शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पालिका लावणार १२ हजार रोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 00:04 IST

यंदाच्या वर्षी तिसऱ्यांदा शासन व प्रशासन स्तरावर वृक्षलावड उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा न.प.ला वरिष्ठांकडून यंदाच्या जुलै महिन्यात १० हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आहे. मात्र, दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा तब्बल दोन हजार जास्त रोपटे लागवडीचा मानस वर्धा न. प. प्रशासनाचा आहे.

ठळक मुद्देवृक्ष लागवड उपक्रम : विविध ठिकाणी खोदले ५ हजार खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी तिसऱ्यांदा शासन व प्रशासन स्तरावर वृक्षलावड उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा न.प.ला वरिष्ठांकडून यंदाच्या जुलै महिन्यात १० हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आहे. मात्र, दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा तब्बल दोन हजार जास्त रोपटे लागवडीचा मानस वर्धा न. प. प्रशासनाचा आहे. यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्नही सुरू असून वृक्षारोपणासाठी आतापर्यंत पाच हजार खड्डे खोदण्यात आले आहेत.वर्धा जिल्ह्याला १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत २६ लाख रोपटे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण व वन विभागाच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालय सध्या सदर उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्नही करीत आहेत. वर्धा न. प. प्रशासनाला या उपक्रमांतर्गत १० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वृक्ष लागवड हा उपक्रम केवळ शासकीय न राहता तो लोकचळवळ व्हावा या हेतूने तसेच यात लोकसहभाग वाढविण्यासाठी वर्धा न. प. चे अधिकारी व कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी विशेष प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. गत वर्षी पाच हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वर्धा न.प.ला देण्यात आले होते. त्यावेळी प्रत्यक्षात विविध प्रजातींची ५ हजार ३१६ रोपटे न.प.च्या माध्यमातून लावण्यात आले. त्यानंतर उन्हाळ्याच्या सुरूवातीला त्यापैकी किती रोपटे जिवंत आहेत याचे सर्वक्षण करण्यात आले असता ३ हजार ८८० रोपटे जिवंत असल्याचे न. प. प्रशासनाच्या निदर्शनास आले. तर यंदा स्वच्छ, सुंदर व हरित वर्धा या हेतूला केंद्रस्थानी ठेवून दिलेल्या उद्दिष्टापैकी सुमारे २ हजार रोपटे जास्त लावण्याचा मानस न. प. प्रशासनाचा आहे.शिवाय प्रत्येक वर्धेकराला यात कसे सहभागी करता येईल यासाठी प्रयत्नही केले जात आहेत.१ हजार वृक्ष दगावलेगत वर्षी न.प. प्रशासनाने त्यांना दिलेल्या उद्दीष्टापैकी ३१६ वृक्ष जास्त लावले असले तरी सुमारे एक हजार वृक्ष विविध कारणांनी दगावल्याचे सांगण्यात आले. गत वर्षीची कसर यंदा जादा वृक्ष लागवड करून तसेच या उपक्रमात लोकसहभाग वाढवून काढण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.उद्यानांच्या कामांमुळे अडथळावर्धा शहरातील सुमारे ४० रिकामे भुखंड ग्रिन झोन बनविण्यात येणार असून त्याचे काम निविदा काढून कंत्राटदारांच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. अनेक उद्यानांचे काम सध्या सुरू असल्याने वृक्ष लागवडीसाठी नेमके खड्डे कुठे खोदावे असा प्रश्न पालिका प्रशासनातील कर्मचाºयांना पडत आहे. एकूण संबंधीतांना विचारणा करीतच सध्या खड्डे खोदण्याचे काम पूर्ण केले जात आहे.स्मृती वृक्ष लावण्याचे आवाहनएखाद्याच्या जन्माचे औचित्य साधून तर विवाहित मुलीची आढवण म्हणून शहरातील नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात वृक्षारोपण करावे. त्यासाठी पालिका नि:शुल्क वृक्ष उपलब्ध करून देईल, असे आवाहन न.प.च्यावतीने करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर एखाद्याच्या स्मृतीतही वृक्षारोपणासाठी रोपटे उपलब्ध करून देणार आहे. या उपक्रमात नागरिकांचा सहभाग वाढावा म्हणून सुमारे ५०० नागरिकांना वृक्षाचे महत्त्व पटवून देणारा एसएमएस पाठविण्याचे काम सध्या सुरू असल्याचे सांगण्यात आले.मोजावे लागतेय ३.१२ लाख१ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत वर्धा शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. न.प. प्रशासन १२ हजार रोपटे लावणार असून त्यासाठी त्यांना ३ लाख १२ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. वृक्षलागवडीसाठी लागणारे विविध प्रजातींची रोपटी पालिका प्रशासन वन विभागाकडून घेणार आहे. त्याबाबतची कागदोपत्री कार्यवाही अंतिम टप्प्यात असून सदर रकमेचा धनादेश देत रोपट्यांची उचल वनविभागाच्या हिंगणघाट येथील रोपवाटिकेतून करण्यात येणार आहे.