शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१८ जागांकरिता १२६ इच्छुकांचे नामांकन अर्ज

By admin | Updated: September 4, 2016 00:30 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

हिंगणघाट बाजार समिती निवडणूक : विक्रीच्या तुलनेत ५७ अर्ज कमीहिंगणघाट : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीकरिता एकूण १८३ नामांकन पत्राची विक्री झाली असली तरी शेवटच्या तारखेपर्यंत १२६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. विक्रीच्या तुलनेत एकूण ५७ अर्ज कमी झाल्याने त्यांच्या खरेदीदारांची बाहेरच मनधरणी झाली असावी, अशी चर्चा आहे. या निवडणुकीत इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच निवडणुकीत खरी रंगत येणार असल्याची चर्चा जोरात आहे. या बाजार समितीच्या १८ संचालकांपैकी सर्वाधिक संचालक सहकारी संस्था मतदार संघात आहे. या संघात ११ जागा असून यापैकी ७ सर्वसाधारण, २ महिला, १ इतर मागास प्रवर्ग, १ विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी आहे. ग्रामपंचात मतदार संघातील ४ जागांपैकी २ जागा सर्वसाधारण, एक अनुसूचित जाती व १ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी राखीव आहे. तर व्यापारी अडते मतदार गटातून २ व हमाल मापारी गटातून १ अशा एकूण १८ संचालक मंडळासाठी ८ आॅक्टोबरला मतदान होणार असून ९ आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे.या निवडणुकीत सहकारी संस्था मतदार गटात ८६७ मतदार, ग्रामपंचायत मतदार संघात ६०४, व्यापारी अडते गटात ३९६ मतदार तर हमाल मापारी गटात ३८६ मतदार आहे. या निवडणुकीकरिता आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जात शिवसेना समर्थित पॅनल, भाजपा समर्पित आमदार समीर कुणावार गटाचे पॅनल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अ‍ॅड. सुधीर कोठारी, माजी आमदार राजू तिमांडे, माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे व शेतकरी संघटनेच्या मधुसूदन हरणे यांच्या सत्तारूढ आघाडीच्यावतीने अनेक इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.सद्यस्थितीत सर्वच गट पॅनलने नेते व इच्छुकांना दुखवायचे नाही, अशा धोरणाचा अवलंब केल्याने अनेकांनी एका पेक्षा अधिक गटात उमेदवारी अर्ज दाखल केली आहे; परंतु नामांकन अर्जांची छाणनी होवून उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर उरलेल्या उमेदवारात लढत होवून निवडणुकीत खरी रंगत भरणार असल्याचे चित्र आहे. अख्या विदर्भात नावलौकीक असलेल्या या निवडणुकीकडे केवळ जिल्ह्याचे नाही तर विदर्भाचे लक्ष लागले आहे. यात कोण बाजी मारतो हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे.(तालुका प्रतिनिधी)