शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

१११ जणांची माघार; ८१८ मध्ये राजकीय दंगल

By admin | Updated: February 8, 2017 00:38 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे रिंगण तयार झाले आहे. मंगळवारी नामांकन अर्ज परत घेण्याचा अखेरचा दिवस होता.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : रिंगण तयार; अपक्षांना मिळाले निवडणूक चिन्ह वर्धा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे रिंगण तयार झाले आहे. मंगळवारी नामांकन अर्ज परत घेण्याचा अखेरचा दिवस होता. यात दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण १११ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. यामुळे आता रिंगणात ८१८ उमेदवार असून त्यांच्यात लढत होणार हे स्पष्ट झाले झाले असले तरी थेट लढतींकडे मतदारांचे लक्ष आहे. निवडणुकीतून माघार घेण्यासह आज अपक्षांना निवडणूक चिन्ह मिळाले आहे. चिन्ह मिळताच त्यांचाही प्रचार सुरू झाला आहे. जिल्हा परिषदेकरिता नामांकन दाखल करणाऱ्या एकूण ४७ तर पंचायत समितीकरिता अर्ज करणाऱ्या एकूण ६४ इचछुकांनी नामांकन परत घेतले. यामुळे येत्या १६ फेबु्रवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ५० जागांकरिता २८९ तर पंचायत समितीच्या १०० जागांकरिता ५२९ उमेदवार रिंगणात आहेत. यातील पक्षाच्या उमेदवारांनी नामांकन दाखल करताच प्रचार सुरू केला, तर आज अपक्षांना चिन्ह मिळाल्याने त्यांच्या प्रचाराचा नारळ बुधवारी (दि. ८) फुटणार आहे. काही ठिकाणी पक्ष आणि अपक्षातच थेट लढत असल्याने होणाऱ्या प्रचाराच्या रणधुमाळीकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागले आहे. यात कोण बाजी मारतो हे निकालाअंतीच कळणार आहे. निवडणूक जाहीर झाली त्या काळापासूनच रिंगणात उतरण्याकरिता अनेकांनी बाशिंग बांधले होते. यात अनेकांनी नामांकन दाखल करण्याच्या दिवशी आठही तालुक्यात एकूण ९९६ इच्छुकांनी नामांकन दाखल केले होते. या नामांकन अर्जाची छाननी झाली. त्यात त्रुट्यांमुळे तब्बल ३३ इच्छुकांचे नामांकन बाद ठरले झाले. या छाननीत काही पक्षांच्या उमेदवारांनाही फटका बसला. छाननी अंती एकूण ९६६ नामांकन शिल्लक राहिले होते. त्यातील काहींनी आज अनेकांनी आपले अर्ज परत घेतले. या निवडणुकीत काहींनी पक्षासोबत बंडखोरी करीत दंड थोपटले. पक्षश्रेष्ठींच्या मनधरणीने काहींनी माघार घेतली तर काहींचे नामांकन कायमच आहे. त्यांच्या बंडखोरीमुळे पक्षाच्या उमेदवारांच्या अडचणी वाढणार आहे. विरूळ गटावर आक्षेप आर्वी तालुक्यातील विरूळ जिल्हा परिषदेच्या काही इच्छुकांकडून नामांकन अर्ज परत घेण्याची प्रक्रीया सुरू असताना काही अडचणींवरून आक्षेप घेतला. यामुळे येथे वाद उद्भवण्याची स्थिती निर्माण झाली होती. परिणामी येथील प्रक्रियेला ब्रेक देण्यात आला आहे. सदर प्रकरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे गेले आहे. यावर येत्या १० तारखेला सुनावणी होणार असून त्यानंतरच काय तो निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे या गटात किती उमेदवार राहणार याचे चित्र स्पष्ट झाले नाही. मात्र या गटांतर्गत येत असलेल्य गणांची स्थिती स्पष्ट झाली आहे.