शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

लोकसहभागातून साकारल्या १२७ डिजिटल शाळा !

By admin | Updated: September 4, 2016 17:02 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत १०० टक्के विद्यार्थी प्रगत करण्यासाठी लोकसहभागातून डिजिटल शाळा साकारल्या जात आहेत.

संतोष वानखडे, ऑनलाइन लोकमत 

वाशिम, दि. ४ -  प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत १०० टक्के विद्यार्थी प्रगत करण्यासाठी लोकसहभागातून डिजिटल शाळा साकारल्या जात आहेत. वाशिम जिल्ह्यात लोकसहभागातून १२७ शाळांना ‘डिजिटल’ची जोड मिळाली आहे.
वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७३ शाळा असून, नगर परिषद, नवोदय आणि अन्य शासकीय अशा एकूण ५७ शाळा आहेत. दोन्ही मिळून ८३० शाळा असून, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना डिजिटल करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे पाऊल पडत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवून प्रगत विद्यार्थी घडविण्यासाठी हा सर्व खटाटोप असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. 
खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक दर्जा खालावलेला असतो, अशी ओरड नेहमीच होत आली आहे. हा समज पुसून टाकण्यासाठी जिल्हा परिषदेने लोकसहभागातून शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्याचा विडा उचलला आहे. याला अनेक पालकांचा उत्स्फुर्त सहभाग मिळत असल्याने जिल्ह्यात १२७ शाळा डिजिटल झाल्या आहेत. लोकवर्गणीतून वर्गखोल्या डिजिटल झाल्याने शासनाला कोणताच खर्च करावा लागला नाही. 
‘डिजिटल’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड निर्माण होऊन त्यांच्यात तंत्रज्ञान वापरण्याची आणि विज्ञानाच्या प्रयोगाची माहिती सुलभ व सुकर करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थीही हसतखेळत व आनंदाने अभ्यास करायला लागल्याचा दावा शिक्षण विभागाने केला.
तंत्रज्ञानामुळेच २१ व्या शतकात बदल घडणार आहे. पुढील १० वर्षांत प्रत्येकाला संगणक व मोबाइल आदींबाबतीत साक्षर व्हावेच लागेल. यापुढील काळात तेच खरे शिक्षण असेल. या दृष्टीने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यात येतील, असे जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद, प्राथमिक शिक्षणाधिकारी डी.एच. जुमनाके यांनी स्पष्ट केले. मोबाइल, स्मार्ट फोन, संगणकांचा वापर करून कमीत कमी खर्चात या शाळांमध्ये तंत्रज्ञान आणले जाईल, अशी ग्वाही हर्षदा देशमुख यांनी दिली. 
तोच शिक्षक, तीच शाळा, तेच ग्रामस्थ; पण पूर्वी जी शाळा नकाशावर दिसत नव्हती, तीच शाळा आज इंटरनेटच्या माध्यमातून जगभर दिसू लागली आहे. स्थानिक संस्था, लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्ती व शिक्षणप्रेमी लोकांच्या अमूल्य योगदानातून जास्तीत जास्त शाळांना डिजिटलची जोड देऊन जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा अधिक चांगल्या प्रकारे सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले.