शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

जिल्ह्यातील 13 हजार 798 शेतकऱ्यांना बांधावर मिळणार खत आणि बियाणे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 05:00 IST

 जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. यामुळे खरिपाचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत त्यात सातत्याने वाढ होत आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामासाठी प्रत्यक्षात ४ लाख १८ हजार ५६१ हेक्टरवर प्रत्यक्ष लागवड झाली होती.  यावर्षी देखील पेरणी क्षेत्रात वाढ झाली असून  ४ लाख ३७ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. 

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगामाला सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांना खते, बियाणांच्या खरेदीसाठी गैरसोय होऊ नये, कृषी केंद्रांवर गर्दी होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे व खतांची मागणी केल्यास शेतकऱ्यांना बियाणे व खते थेट त्यांच्या बांधावर पोहोचविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १३ हजार ७९८ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बियाणे व खते पोहोचविण्याचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. यामुळे खरिपाचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत त्यात सातत्याने वाढ होत आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामासाठी प्रत्यक्षात ४ लाख १८ हजार ५६१ हेक्टरवर प्रत्यक्ष लागवड झाली होती.  यावर्षी देखील पेरणी क्षेत्रात वाढ झाली असून  ४ लाख ३७ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. शेतीच्या हंगामात बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके व कृषी निविष्ठांच्या शेतकऱ्यांना उपलब्धतेसाठी रासायनिक खते व बियाणांची खरेदी आपल्या गावातील शेतकरी, बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी तथा कृषी विभाग यंत्रणांच्या संयुक्त सहकार्याने  केल्यास रास्त किमतीत उच्च गुणवत्तेचे रासायनिक खते व बियाणे तांत्रिक मार्गदर्शनासह प्राप्त होईल तसेच वाहतूक खर्चात देखील बचत होणार आहे, यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

यांच्यासोबत साधा संपर्क जिल्ह्यातील शेतकरी बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी त्यांच्या तालुक्यातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पं.स, कृषी विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तालुकास्तरावरील किरकोळ खत विक्रेते शेतकऱ्यांची मागणी असलेले रासायनिक खत व बी बियाणे यांचे शेतकरी गटप्रमुख  यांच्या वतीने व्यवहार पूर्ण करून संबंधित गावात पुरवठा करून घ्यावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांधावर खत व बियाणे योजनेंतर्गत कृषी निविष्ठांची खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

 

टॅग्स :agricultureशेती