शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 13 हजार 798 शेतकऱ्यांना बांधावर मिळणार खत आणि बियाणे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 05:00 IST

 जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. यामुळे खरिपाचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत त्यात सातत्याने वाढ होत आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामासाठी प्रत्यक्षात ४ लाख १८ हजार ५६१ हेक्टरवर प्रत्यक्ष लागवड झाली होती.  यावर्षी देखील पेरणी क्षेत्रात वाढ झाली असून  ४ लाख ३७ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. 

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगामाला सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांना खते, बियाणांच्या खरेदीसाठी गैरसोय होऊ नये, कृषी केंद्रांवर गर्दी होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे व खतांची मागणी केल्यास शेतकऱ्यांना बियाणे व खते थेट त्यांच्या बांधावर पोहोचविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १३ हजार ७९८ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बियाणे व खते पोहोचविण्याचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. यामुळे खरिपाचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत त्यात सातत्याने वाढ होत आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामासाठी प्रत्यक्षात ४ लाख १८ हजार ५६१ हेक्टरवर प्रत्यक्ष लागवड झाली होती.  यावर्षी देखील पेरणी क्षेत्रात वाढ झाली असून  ४ लाख ३७ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. शेतीच्या हंगामात बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके व कृषी निविष्ठांच्या शेतकऱ्यांना उपलब्धतेसाठी रासायनिक खते व बियाणांची खरेदी आपल्या गावातील शेतकरी, बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी तथा कृषी विभाग यंत्रणांच्या संयुक्त सहकार्याने  केल्यास रास्त किमतीत उच्च गुणवत्तेचे रासायनिक खते व बियाणे तांत्रिक मार्गदर्शनासह प्राप्त होईल तसेच वाहतूक खर्चात देखील बचत होणार आहे, यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

यांच्यासोबत साधा संपर्क जिल्ह्यातील शेतकरी बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी त्यांच्या तालुक्यातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पं.स, कृषी विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तालुकास्तरावरील किरकोळ खत विक्रेते शेतकऱ्यांची मागणी असलेले रासायनिक खत व बी बियाणे यांचे शेतकरी गटप्रमुख  यांच्या वतीने व्यवहार पूर्ण करून संबंधित गावात पुरवठा करून घ्यावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांधावर खत व बियाणे योजनेंतर्गत कृषी निविष्ठांची खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

 

टॅग्स :agricultureशेती