शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

१३,७४२ जणांवर मोकाट श्वानांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:39 IST

जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरासह विविध शहारांमध्ये व गावांमध्ये सध्या बेवारस श्वानांचा मुक्त संचार होत आहे. श्वानांनी चावा घेतल्याने अ‍ॅन्टी रेबीज नामक प्रतिबंधात्मक लस १२ महिन्यात १३ हजार ७४२ नागरिकांना टोचण्यात आली आहे.

ठळक मुद्देनागरिकांचा संतप्त सवाल : बेवारस कुत्र्यांचा बंदोबस्त केव्हा?

महेश सायखेडे ।ऑनलाईन लोकमतवर्धा : जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरासह विविध शहारांमध्ये व गावांमध्ये सध्या बेवारस श्वानांचा मुक्त संचार होत आहे. श्वानांनी चावा घेतल्याने अ‍ॅन्टी रेबीज नामक प्रतिबंधात्मक लस १२ महिन्यात १३ हजार ७४२ नागरिकांना टोचण्यात आली आहे. श्वानांच्या हैदोसामुळे बच्चेकंपनीसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने बेवारस श्वानांचा बंदोबस्त केव्हा, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.दिवस भर अन्न व पाण्याच्या शोधार्थ भटकंती करणारे बेवारस श्वास अनेकदा छोट्या मुला-मुलींच्या अंगावर धावून जातात. इतकेच नव्हे तर रात्रीच्या सुमारास ते दुचाकी व चारचाकी वाहनांच्या मागे धावतात. अचानक वाहनावर धावलेल्या श्वानामुळे वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून छोटे-मोठे अपघात झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाºयांनाही रात्री उशीरापर्यंत कर्तव्य बजावताना बेवारस श्वानांचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे. बेवारस श्वास बच्चेकंपनी व नागरिकांच्या अंगावर धाव घेऊन बहूदा चावा घेत असल्याने या प्रकाराकडे लक्ष देत संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी विशेष मोहीम हाती घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी जिल्ह्यातील सुजान नागरिकांची आहे.आता १४ ऐवजी ५ इंजेक्शनश्वान चावल्यास पूर्वी रुग्णाला पोटावर १४ इंजेक्शन न चुकता घ्यावे लागत होते. परंतु यात संशोधन झाल्याने रुग्णाला केवळ पाचच प्रतिबंधात्मक लस असलेले इंजेक्शन न चुकता घ्यावे लागतात अशी माहिती आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे रुग्णालाही मोठा दिलासा मिळाला आहे.रेबीजवर रामबाण औषध नाहीरेबीजची लागण झालेला श्वान माणसाला चावल्यास हा रोग माणसाला होतो. कुत्र्यांच्या लाळीमुळे रोगाचा प्रसार होत असून रेबीज हा रोग अत्यंत घातक व महाभयंकर आहे. सदर रोग मानवास किंवा पशुंना झाल्यास खूप हाल होऊन त्याला मरण येते. रेबीज रोगावर कोणतेही खात्रिदाक औषध नाही. केवळ रेबीज होऊ नये यासाठी प्रतिबंधक लस टोचून घेणे हाच एकमेव इलाज आहे.रेबीजची लक्षणे दिसतात ९० ते १७५ दिवसातरेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी असलेल्या श्वान, ससा, माकड, मांजर आदी चावल्यानंतर होणारा रोग आहे. या रोगामध्ये रुग्ण पाण्याला घाबरत असल्याने त्याला जलसंत्रास असेही म्हटले जाते. रेबीज हा रोग श्वानांनाही होतो. श्वानांमधून तो माणसात पसरणारा हा रोग असून या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसांमध्ये दिसतातश्वानांच्या लाळेद्वारे ‘जलसंत्रास’ रोगाचा प्रसाररेबीज या रोगाला ‘जलसंत्रास’ असेही संबोधले जाते. या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसतात. जंगलातील लांडगे जंगली श्वानांना चावतात त्यामुळे जंगली श्वानांना रेबीज होतो. ही जंगली श्वान गावातील श्वानांना चावतात त्यामुळे त्यांना हा रोग होतो. शिवाय माणसाला चावल्यास माणसाला हा रोग होत असून श्वानांच्या लाळेद्वारे रोगाचा प्रसार होत असल्याचे सांगण्यात आले.