शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

११ गावातील नागरिकांना बांधकाम करण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 21:45 IST

आशिया खंडातील दुसऱ्या व देशातील प्रथम क्रमांकाच्या केंद्रीय दारूगोळा भांडारात मागील काही वर्षात झालेल्या स्फोटाच्या घटनानंतर केंद्रीय संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन, अधिकारी अजय गुल्हाने यांनी भांडारालगतच्या ११ गावात बांधकाम निर्माण कार्यावर प्रतिबंध घालण्याचा आदेश नुकताच निर्गमीत केला आहे. त्यामुळे परिसरातील अकरा गावांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.

ठळक मुद्देदोन कि.मी.पर्यंत बांधकामास बंदी : संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : आशिया खंडातील दुसऱ्या व देशातील प्रथम क्रमांकाच्या केंद्रीय दारूगोळा भांडारात मागील काही वर्षात झालेल्या स्फोटाच्या घटनानंतर केंद्रीय संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन, अधिकारी अजय गुल्हाने यांनी भांडारालगतच्या ११ गावात बांधकाम निर्माण कार्यावर प्रतिबंध घालण्याचा आदेश नुकताच निर्गमीत केला आहे. त्यामुळे परिसरातील अकरा गावांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.संरक्षण विभागाच्या आदेशानुसार वर्धा जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाने यांनी नाचणगाव, गुंजखेडा, लक्ष्मी नारायणपूर, आगरगाव, सोनेगाव, मुरदगाव, मलकापूर, कवठा (रेल्वे), कवठा (झो), नागझरी, येसगाव या गावांना हा आदेश लागू केला आहे. ग्रामपंचायत सचिवांनी देवळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या सहीचे आदेशानुसार या गावाना यांची माहिती दिली आहे. विस्फोट व अतिस्फोट पहाता या भांडारालगतच्या अनेक गावातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असे इतकेच नव्हे तर वेळ प्रसंगी वित्त व जीवहानीचा सामना देखील करावा लागला. ही परिस्थिती पहाता सुरक्षेच्या दृष्टीने भांडारालगतच्या १३ गावात कुठलेही बांधकाम करण्यास प्रतिबंध घालण्यात येवून या गावाचे इतरत्र पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु प्रस्ताव केवळ कागदोपत्रीच राहिल. मागील दोन वर्षात या दारूगोळा भांडारात झालेले अग्नीस्फोट व विस्फोट व त्यात झालेली जीव व वित्तहानी यामुळे सदर निर्णय घेण्यात आला असे समजते. स्थानिक केंद्रीय दारूगोळा भांडार जवळपास ७ हजार एकर परिसरात पसरलेले आहे. १५० ते २०० अधिकारी व जवळपास ४ हजार स्थानिक कामगार कार्यरत आहेत. या भांडारात विस्फोटक व विस्फोटक शस्त्रसाठा असल्यामुळे लहान मोठ्या अनेक दुर्देवी घटना घडल्या. परंतु १ मे १९८९ मध्ये झालेला भयावह विस्फोट व त्यामुळे पसरलेली भयानक अग्नी तांडवामुळे संपूर्ण विदर्भ हादरून गेला होता. इतकेच नव्हे तर भांडार संरक्षक भिंती लगतच्या अनेक गावाचे झालेले नुकसान पहाता परिसरातील १३ गावात कुठलेही बांधकाम व निर्माण कार्य करण्यास प्रतिबंध घालण्यात येवून या गावाचे पुनर्वसन करण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी या गावाचे पुनर्वसन करण्याचे आदेशही दिले होते. परंतु पुनर्वसनाचे घोडे पेड खातच राहिले.मागील ३० मे २०१६ व नुकताच २० नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या अग्नीस्फोट व विस्फोट व झालेली जीवहानी पहाता पुन्हा भांडार परिसरालगतच्या १० गावाचे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला.वारंवार घडणाºया घटनामुळे भांडारालगतच्या गावात यापूर्वीच निर्माण कार्यावर बंदी घालण्यात आली होती.