शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

१११ जणांची माघार; ८१८ मध्ये राजकीय दंगल

By admin | Updated: February 8, 2017 00:38 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे रिंगण तयार झाले आहे. मंगळवारी नामांकन अर्ज परत घेण्याचा अखेरचा दिवस होता.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : रिंगण तयार; अपक्षांना मिळाले निवडणूक चिन्ह वर्धा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे रिंगण तयार झाले आहे. मंगळवारी नामांकन अर्ज परत घेण्याचा अखेरचा दिवस होता. यात दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण १११ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. यामुळे आता रिंगणात ८१८ उमेदवार असून त्यांच्यात लढत होणार हे स्पष्ट झाले झाले असले तरी थेट लढतींकडे मतदारांचे लक्ष आहे. निवडणुकीतून माघार घेण्यासह आज अपक्षांना निवडणूक चिन्ह मिळाले आहे. चिन्ह मिळताच त्यांचाही प्रचार सुरू झाला आहे. जिल्हा परिषदेकरिता नामांकन दाखल करणाऱ्या एकूण ४७ तर पंचायत समितीकरिता अर्ज करणाऱ्या एकूण ६४ इचछुकांनी नामांकन परत घेतले. यामुळे येत्या १६ फेबु्रवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ५० जागांकरिता २८९ तर पंचायत समितीच्या १०० जागांकरिता ५२९ उमेदवार रिंगणात आहेत. यातील पक्षाच्या उमेदवारांनी नामांकन दाखल करताच प्रचार सुरू केला, तर आज अपक्षांना चिन्ह मिळाल्याने त्यांच्या प्रचाराचा नारळ बुधवारी (दि. ८) फुटणार आहे. काही ठिकाणी पक्ष आणि अपक्षातच थेट लढत असल्याने होणाऱ्या प्रचाराच्या रणधुमाळीकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागले आहे. यात कोण बाजी मारतो हे निकालाअंतीच कळणार आहे. निवडणूक जाहीर झाली त्या काळापासूनच रिंगणात उतरण्याकरिता अनेकांनी बाशिंग बांधले होते. यात अनेकांनी नामांकन दाखल करण्याच्या दिवशी आठही तालुक्यात एकूण ९९६ इच्छुकांनी नामांकन दाखल केले होते. या नामांकन अर्जाची छाननी झाली. त्यात त्रुट्यांमुळे तब्बल ३३ इच्छुकांचे नामांकन बाद ठरले झाले. या छाननीत काही पक्षांच्या उमेदवारांनाही फटका बसला. छाननी अंती एकूण ९६६ नामांकन शिल्लक राहिले होते. त्यातील काहींनी आज अनेकांनी आपले अर्ज परत घेतले. या निवडणुकीत काहींनी पक्षासोबत बंडखोरी करीत दंड थोपटले. पक्षश्रेष्ठींच्या मनधरणीने काहींनी माघार घेतली तर काहींचे नामांकन कायमच आहे. त्यांच्या बंडखोरीमुळे पक्षाच्या उमेदवारांच्या अडचणी वाढणार आहे. विरूळ गटावर आक्षेप आर्वी तालुक्यातील विरूळ जिल्हा परिषदेच्या काही इच्छुकांकडून नामांकन अर्ज परत घेण्याची प्रक्रीया सुरू असताना काही अडचणींवरून आक्षेप घेतला. यामुळे येथे वाद उद्भवण्याची स्थिती निर्माण झाली होती. परिणामी येथील प्रक्रियेला ब्रेक देण्यात आला आहे. सदर प्रकरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे गेले आहे. यावर येत्या १० तारखेला सुनावणी होणार असून त्यानंतरच काय तो निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे या गटात किती उमेदवार राहणार याचे चित्र स्पष्ट झाले नाही. मात्र या गटांतर्गत येत असलेल्य गणांची स्थिती स्पष्ट झाली आहे.