शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

१३ शेतकऱ्यांचे ६५ एकरातील तुरीचे पीक नष्ट

By admin | Updated: November 27, 2015 02:22 IST

अंबिकापूर ते वाठोडा मार्गावर अंबिकापूर शिवारात उर्ध्व वर्धा डावा कालवा आहे. या कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आले.

कालव्याचे पाणी शिरले शेतात : २० ते २५ लाख रुपयांनी फटकाआर्वी : अंबिकापूर ते वाठोडा मार्गावर अंबिकापूर शिवारात उर्ध्व वर्धा डावा कालवा आहे. या कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आले. नादुरूस्त कालव्याचे पाणी शेतात शिरल्याने १३ शेतकऱ्यांच्या ६५ एकर शेतातील तूर पीक पूर्णत: नष्ट झाले. यात शेतकऱ्यांचे तब्बल २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कालवा दुरूस्त करण्याची तक्रार पीडित शेतकऱ्यांनी केली; पण संबंधित विभाग त्यासाठीही टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे.तालुक्यातील अंबिकापूर-वाठोडा मार्गावर उर्ध्व डावा कालवा क्र. पाच आहे. या कालव्यातून परिसरातील शेतकऱ्यांना पाणी वितरित केले जाते. दोन दिवसांपूर्वी या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. वितरिका नादुरूस्त असल्याने सोडलेले पाणी पुढे न जाता थेट शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. यामुळे सुमारे १३ शेतकऱ्यांच्या ६० हेक्टर शेतातील तुरीच्या पिकांची धुळधान झाली आहे. तुरीचे पीक फुलावर आले होते. अचानक पाणी सोडले गेल्याने पिकच खराब झाले आहे. अंबिकापूर शिवारातील विनोद कैलुके यांच्या शेतात कालवा अर्धवट सोडून देण्यात आला आहे. या कालव्याचे पाणी नदीत सोडणे गरजेचे होते. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी उर्ध्व वर्धा डावा कालवा विभागाकडे कालव्याची वितरिका नदी सोडण्याची लेखी विनंती केली होती; पण संबंधित विभागाने टाळाटाळ करीत समस्या निकाली काढली नाही. परिसरातील अन्य शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केल्याने या कालव्याचे पाणी दोन दिवसांपूर्वी सोडले. दुरूस्ती न करताच पाणी सोडल्याने कैलेकु यांच्या शेतात सर्वत्र पाणी साचले. शिवाय १३ शेतकऱ्यांच्या शेतात तळे साचले. शेतकऱ्यांनी संबंधित विभागात धाव घेतली असता वितरिका बंद करण्यात आली; पण तोपर्यंत पिकांची धुळधाण झाली होती. या प्रकरणी उपविभागीय कार्यकारी अभियंता गावंडे यांना माहिती देण्यात आली; पण कारवाई करण्यात आली नाही. १५ दिवसांपूर्वी पीडित शेतकऱ्यांनी लेखी तक्रार देत बुजलेल्या वितरिकेच्या दुरूस्तीची मागणी केली होती; पण त्याकडे दुर्लक्ष केले. आता शेतकऱ्यांनी हरकत घेतली असताना लघु कालव्यातून पाणी सोडले. शेतकऱ्यांनी आमदार अमर काळे यांचीही भेट घेत न्यायाची मागणी केली. उर्ध्व वर्धा डाव्या विभागांतर्गत सात लघु कालवे व एक मुख्य वितरिका आहे. या विभागात पाणी सोडण्यासाठी एकच कर्मचारी असून त्याच्याकडे ७ ते १३ किमीचे अंतर दिले. यामुळे रात्री-अपरात्री कालव्यात तांत्रिक अडचण आल्यास त्याचे त्वरित निसरण होत नसल्याची ओरडही शेतकऱ्यांतून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)हातचे पीक जाण्याच्या धास्तीमुळे शेतकरी चिंतेतअंबिकापूर शिवारातील विनोद कैलुके ३ एकर तूर, कृष्णराव खोंडे २ एकर, मारोतराव कैलुके ३ एकर, रामदास कैलुके ६ एकर, प्रदीप काळे १० एकर, साहेबराव खोंडे ५ एकर, अनिल खोंडे १४ एकर, विठ्ठल गवळीकर ३ एकर, किसन कैलुके ७ एकर, रमेश कैलुके २ एकर, किसना कैलुके २ एकर, नारायण कैलुके ६ एकर आणि विनायक कैलुके २ दोन एकर अशा ६५ एकर शेतातील तूर पीक खराब झाले आहे. हातचे पीक जाणार असल्याने शेतकरी धास्तावले आहे. संबंधित विभागाने शेतकऱ्यांना भरपाई देणे गरजेचे झाले आहे.कॅनलच्या पाण्यामुळे १४ एकरातील तूर पूर्णत: खराब झाली आहे. शेतात पाणी साचले आहे. यात सुमारे २ लाखांच्या वर नुकसान झाले. संबंधित विभागाने हे नुकसान भरून द्यावे, अशी मागणी अंबिकापूर येथील पीडित शेतकरी प्रवीण खोंडे यांनी केली आहे.इतर शेतकऱ्यांची मागणी असल्याने पाणी सोडण्यात आले; पण आता या वितरिकेचे पाणी वितरण पूर्णत: बंद केले आहे. या कॅनलचे अखेरचे टोक शेतकऱ्याने बुजविले आहे. या वितरिकेचे अतिरिक्त पाणी नदीत सोडण्यासाठी टेलिंग मशीन पाठविली होती. या मुख्य वितरिकेचे गेट रात्री कुणीतरी सोडल्याने समस्या उद्भवली. गत नऊ वर्षांपासून या कॅनलच्या वितरिकेवर पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे.- पी.बी. खुजे, सहायक अभियंता, उर्ध्व वधा डावा कालवा, उपविभाग, आर्वी.