शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

११ गावातील नागरिकांना बांधकाम करण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 21:45 IST

आशिया खंडातील दुसऱ्या व देशातील प्रथम क्रमांकाच्या केंद्रीय दारूगोळा भांडारात मागील काही वर्षात झालेल्या स्फोटाच्या घटनानंतर केंद्रीय संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन, अधिकारी अजय गुल्हाने यांनी भांडारालगतच्या ११ गावात बांधकाम निर्माण कार्यावर प्रतिबंध घालण्याचा आदेश नुकताच निर्गमीत केला आहे. त्यामुळे परिसरातील अकरा गावांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.

ठळक मुद्देदोन कि.मी.पर्यंत बांधकामास बंदी : संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : आशिया खंडातील दुसऱ्या व देशातील प्रथम क्रमांकाच्या केंद्रीय दारूगोळा भांडारात मागील काही वर्षात झालेल्या स्फोटाच्या घटनानंतर केंद्रीय संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन, अधिकारी अजय गुल्हाने यांनी भांडारालगतच्या ११ गावात बांधकाम निर्माण कार्यावर प्रतिबंध घालण्याचा आदेश नुकताच निर्गमीत केला आहे. त्यामुळे परिसरातील अकरा गावांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.संरक्षण विभागाच्या आदेशानुसार वर्धा जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाने यांनी नाचणगाव, गुंजखेडा, लक्ष्मी नारायणपूर, आगरगाव, सोनेगाव, मुरदगाव, मलकापूर, कवठा (रेल्वे), कवठा (झो), नागझरी, येसगाव या गावांना हा आदेश लागू केला आहे. ग्रामपंचायत सचिवांनी देवळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या सहीचे आदेशानुसार या गावाना यांची माहिती दिली आहे. विस्फोट व अतिस्फोट पहाता या भांडारालगतच्या अनेक गावातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असे इतकेच नव्हे तर वेळ प्रसंगी वित्त व जीवहानीचा सामना देखील करावा लागला. ही परिस्थिती पहाता सुरक्षेच्या दृष्टीने भांडारालगतच्या १३ गावात कुठलेही बांधकाम करण्यास प्रतिबंध घालण्यात येवून या गावाचे इतरत्र पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु प्रस्ताव केवळ कागदोपत्रीच राहिल. मागील दोन वर्षात या दारूगोळा भांडारात झालेले अग्नीस्फोट व विस्फोट व त्यात झालेली जीव व वित्तहानी यामुळे सदर निर्णय घेण्यात आला असे समजते. स्थानिक केंद्रीय दारूगोळा भांडार जवळपास ७ हजार एकर परिसरात पसरलेले आहे. १५० ते २०० अधिकारी व जवळपास ४ हजार स्थानिक कामगार कार्यरत आहेत. या भांडारात विस्फोटक व विस्फोटक शस्त्रसाठा असल्यामुळे लहान मोठ्या अनेक दुर्देवी घटना घडल्या. परंतु १ मे १९८९ मध्ये झालेला भयावह विस्फोट व त्यामुळे पसरलेली भयानक अग्नी तांडवामुळे संपूर्ण विदर्भ हादरून गेला होता. इतकेच नव्हे तर भांडार संरक्षक भिंती लगतच्या अनेक गावाचे झालेले नुकसान पहाता परिसरातील १३ गावात कुठलेही बांधकाम व निर्माण कार्य करण्यास प्रतिबंध घालण्यात येवून या गावाचे पुनर्वसन करण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी या गावाचे पुनर्वसन करण्याचे आदेशही दिले होते. परंतु पुनर्वसनाचे घोडे पेड खातच राहिले.मागील ३० मे २०१६ व नुकताच २० नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या अग्नीस्फोट व विस्फोट व झालेली जीवहानी पहाता पुन्हा भांडार परिसरालगतच्या १० गावाचे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला.वारंवार घडणाºया घटनामुळे भांडारालगतच्या गावात यापूर्वीच निर्माण कार्यावर बंदी घालण्यात आली होती.