शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

१३,७४२ जणांवर मोकाट श्वानांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:39 IST

जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरासह विविध शहारांमध्ये व गावांमध्ये सध्या बेवारस श्वानांचा मुक्त संचार होत आहे. श्वानांनी चावा घेतल्याने अ‍ॅन्टी रेबीज नामक प्रतिबंधात्मक लस १२ महिन्यात १३ हजार ७४२ नागरिकांना टोचण्यात आली आहे.

ठळक मुद्देनागरिकांचा संतप्त सवाल : बेवारस कुत्र्यांचा बंदोबस्त केव्हा?

महेश सायखेडे ।ऑनलाईन लोकमतवर्धा : जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरासह विविध शहारांमध्ये व गावांमध्ये सध्या बेवारस श्वानांचा मुक्त संचार होत आहे. श्वानांनी चावा घेतल्याने अ‍ॅन्टी रेबीज नामक प्रतिबंधात्मक लस १२ महिन्यात १३ हजार ७४२ नागरिकांना टोचण्यात आली आहे. श्वानांच्या हैदोसामुळे बच्चेकंपनीसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने बेवारस श्वानांचा बंदोबस्त केव्हा, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.दिवस भर अन्न व पाण्याच्या शोधार्थ भटकंती करणारे बेवारस श्वास अनेकदा छोट्या मुला-मुलींच्या अंगावर धावून जातात. इतकेच नव्हे तर रात्रीच्या सुमारास ते दुचाकी व चारचाकी वाहनांच्या मागे धावतात. अचानक वाहनावर धावलेल्या श्वानामुळे वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून छोटे-मोठे अपघात झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाºयांनाही रात्री उशीरापर्यंत कर्तव्य बजावताना बेवारस श्वानांचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे. बेवारस श्वास बच्चेकंपनी व नागरिकांच्या अंगावर धाव घेऊन बहूदा चावा घेत असल्याने या प्रकाराकडे लक्ष देत संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी विशेष मोहीम हाती घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी जिल्ह्यातील सुजान नागरिकांची आहे.आता १४ ऐवजी ५ इंजेक्शनश्वान चावल्यास पूर्वी रुग्णाला पोटावर १४ इंजेक्शन न चुकता घ्यावे लागत होते. परंतु यात संशोधन झाल्याने रुग्णाला केवळ पाचच प्रतिबंधात्मक लस असलेले इंजेक्शन न चुकता घ्यावे लागतात अशी माहिती आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे रुग्णालाही मोठा दिलासा मिळाला आहे.रेबीजवर रामबाण औषध नाहीरेबीजची लागण झालेला श्वान माणसाला चावल्यास हा रोग माणसाला होतो. कुत्र्यांच्या लाळीमुळे रोगाचा प्रसार होत असून रेबीज हा रोग अत्यंत घातक व महाभयंकर आहे. सदर रोग मानवास किंवा पशुंना झाल्यास खूप हाल होऊन त्याला मरण येते. रेबीज रोगावर कोणतेही खात्रिदाक औषध नाही. केवळ रेबीज होऊ नये यासाठी प्रतिबंधक लस टोचून घेणे हाच एकमेव इलाज आहे.रेबीजची लक्षणे दिसतात ९० ते १७५ दिवसातरेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी असलेल्या श्वान, ससा, माकड, मांजर आदी चावल्यानंतर होणारा रोग आहे. या रोगामध्ये रुग्ण पाण्याला घाबरत असल्याने त्याला जलसंत्रास असेही म्हटले जाते. रेबीज हा रोग श्वानांनाही होतो. श्वानांमधून तो माणसात पसरणारा हा रोग असून या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसांमध्ये दिसतातश्वानांच्या लाळेद्वारे ‘जलसंत्रास’ रोगाचा प्रसाररेबीज या रोगाला ‘जलसंत्रास’ असेही संबोधले जाते. या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसतात. जंगलातील लांडगे जंगली श्वानांना चावतात त्यामुळे जंगली श्वानांना रेबीज होतो. ही जंगली श्वान गावातील श्वानांना चावतात त्यामुळे त्यांना हा रोग होतो. शिवाय माणसाला चावल्यास माणसाला हा रोग होत असून श्वानांच्या लाळेद्वारे रोगाचा प्रसार होत असल्याचे सांगण्यात आले.