शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

लोकसहभागातून साकारल्या १२७ डिजिटल शाळा !

By admin | Updated: September 4, 2016 17:02 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत १०० टक्के विद्यार्थी प्रगत करण्यासाठी लोकसहभागातून डिजिटल शाळा साकारल्या जात आहेत.

संतोष वानखडे, ऑनलाइन लोकमत 

वाशिम, दि. ४ -  प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत १०० टक्के विद्यार्थी प्रगत करण्यासाठी लोकसहभागातून डिजिटल शाळा साकारल्या जात आहेत. वाशिम जिल्ह्यात लोकसहभागातून १२७ शाळांना ‘डिजिटल’ची जोड मिळाली आहे.
वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७३ शाळा असून, नगर परिषद, नवोदय आणि अन्य शासकीय अशा एकूण ५७ शाळा आहेत. दोन्ही मिळून ८३० शाळा असून, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना डिजिटल करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे पाऊल पडत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवून प्रगत विद्यार्थी घडविण्यासाठी हा सर्व खटाटोप असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. 
खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक दर्जा खालावलेला असतो, अशी ओरड नेहमीच होत आली आहे. हा समज पुसून टाकण्यासाठी जिल्हा परिषदेने लोकसहभागातून शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्याचा विडा उचलला आहे. याला अनेक पालकांचा उत्स्फुर्त सहभाग मिळत असल्याने जिल्ह्यात १२७ शाळा डिजिटल झाल्या आहेत. लोकवर्गणीतून वर्गखोल्या डिजिटल झाल्याने शासनाला कोणताच खर्च करावा लागला नाही. 
‘डिजिटल’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड निर्माण होऊन त्यांच्यात तंत्रज्ञान वापरण्याची आणि विज्ञानाच्या प्रयोगाची माहिती सुलभ व सुकर करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थीही हसतखेळत व आनंदाने अभ्यास करायला लागल्याचा दावा शिक्षण विभागाने केला.
तंत्रज्ञानामुळेच २१ व्या शतकात बदल घडणार आहे. पुढील १० वर्षांत प्रत्येकाला संगणक व मोबाइल आदींबाबतीत साक्षर व्हावेच लागेल. यापुढील काळात तेच खरे शिक्षण असेल. या दृष्टीने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यात येतील, असे जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद, प्राथमिक शिक्षणाधिकारी डी.एच. जुमनाके यांनी स्पष्ट केले. मोबाइल, स्मार्ट फोन, संगणकांचा वापर करून कमीत कमी खर्चात या शाळांमध्ये तंत्रज्ञान आणले जाईल, अशी ग्वाही हर्षदा देशमुख यांनी दिली. 
तोच शिक्षक, तीच शाळा, तेच ग्रामस्थ; पण पूर्वी जी शाळा नकाशावर दिसत नव्हती, तीच शाळा आज इंटरनेटच्या माध्यमातून जगभर दिसू लागली आहे. स्थानिक संस्था, लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्ती व शिक्षणप्रेमी लोकांच्या अमूल्य योगदानातून जास्तीत जास्त शाळांना डिजिटलची जोड देऊन जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा अधिक चांगल्या प्रकारे सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले.