शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

गांधी आश्रमाला ११४ क्विंटल धान्याचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:09 IST

येथील गांधी आश्रम प्रतिष्ठानाच्यावतीने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून शेती केली जाते. यंदाच्या वर्षी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानाला शेतीच्या माध्यमातून २१ क्विंटल तूर, ६० क्विंटल गहू तर ३३ क्विंटल चणा पिकाचे उत्पन्न झाले आहेत. इतकेच नव्हे तर ८ क्विंटल हळदीचेही उत्पन्न मिळाले आहे.

ठळक मुद्देसेंद्रिय पद्धतीने केली जातेय शेती : आठ क्विंटल हळदीचीही झाली मिळकत

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : येथील गांधी आश्रम प्रतिष्ठानाच्यावतीने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून शेती केली जाते. यंदाच्या वर्षी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानाला शेतीच्या माध्यमातून २१ क्विंटल तूर, ६० क्विंटल गहू तर ३३ क्विंटल चणा पिकाचे उत्पन्न झाले आहेत. इतकेच नव्हे तर ८ क्विंटल हळदीचेही उत्पन्न मिळाले आहे.नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करून पिकविण्यात आलेला शेतमाल फायद्याचे ठरतो. ही बाब लक्षात घेऊन आश्रम प्रतिष्ठानाच्यावतीने उपलब्ध शेतजमिनीवर विविध पीक घेतली जातात. यात गहू, चणा, तूर या धान्य वर्गीय पिकांचा तर हळद या औषधी वर्गीय पिकाचा तसेच कापसाचा समावेश आहे. येथे सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यात आलेल्या धान्याची मागणीही नागरिकांकडून बऱ्यापैकी असते. १९३६ मध्ये आश्रमची स्थापना करण्यात आल्या नंतर शेती आणि गोशाळा सुरू करण्यात आली. त्यावेळपासून ते आजही येथे शेती पारंपरिक पद्धतीने केल्या जात. कार्यकर्त्यांची संख्या वाढली. शिवाय व्याप व कार्य वाढले, तशी शेतीची गरज वाढायला लागली. परिणामी, आवश्यकतेनुसार शेती घेण्यात आली. आश्रमची व्यवस्था शेती आणि गोशाळेवर अवलंबून असल्याने तसेच बलवंतसिंग सारखे कार्यकर्ते असल्याने पारंपरिक पिके व संबधित उत्पादने घेतल्या जात असे. आज पण आश्रमात पारंपरिक पद्धतीने सेंद्रिय शेती केली जाते. शेतातील उत्पादने कार्यकर्ते, यात्री निवास, प्राक्रृतिक आहार केंद्र आणि ग्रामोद्योगच्या माध्यमातून पर्यटक, दर्शनार्थी यांना विक्री केली जाते.आश्रम प्रतिष्ठानाकडे ८० एकर शेतीसेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानाकडे ८० एकर शेती असली तरी आश्रम प्रतिष्ठान सध्या चाळीस एकर मधील शेतजमीन स्वत: कसते. तर उर्वरित ४० एकर शेती ठेक्याने देण्यात आली आहे. २०१८-१९ मध्ये तूर, गहूू, चणा, हळद आणि चारा आदी पिकांचे उत्पन्न घेण्यात आले आहे.यंदा आश्रम प्रतिष्ठानाला शेतीच्या माध्यमातून २१ क्विंटल तूर, ६० क्विंटल गहू तर ३३ क्विंटल चणा तर ८ क्विंटल हळदीचे उत्पन्न झाले आहेत. शेती करताना सेंद्रिय पद्धतीचा वापर होतो. त्यामुळे येथील धान्यालाही नागरिकांकडून चांगली मागणी असते. विषमुक्त धान्य याबाबत नागरिकही जागरूक होत असल्याने सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यात आलेल्या खाद्यांन्नाच्या मागणीत वाढ झाली आहे.- नामदेव ढोले, शेती विभाग प्रमुख, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.मजुरांना मिळतेय बाराही महिने कामआश्रम प्रतिष्ठानाच्यावतीने शेती केल्या जात असल्याने स्थानिक मजुरांनाही याच शेतीच्या माध्यमातून काम मिळते. शेती आणि उत्पादने आश्रमाच्या उत्पन्नाचे स्रोत असून ते आश्रम प्रतिष्ठानाला आर्थिक हातभार लावण्यास मदतच करतात. वर्षभर शेतीची कामे चालत असल्यामुळे मजूरांच्या हाताला काम मिळते.

टॅग्स :Bapu Kutiबापू कुटीSewagramसेवाग्राम