शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

गांधी आश्रमाला ११४ क्विंटल धान्याचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:09 IST

येथील गांधी आश्रम प्रतिष्ठानाच्यावतीने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून शेती केली जाते. यंदाच्या वर्षी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानाला शेतीच्या माध्यमातून २१ क्विंटल तूर, ६० क्विंटल गहू तर ३३ क्विंटल चणा पिकाचे उत्पन्न झाले आहेत. इतकेच नव्हे तर ८ क्विंटल हळदीचेही उत्पन्न मिळाले आहे.

ठळक मुद्देसेंद्रिय पद्धतीने केली जातेय शेती : आठ क्विंटल हळदीचीही झाली मिळकत

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : येथील गांधी आश्रम प्रतिष्ठानाच्यावतीने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून शेती केली जाते. यंदाच्या वर्षी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानाला शेतीच्या माध्यमातून २१ क्विंटल तूर, ६० क्विंटल गहू तर ३३ क्विंटल चणा पिकाचे उत्पन्न झाले आहेत. इतकेच नव्हे तर ८ क्विंटल हळदीचेही उत्पन्न मिळाले आहे.नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करून पिकविण्यात आलेला शेतमाल फायद्याचे ठरतो. ही बाब लक्षात घेऊन आश्रम प्रतिष्ठानाच्यावतीने उपलब्ध शेतजमिनीवर विविध पीक घेतली जातात. यात गहू, चणा, तूर या धान्य वर्गीय पिकांचा तर हळद या औषधी वर्गीय पिकाचा तसेच कापसाचा समावेश आहे. येथे सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यात आलेल्या धान्याची मागणीही नागरिकांकडून बऱ्यापैकी असते. १९३६ मध्ये आश्रमची स्थापना करण्यात आल्या नंतर शेती आणि गोशाळा सुरू करण्यात आली. त्यावेळपासून ते आजही येथे शेती पारंपरिक पद्धतीने केल्या जात. कार्यकर्त्यांची संख्या वाढली. शिवाय व्याप व कार्य वाढले, तशी शेतीची गरज वाढायला लागली. परिणामी, आवश्यकतेनुसार शेती घेण्यात आली. आश्रमची व्यवस्था शेती आणि गोशाळेवर अवलंबून असल्याने तसेच बलवंतसिंग सारखे कार्यकर्ते असल्याने पारंपरिक पिके व संबधित उत्पादने घेतल्या जात असे. आज पण आश्रमात पारंपरिक पद्धतीने सेंद्रिय शेती केली जाते. शेतातील उत्पादने कार्यकर्ते, यात्री निवास, प्राक्रृतिक आहार केंद्र आणि ग्रामोद्योगच्या माध्यमातून पर्यटक, दर्शनार्थी यांना विक्री केली जाते.आश्रम प्रतिष्ठानाकडे ८० एकर शेतीसेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानाकडे ८० एकर शेती असली तरी आश्रम प्रतिष्ठान सध्या चाळीस एकर मधील शेतजमीन स्वत: कसते. तर उर्वरित ४० एकर शेती ठेक्याने देण्यात आली आहे. २०१८-१९ मध्ये तूर, गहूू, चणा, हळद आणि चारा आदी पिकांचे उत्पन्न घेण्यात आले आहे.यंदा आश्रम प्रतिष्ठानाला शेतीच्या माध्यमातून २१ क्विंटल तूर, ६० क्विंटल गहू तर ३३ क्विंटल चणा तर ८ क्विंटल हळदीचे उत्पन्न झाले आहेत. शेती करताना सेंद्रिय पद्धतीचा वापर होतो. त्यामुळे येथील धान्यालाही नागरिकांकडून चांगली मागणी असते. विषमुक्त धान्य याबाबत नागरिकही जागरूक होत असल्याने सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यात आलेल्या खाद्यांन्नाच्या मागणीत वाढ झाली आहे.- नामदेव ढोले, शेती विभाग प्रमुख, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.मजुरांना मिळतेय बाराही महिने कामआश्रम प्रतिष्ठानाच्यावतीने शेती केल्या जात असल्याने स्थानिक मजुरांनाही याच शेतीच्या माध्यमातून काम मिळते. शेती आणि उत्पादने आश्रमाच्या उत्पन्नाचे स्रोत असून ते आश्रम प्रतिष्ठानाला आर्थिक हातभार लावण्यास मदतच करतात. वर्षभर शेतीची कामे चालत असल्यामुळे मजूरांच्या हाताला काम मिळते.

टॅग्स :Bapu Kutiबापू कुटीSewagramसेवाग्राम