळे रात्री उशिरा जर एखादी घटना घडली, तर नागरिकांना त्रासाला समोर जावे लागत आहे. या चौकीअंतर्गत १४ गावांचा कारभार असल्याने कोणता कर्मचारी कोणत्या वेळी कुठे राहील याचा नेम राहत नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहे. गावाची लोकसंख्या चार हजाराच्या घरात आहे. येथे घडलेल्या वल्लभ भुतडा हत्याकांडामुळे तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी या ठाण्याला दुचाकी दिली होती. या दुचाकीमुळे गावातील गल्लीबोळ्यातून गस्त घालणे सोपे जात होते. सध्या या चौकीची गाडी काढून घेतल्याने गल्ली बोळातील गस्त कमी झाली. येथील चौकीची ती गाडी परत घेत चौकीला मोठे वाहन देण्यात आले. हे मोठे वाहन गावाच्या आत फिरविता येत नसल्याने रात्रीची पोलीस गस्त बंद झाली. या चौकीत सध्या तीन कर्मचारी आणि एक अधिकारी कार्यरत आहे. वायगाव पोलीस चौकीअंतर्गत पिंपळगाव (लुटे), सरूळ, चना (टाकळी), ममदापूर, आंबोडा (अजाब), सोनेगाव (बार्ई), अशी गावे आहेत. त्यात पोलीस कर्मचारी तीन व एक अधिकारी आहे. यात एक जमादार, दोन शिपाई व अधिकारी आठ तासानंतर घरी जातात. दोन कर्मचारी दारू पकडण्यासाठी गेल्यावर नाईलाजाने चौकी कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याने चौकी बंद राहते. यामुळे तक्रारीकरिता गेलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागते. वायगाव हे गाव मोठे असल्याने व अतिरिक्त १४ गावे येत असल्याने वाढती गुन्हेगारी व अवैद्य धंदे लक्षात घेता वायगाव पोलीस चौकीतील कर्मचारी संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)